शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त बीडला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, पंकजांचा थेट प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 11:41 IST

मुसळधार पावसाचा फटका बसून नुकसान झालेल्या परळी तालुक्यातील  गावांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंगळवारी भरपावसात दौरा केला. गावांत जाऊन नुकसानीची पाहणी करत संकटात सापडलेल्या ग्रामस्थ, शेतकऱ्यांना त्यांनी धीर झाला

ठळक मुद्देपालकमंत्री पूरग्रस्त जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला गेले आहेत, असे म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तसेच, राज्य सराकरने दरवेळी केंद्राकडे बोट दाखवणे योग्य नाही.

बीड - गुलाब चक्रीवादळाचा तडाखा मराठवाड्याला बसला असून बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. बीडमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या पावासाने झालं असून अनेक शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. या शेतकऱ्यांना मदती दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय. मात्र, अद्यापही मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यावरुन, पंकजा मुंडेंनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी करताना, मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.  

मुसळधार पावसाचा फटका बसून नुकसान झालेल्या परळी तालुक्यातील  गावांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंगळवारी भरपावसात दौरा केला. गावांत जाऊन नुकसानीची पाहणी करत संकटात सापडलेल्या ग्रामस्थ, शेतकऱ्यांना त्यांनी धीर झाला. नुकसान झालेल्यांना शासनामार्फत मदत मिळवून देण्याचा शब्द देत पिकांबरोबरच शेतजमिनीच्या नुकसानीचीही विशेष भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तर, गुरवारच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं. 

पालकमंत्री पूरग्रस्त जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला गेले आहेत, असे म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तसेच, राज्य सराकरने दरवेळी केंद्राकडे बोट दाखवणे योग्य नाही. राज्य सरकार हे पालक आहे. तर, केंद्र सरकार ग्रँड पॅरेंन्टस, त्यामुळे ते त्यांची जबाबदारी ओळखतात. पण, पालकांनी त्यांची जबाबदारी पूर्ण करायला हवी, असे पंकजा यांनी म्हटले. 

बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या मोठया संकटात आहेत. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे त्यांना विमा मिळत नाही. जलसंपदा मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री हे राजकीय कामासाठी जिल्ह्यात येऊन गेले. पण मंत्र्यांनी राजकीय दौरे करतांना इथल्या शेतकऱ्यांचाही विचार करणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही अशी खंत भाजपच्या राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारीच व्यक्त केली.

सरकारने खबरदारी घेऊन मदत करावी

जोरदार पावसामुळे परळी तालुक्यातील पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यांना मदत तर मिळालीच पाहिजे पण त्याचबरोबर जमिनीची माती देखील वाहून गेली आहे, त्याचीही विशेष नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे. शेतकऱ्यांनी अस्मानी संकटाचा धैर्याने सामना करावा पण आता त्यांचेवर सुलतानी संकट येऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी आणि वेळीच मदत द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेRainपाऊसMarathwadaमराठवाडाBeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडे