शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : काश्मीरला विकास प्रवाहात आणले; अमित शहांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 06:07 IST

पाटोदा तालुक्यातील सावरगावघाट येथे भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात अमित शहा बोलत होते.

बीड : देशातील जनतेने आमचे ३०२ खासदार निवडून दिले. आपल्या या शक्तीच्या जोरावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम हटविले आणि काश्मीरला भारताच्या विकास प्रवाहात आणले; परंतु या ३७० कलम रद्द करण्याला काही मंडळी विरोध करीत आहेत. विरोध करणाऱ्यांना तुम्ही जाब विचारणार का नाही, असा सवाल भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.पाटोदा तालुक्यातील सावरगावघाट येथे भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात अमित शहा बोलत होते. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मेळाव्याला ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. काश्मीरविषयक राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केल्याबद्दल अमित शहांना ३७० तोफांची सलामी देण्यात येणार होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्याऐवजी सभास्थळी ३७० जणांनी तिरंगा झेंडा फडकावून गृहमंत्री शहा यांचे स्वागत केलेअमित शहा म्हणाले, भगवानबाबांनी आयुष्यभर दीनदुबळे, वंचितांसाठी संघर्ष केला. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. शिक्षणानेच प्रगती होते, हे त्यांनी कृतीद्वारे दाखवून दिले. गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड कामगार, मजूर यांच्या प्रगतीसाठी आयुष्यभर संघर्ष केला होता. तेच कार्य आज पंकजा मुंडे पुढे नेत आहेत. ७० वर्षांपासून ओबीसी समाज आपल्या हक्कासाठी लढत होता.पंतप्रधान मोदींनी ओबीसी समाजासाठी स्वतंत्र आयोग निर्माण करून त्यांच्यासाठी विकासाची दारे खुली केली. त्यांना संवैधानिक दर्जा प्राप्त करून दिला. वंचित समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संकल्पना मांडली होती. त्या संकल्पनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत.‘पंकजा मुंडे सीएम...’सभेच्या एका कोपºयातून ‘सीएम, सीएम... पंकजा मुंडे सीएम’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. अमित शहा यांचे भाषण संपेपर्यंत ही घोषणाबाजी सुरू होती. घोषणा देणाऱ्यांच्या बाजूने काही सुरक्षारक्षक जात असताना अमित शहा यांनी त्यांना रोखले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाBJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड