शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

चमकणारी प्रत्येक वस्तू सोने नसते; संदीप क्षीरसागरांकडे केला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. ...

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.

बीड : कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून माझादेखील उत्साह वाढतो. सत्तेत असो वा नसो, विकासाची प्रक्रिया चालूच राहील. चमकणारी वस्तू सोनेच असते असे नाही हे आता सिद्ध झाले आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जनतेच्या प्रश्नावर शिवसैनिकांनी आता सतर्क राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. त्यांचा बोलण्याचा इशारा आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडे होता.

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, महिला जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण, जिल्हा समन्वयक जयसिंग चुंगडे, जिल्हा सचिव वैजिनाथ तांदळे, दिलीप गोरे, जिल्हा संघटक नितीन धांडे, उप-जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, आशिष मस्के, तालुकाप्रमुख गोरख सिंघण, रतन गुजर, शहर प्रमुख सुनील सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

या वेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेणे व त्या सोडविणे हा उद्देश आहे. अडचणी असतानाही राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करीत आहेत. संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. संकटे कितीही आली तरी विकासाची साखळी पुढे न्यावीच लागते.

पीक विम्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना कसा होईल हे पाहणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा बंधारे, रस्ते, विजेचा प्रश्न असे अनेक प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडकचेही अनेक प्रस्ताव मी स्वतः दाखल केलेले आहेत. आता नवीन दोन महसूल मंडळे तयार झाली आहेत, त्यामुळे अनेक प्रश्न सुटतील. आपण दाखल केलेले प्रस्ताव मंजूर झाले असून, यावर काही जण आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर शिवसैनिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सत्तेत असो वा नसो विकासाची प्रक्रिया चालूच राहील, चमकणारी वस्तू सोनेच आहे असे नसते हे आता सिद्ध झाले आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कार्यकर्त्यांच्या उत्साहाने मलादेखील शक्ती मिळते. यापुढे प्रत्येक गावच्या प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

या वेळी नगरसेवक शुभम धूत, विठ्ठल बहीर, मनेष भोस्कर, दत्ता काशिद, अर्जुन नलावडे, कालिदास नवले, मुकेश भोकरे, अशोक सोळंके, किशोर पिसाळ, पांडुरंग भोसकर यांच्यासह जिल्हा शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, विभागप्रमुख, उप-विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

160721\16bed_1_16072021_14.jpg

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.