शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

शिरुर कासार तालुक्यातील तागडगावात भगवानबाबांचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:58 AM

शिरुर कासार तालुक्यातील तागडगाव येथे ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांनी प्रारंभ केलेल्या ८५ व्या नारळी सप्ताहाचा गुरूवारी मंहत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते चैतन्यपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. प्रसंगी प्रथमच फूल टाकण्यासाठी खा. प्रीतम मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री सुरेश नवले, संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देमावशीच्या गावात ८५ व्या नारळी सप्ताहास सुरूवात; धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार : तालुक्यातील तागडगाव येथे ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांनी प्रारंभ केलेल्या ८५ व्या नारळी सप्ताहाचा गुरूवारी मंहत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते चैतन्यपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. प्रसंगी प्रथमच फूल टाकण्यासाठी खा. प्रीतम मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री सुरेश नवले, संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती होती. मावशीच्या गावात संत भगवानबाबांच्या जयजयकाराने उथळा परिसर दुमदुमुन गेला होता.प्रथम देव घरात कलश व प्रतिमापूजन सिध्देश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर व्यासपीठावरून मान्यवरांनी बाबांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. नामदेव शास्त्रींच्या आदेशाप्रमाणे सर्व कार्यक्रम होत होते. व्यासपीठावर सर्व मान्यवरांसह शास्त्रीजी उभेच होते. नंतर श्रीक्षेत्र भगवानगडाच्या परंपरेप्रमाणे मानाचे टाळकरी व महाराज मंडळी आणि गडावर अध्यापक असलेले नारायण स्वामी या सर्वांच्या हस्ते टाळ, वीणा, मृदंग, गाथा, ज्ञानेश्वरी पूजन करून हजारो भाविकांनी जयजयकार करत पुष्पवृष्टी केली.तागडगावात हा नारळी सप्ताह होण्याची दुसरी वेळ असून यापूर्वी महंत भीमसिंह महाराज यांच्या हस्ते सन १९५६ मध्ये साजरा झाला होता. तागडगांव हे संत भगवानबाबांच्या मावशीचे गाव. याच गावात त्यांचे बालपण काही काळ गेले होते. त्याशिवाय पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचल्याचे सांगितले जात असल्याने या नारळी सप्ताहाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ग्रामस्थ मोठ्या प्रेमाने बाबाच्या ऐश्वर्याला साजेसा असा सप्ताह साजरा करणार आहेत.सात दिवस आता तागडगावात हा भव्य दिव्य सप्ताह पाहण्यासाठी व अध्यात्मिक आनंद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन ग्रामस्थांनी चोख नियोजन केले आहे. नूतन महंत अतुल महाराज शास्त्री हे देखील लक्ष ठेवून आहेत.सर्व राजकीय पुढाऱ्यांना एका रांगेत उभे करणारे एकच न्यायाचार्य असे सांगून ते सुध्दा उभेच राहिले, असे सांगत गडाप्रती असलेली भावना अगदी अल्प शब्दात माजी मंत्री सुरेश नवले यांनी व्यक्त केली. इतर मान्यवरांनीही यावेळी संत भगवान बाबा यांच्याप्रती मनोगत व्यक्त केले.यावेळी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरातून हजारो भाविक येथे उपस्थित होते.नेता म्हणून नव्हे, तर भक्त म्हणून आले - प्रीतम मुंडेराजकीय भाषण करणार नाही. मी येथे नेता म्हणून नव्हे, तर भक्त म्हणून आले. मी श्रध्देपोटी आले आहे. संत भगवानबाबांनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला होता. पशुहत्याही बंद केल्या. मुुलींचा, महिलांचा सन्मान हीच त्यांची शिकवण असल्याचे सांगून तुमच्या प्रेमाचा आम्हाला गर्व होऊ नये, असे मत खा. मुंडे यांनी व्यक्त केले. मात्र धनंजय मुंडे यांना भाऊ म्हणणे टाळले.मी अध्यात्माचे नियम पाळणारा - धनंजय मुंडेअध्यात्माचे नियम पाळणारा मी असून, हे व्यासपीठ आशीर्वाद घेण्याचे आहे. राजकारण येऊ देऊ नका. आपला जिल्हा अध्यात्मिक क्षेत्रात आघाडीवर आहे. अध्यात्म जपणे आपले काम आहे. मनाच्या मंदिरात बाबांना ठेवा असे सांगून आम्हा बहीण- भावाला या व्यासपीठावर बोलावले, असे म्हणत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बंधू धर्म निभावला.बहीण - भाऊ अन् महंत एकाच मंचावरदसरा मेळाव्यादरम्यान भगवानगडावर राजकीय भाष्य करण्यासंदर्भात विरोध झाला होता. त्यानंतर मुंडे बंधू-भगिनी व महंत नामदेव शास्त्री यांच्याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा होत होती. गुरुवारी नारळी सप्ताहाच्या निमित्ताने खा. डॉ. प्रीतम मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री हे एकाच व्यासपीठावर होते. कार्यक्रमात ते एकत्रित आल्याने दिवसभर चर्चेचा विषय होता.

टॅग्स :BeedबीडPritam Mundeप्रीतम मुंडेDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकMarathwadaमराठवाडा