शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

इतर परीक्षा होऊ शकतात, मग एमपीएससी का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST

बीड : कोरोना संसर्ग वाढत असल्याचे कारण पुढे करत १४ मार्च रोजी होणारी एमपीएसी परीक्षा शासनाने पुढे ढकलण्याचा निर्णय ...

बीड : कोरोना संसर्ग वाढत असल्याचे कारण पुढे करत १४ मार्च रोजी होणारी एमपीएसी परीक्षा शासनाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सरकारच्या या निर्णयामुळे सरकारविरोधात राज्यभर विद्यार्थी आक्रमक झाले होते. बीडमध्ये देखील जिल्हाधिकारी कार्यालयसमोर या निर्णयाचा निषेध विद्यार्थ्यांनी नोंदवला आहे.

राज्यात कोरोना काळातच इतर काही विभागाच्या परीक्षा झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी राज्यभर परीक्षा झाली. मात्र, १४ तारखेला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे इतर विभागाच्या परीक्षा होऊ शकतात, तर एमपीएससीची का नाही, असा सवाल विद्यार्थ्यांमधून विचारला जात आहे. तर, राज्यातील नेत्यांच्या मोठ्या सभा होऊ शकतात, लग्न समारंभ व इतर कार्यक्रम थाटात व गर्दी करून पार पडतात, तर एमपीएससी परीक्षा का नाही. मागील वर्षात जवळपास चार वेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वीच्या परिस्थितीचा विचार करून परीक्षार्थींनी देखील संयमाची भूमिका घेतली होती. मात्र, राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमाला होत असलेली गर्दी व इतर विभागाच्या झालेल्या परीक्षा यामुळे परीक्षार्थी आक्रमक झाले असून, राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. ठरलेल्या तारखेलाच परीक्षा घ्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

परीक्षेचे हॉलतिकीट दिले गेले होते

राज्यसेवा पूर्व परीक्षा नियोजित तारखेनुसार १४ मार्च रोजी होणार होती. त्याची तयारीदेखील प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली होती. तसेच परीक्षार्थींना हॉलतिकीट देखील पाठविण्यात आलेले आहेत. मात्र, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे परीक्षार्थींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

ही परीक्षा रद्द होण्याची चौथी वेळ

मागील वर्षापासून राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची ही चौथी वेळ आहे. मागील वर्षात लॉकडाऊन आणि कोरोना संसर्ग यामुळे वेगवेगळ्या महिन्यांत तीन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात फरक असून, शासनाने वेळेनुसार परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.

इतर विभागांच्या परीक्षा झाल्या होत्या

आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी काही दिवसांपूर्वी परीक्षा झाल्या होत्या, तर इतर काही विभागांच्या देखील परीक्षा झालेल्या आहेत. तर, एमपीएससी परीक्षा देखील नियोजनानुसार झाली पाहिजे, अशी भावना परीक्षार्थींमधून व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया

१४ तारखेला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा त्याच दिवशी घेण्यात यावी, तर ११ एप्रिल रोजी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात यावी. वेळोवेळी परीक्षा पुढेे ढकलल्यामुळे परीक्षार्थींच्या मानसिक स्थितीवर देखील परिणाम होत आहे.

-आबासाहेब जगदाळे

वेळोवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. तसेच पैसा व वेळदेखील वाया जात आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन परीक्षा घ्याव्यात.

-त्रिशला पवार

एमपीएससीची परीक्षा चार वेळा रद्द केली आहे, दिवसरात्र अभ्यास केल्यानंतर शासनाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे ताण वाढला आहे. परीक्षा पुढे ढकलायची होती किंवा नियोजन नव्हते तर हॉलतिकीट वाटप करायचे नव्हते.

-सुदर्शन घुमरे

परीक्षेची पूर्ण तयारी केलेली असताना अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे हिरमोड झाला आहे. दीड वर्षापासून परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तेव्हापासून अभ्यास करून तयारी पूर्ण केली होती. मात्र, अद्याप देखील परीक्षेसंदर्भात अनिश्चितता आहे.

-श्रीकांत येडे

कोरोना काळातच आरोग्य, बँक व इतर विभागाच्या परीक्षा झाल्या आहेत. आम्ही पीपीई कीट घालून परीक्षा द्यायला तयार आहोत. शासनाने तयारी करून घ्यावी व परीक्षा १४ मार्च रोजीच घ्यावी.

-गणेश बांगर

शासनाने परीक्षेच्या वेळेचे पूर्व नियोजन करून परीक्षा वेळेत घेणे गरजेचे आहे. परीक्षार्थींची तयारी पूर्ण झालेली असताना असा निर्णय घेणे म्हणजे परीक्षार्थींचे नुकसान आहे. परीक्षा वेळेत झाल्या तर करिअरच्या दृष्टीने पुढचे नियोजन करता येते. मात्र, वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे.

- काजल गोरे

बीड - १३ केंद्र

परीक्षार्थी - ३९००