शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

Maharashtra Election 2019 : काश्मीरला विकास प्रवाहात आणले; अमित शहांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 06:07 IST

पाटोदा तालुक्यातील सावरगावघाट येथे भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात अमित शहा बोलत होते.

बीड : देशातील जनतेने आमचे ३०२ खासदार निवडून दिले. आपल्या या शक्तीच्या जोरावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम हटविले आणि काश्मीरला भारताच्या विकास प्रवाहात आणले; परंतु या ३७० कलम रद्द करण्याला काही मंडळी विरोध करीत आहेत. विरोध करणाऱ्यांना तुम्ही जाब विचारणार का नाही, असा सवाल भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.पाटोदा तालुक्यातील सावरगावघाट येथे भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात अमित शहा बोलत होते. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मेळाव्याला ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. काश्मीरविषयक राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केल्याबद्दल अमित शहांना ३७० तोफांची सलामी देण्यात येणार होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्याऐवजी सभास्थळी ३७० जणांनी तिरंगा झेंडा फडकावून गृहमंत्री शहा यांचे स्वागत केलेअमित शहा म्हणाले, भगवानबाबांनी आयुष्यभर दीनदुबळे, वंचितांसाठी संघर्ष केला. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. शिक्षणानेच प्रगती होते, हे त्यांनी कृतीद्वारे दाखवून दिले. गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड कामगार, मजूर यांच्या प्रगतीसाठी आयुष्यभर संघर्ष केला होता. तेच कार्य आज पंकजा मुंडे पुढे नेत आहेत. ७० वर्षांपासून ओबीसी समाज आपल्या हक्कासाठी लढत होता.पंतप्रधान मोदींनी ओबीसी समाजासाठी स्वतंत्र आयोग निर्माण करून त्यांच्यासाठी विकासाची दारे खुली केली. त्यांना संवैधानिक दर्जा प्राप्त करून दिला. वंचित समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संकल्पना मांडली होती. त्या संकल्पनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत.‘पंकजा मुंडे सीएम...’सभेच्या एका कोपºयातून ‘सीएम, सीएम... पंकजा मुंडे सीएम’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. अमित शहा यांचे भाषण संपेपर्यंत ही घोषणाबाजी सुरू होती. घोषणा देणाऱ्यांच्या बाजूने काही सुरक्षारक्षक जात असताना अमित शहा यांनी त्यांना रोखले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाBJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड