शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
2
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
3
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
4
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
5
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
6
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
7
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
8
नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
9
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
10
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
11
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
12
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
13
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
14
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
15
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
16
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
17
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
18
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
19
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
20
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

चमकणारी प्रत्येक वस्तू सोने नसते; संदीप क्षीरसागरांकडे केला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:26 IST

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. ...

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.

बीड : कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून माझादेखील उत्साह वाढतो. सत्तेत असो वा नसो, विकासाची प्रक्रिया चालूच राहील. चमकणारी वस्तू सोनेच असते असे नाही हे आता सिद्ध झाले आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जनतेच्या प्रश्नावर शिवसैनिकांनी आता सतर्क राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. त्यांचा बोलण्याचा इशारा आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडे होता.

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, महिला जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण, जिल्हा समन्वयक जयसिंग चुंगडे, जिल्हा सचिव वैजिनाथ तांदळे, दिलीप गोरे, जिल्हा संघटक नितीन धांडे, उप-जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, आशिष मस्के, तालुकाप्रमुख गोरख सिंघण, रतन गुजर, शहर प्रमुख सुनील सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

या वेळी जयदत्त क्षीरसागर म्हणाले, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेणे व त्या सोडविणे हा उद्देश आहे. अडचणी असतानाही राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करीत आहेत. संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. संकटे कितीही आली तरी विकासाची साखळी पुढे न्यावीच लागते.

पीक विम्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना कसा होईल हे पाहणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा बंधारे, रस्ते, विजेचा प्रश्न असे अनेक प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडकचेही अनेक प्रस्ताव मी स्वतः दाखल केलेले आहेत. आता नवीन दोन महसूल मंडळे तयार झाली आहेत, त्यामुळे अनेक प्रश्न सुटतील. आपण दाखल केलेले प्रस्ताव मंजूर झाले असून, यावर काही जण आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर शिवसैनिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सत्तेत असो वा नसो विकासाची प्रक्रिया चालूच राहील, चमकणारी वस्तू सोनेच आहे असे नसते हे आता सिद्ध झाले आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कार्यकर्त्यांच्या उत्साहाने मलादेखील शक्ती मिळते. यापुढे प्रत्येक गावच्या प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

या वेळी नगरसेवक शुभम धूत, विठ्ठल बहीर, मनेष भोस्कर, दत्ता काशिद, अर्जुन नलावडे, कालिदास नवले, मुकेश भोकरे, अशोक सोळंके, किशोर पिसाळ, पांडुरंग भोसकर यांच्यासह जिल्हा शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, विभागप्रमुख, उप-विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

160721\16bed_1_16072021_14.jpg

१५ जुलै रोजी बीड तालुक्यातील रूई (लिंबा) येथे शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.