शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Election 2019 : बहीण-भाऊ, काका-पुतण्यात होणार लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 05:15 IST

बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तरी महायुतीनेच बाजी मारली आहे.

- सतीश जोशीबीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तरी महायुतीनेच बाजी मारली आहे. एकूण सहापैकी बीडची जागा शिवसेनेकडून रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर तर उर्वरित पाच जागा भाजप लढवित आहे. परळीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या चुलत बहिण-भावात तुल्यबळ लढत होत आहे. बीडमध्ये काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी राष्टÑवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली आहे. एमआयएमकडून शेख शफिक आणि वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.२०१४ मध्ये परळीत भाजपच्या पंकजा मुंडे यांनी राष्टÑवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांचा जवळपास २५ हजार मताधिक्यांनी पराभव केला होता. २००९ मध्ये पंकजा ३६ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी उमेदवारी मिळाली नसली तरी धनंजय मुंडे हे भाजपतच सोबत होते. लोकसभा निवडणूक असो की विधानसभा, परळीत २००९ पासून भाजपचे मताधिक्य ४२ हजारांहून घसरत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही १८ हजारांवर आले होते. माजलगाव आणि केज (राखिव) मध्ये भाजपने विद्यमान आमदारांना नारळ दिला. माजलगावमध्ये रमेश आडसकरांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. रा.काँ.कडून माजी मंत्री प्रकाश सोळंके, केजमध्ये भाजपचे नमिता मुंदडा तर राष्टÑवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे तर आष्टीत भाजपचे आ.भीमराव धोंडे तर राष्टÑवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे उमेदवार आहेत.

रंगतदार लढती२०१४ मध्ये परळीत पंकजा आणि धनंजय यांच्यात लढत झाली. गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती मृत्यूमुळे भावनिक वातावरण होते. शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. यावर्षीही या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.गेवराईत शिवसेनेचे बदामराव पंडित यांनी भाजपा उमेदवार आ.लक्ष्मण पवार यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. या ठिकाणी राष्टÑवादीकडून माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित लढत आहेत. बदामराव हे माजी राज्यमंत्री असून विजयसिंह पंडित यांचे चुलत काका आहेत.बीडमध्ये शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर आणि राष्टÑवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर अशी काका-पुतण्यात लढत होत आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत बीडची जागा राखत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या शिवसंग्रामचे आ.विनायक मेटे यांचा त्यांनी सहा हजार मतांनी पराभव केला होता.

प्रचारातील प्रमुख मुद्दे१) महायुतीकडून जिल्ह्यात केलेल्या विकास कामांची उजळणी२) परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्ग, वॉटरग्रीड प्रकल्पावर महायुतीचा भर३) विम्यापासून शेतकरी वंचित, औद्योगिक विकास नाही : आघाडीचा आरोप४) कलम ३७०, पाकिस्तानला शिकवला धडा, यावर महायुतीचा भर

 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेbeed-acबीडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019