शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मांजरा धरणात फक्त १७ टक्के पाण्याचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST

अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : सर्वत्र धो धो पाऊस पडतो आहे. मात्र, बीड, लातूर आणि उस्मानाबाद धरणाची तहान भागवणाऱ्या मांजरा ...

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : सर्वत्र धो धो पाऊस पडतो आहे. मात्र, बीड, लातूर आणि उस्मानाबाद धरणाची तहान भागवणाऱ्या मांजरा धरणात सध्या फक्त जिवंत पाण्याचा साठा १७ टक्के एवढाच आहे. असे असले तरी यावर्षीही मांजरा धरण भरेल आणि धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी याही वर्षी दरवाजे उघडावे लागतील, असा विश्वास या परिसरातील नागरिकांना आहे.

मराठवाड्यातील बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील जवळपास १२० गावांची तहान भागवण्याचे काम मांजरा धरण गेली अनेक वर्षांपासून करत आहे.

मांजरा धरणाच्या निर्मितीनंतर प्रथमच २०१६ साली मे महिन्यांपासून जुलै महिन्यापर्यंत मांजरा धरणाचा तळ उघडा पडला होता. त्यानंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे मांजरा धरण भरले होते. त्यानंतर सातत्याने या धरणात भरपूर पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

गेल्या दहा वर्षांच्या एकूण पर्जन्यमानाच्या सरासरीपेक्षा साधारण: ११० टक्के पाऊस पडण्याचे भाकीत राज्यातील हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यावर्षी जून महिन्यात झालेल्या पावसातच विष्णूपुरी या मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले होते. या आठवड्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे विष्णूपु्री धरणाचे सात दरवाजे उघडावे लागले असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मांजरा धरणात मात्र आज पुरेसा साठा शिल्लक नाही, ही वस्तुस्थिती आहे.

यासंदर्भात मांजरा धरणातील पाणी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मांजरा धरणावर निगराणी ठेवण्यासाठी शासननियुक्त शाखा अभियंता शाहुराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मांजरा धरणात आज फक्त १७ टक्केच जिवंत पाण्याचा साठा उपलब्ध आहे. मांजरा धरणाची उंची ६४२.३७ मीटर एवढी असून, धरणात सध्या ६३७.४६ मीटर लेवलपर्यंतच पाणीसाठा शिल्लक आहे. धरण भरण्यास ४.९१ मीटर उंचीचे पात्र अजून शिल्लक आहे.

धरणाची पाणी साठवण क्षमता २२४.०९३ एमसीएमएम एवढी असून, धरणात फक्त ७७.२२८ एमसीयुएम एवढा पाणीसाठा जमा आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून १४६.८६५ एमसीयुएम पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. धरणातील उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवनाचे प्रमाण सध्या ५.० एमएम एवढे आहे. धरणक्षेत्रात १५ जुलै रोजी ४ एमएमएवढा पाऊस पडला आहे. नदीच्या पात्रातून धरण क्षेत्रात येणारे पाणी शून्य असल्याची नोंद १५ जुलै रोजीच्या अहवालात आहे.

मांजरा धरणात आज फक्त १७ टक्के जिवंत पाणीसाठा असला तरी आगामी काळात होणाऱ्या मोठ्या पावसाने या पाणीसाठ्यात वाढ होईल आणि मांजरा धरण याही वर्षी पूर्ण क्षमतेने भरून नदीपात्रातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी मांजरा धरणाचे दरवाजे उघडावे लागतील, असा विश्वास या विभागातील नागरिकांना वाटत आहे.

160721\fb_img_1603433460204.jpg

मांजरा धरण संग्रहित फोटो