शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर मातृत्वाचे ओझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:55 PM

वय लहान असतानाही मुलींच्या खांद्यावर मातृत्वाचा भार पडत असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा रुग्णालयातील सूत्रांकडून बुधवारी समजली. कमी वयात लग्न होणे किंवा कोणासोबत तरी संबंध आल्याने गरोदर राहणे यासारख्या प्रकारांमुळे अल्पवयीन मुलींना ‘मातृत्व’ येत आहे. शारीरिक व मानिसकदृष्ट्या सुदृढ नसताना ‘ती’ला ‘आई’ची भूमिका बजवावी लागत आहे. यातील अनेकांनी मुले ‘नकोशी’ झाल्याने त्यांना शिशूगृहात पाठविल्याचे सांगण्यात आले. वर्षाला अशा मुलांची संख्या ८ ते १० च्या जवळपास असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देकाळजी न घेतल्यामुळे माता, बाळांच्या जीविताला धोका

सोमनाथ खताळलोकमत न्यूज नेटवर्कबीड : वय लहान असतानाही मुलींच्या खांद्यावर मातृत्वाचा भार पडत असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा रुग्णालयातील सूत्रांकडून बुधवारी समजली. कमी वयात लग्न होणे किंवा कोणासोबत तरी संबंध आल्याने गरोदर राहणे यासारख्या प्रकारांमुळे अल्पवयीन मुलींना ‘मातृत्व’ येत आहे. शारीरिक व मानिसकदृष्ट्या सुदृढ नसताना ‘ती’ला ‘आई’ची भूमिका बजवावी लागत आहे. यातील अनेकांनी मुले ‘नकोशी’ झाल्याने त्यांना शिशूगृहात पाठविल्याचे सांगण्यात आले. वर्षाला अशा मुलांची संख्या ८ ते १० च्या जवळपास असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कायद्यानुसार १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मुलीला लग्न करता येते. परंतु ग्रामीण भागात आजही याबाबत जनजागृती झालेली नाही. परिस्थिती आणि इतर कारणांमुळे १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच मुलींचे हात पिवळे केले जातात. त्यानंतर ‘ती’ गरोदर राहते. एवढ्या कमी वयात ‘तिला’ प्रसुतीला तोंड द्यावे लागते. सुदैवाने काही मुली आपल्या बाळाला सुखरूप जन्म देतात.

परंतु काही मुलींना मात्र खुप त्रास सहन करावा लागतो. शारिरिक वाढ झालेली नसल्याने तिला अनेक ‘कळा’ सहन कराव्या लागतात. यातून बाळाला आणि मातेला सुखरूप बाहेर काढण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांसमोर असते. अनेकवेळा बाळ किंवा माता दगावण्याचीही दाट शक्यता असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

परिस्थितीचा गैरफायदासाधारण तीन महिन्यांपूर्वीची एक घटना आहे. बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर तिच्या परिस्थितीचा फायदा घेत नराधमाने वारंवार अत्याचार केला. यातून ती गरोदर राहिली आणि बाळाला जन्म दिला. एवढ्या कमी वयात तिच्यावर मातृत्वाचे ओझे पडले होते. जिल्ह्यात अशाच घटना इतर ठिकाणीही घडल्याची अनेक उदाहरणे आहेत.

माता आणि बाळाला धोकावय कमी असल्याने पूर्णपणे गर्भाशयाची वाढ झालेली नसते. तसेच अनेकवेळा गर्भाशयात बाळाचीही वाढ झालेली नसते. प्रसूतीदरम्यान, बाळाचे हृदयाचे ठोके कमी होण्याची भीती असते. मातेलाही कळा घेताना त्रास होतो. यामध्ये बाळ आणि मातेचा जीव धोक्यात असतो. परिस्थिती पाहून शस्त्रक्रिया करून बाळाला जन्म दिला जातो. ही सर्व प्रक्रिया डॉक्टरांसाठी आव्हानात्मक असते. यामध्ये बाळ आणि मातेच्या जिवाला धोका पोहचण्याची दाट शक्यता असते.

मातेला जडतात विविध आजारमातेला उच्च रक्तदाबाचा विकार होऊ शकतो. तसेच प्रसुतीनंतर रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. यातुन मातेला विविध आजार जडतात. हे आजार नियंत्रणात आणताना डॉक्टरांना कसरत करावी लागते.

वर्धा येथे होते कुमारी मातांचे संगोपनजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार कुमारी मातांसाठी वर्धा येथे महात्मा गांधी इन्स्टीट्यूट आॅफ मेडिकल सायन्स संस्था आहे. येथे या मातांचे संगोपन आणि समुपदेशन केले जाते. याठिकाणी त्यांची विशेष व्यवस्था केलेली आहे.

काळजी घेण्याची गरजआपल्या मुलीचा विवाह १८ वर्षानंतरच करावा. तसेच मातृत्व येण्यापूर्वी आणि आल्यानंतर आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. वेळोवेळी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.मानसिकदृष्ट्या खचल्यावर समुपदेशक किंवा सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आधा घ्यावा. कायद्याने मदत हवी असल्यास पोलीस किंवा महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क करावा.