शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

तीन पायांच्या सरकारची कुंभकर्णी झोप - प्रविण दरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 4:51 PM

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असतानाही त्यांना मदत करण्याऐवजी राज्यातले तीन पायांचे सरकार अद्यापही कुंभकर्णी  झोपेतच आहे. सरकारला या कुंभकर्णी झोपेतुन जागे करण्यासाठीच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचे अश्रु पुसण्यासाठी आलो आहोत, असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माजलगाव येथील शेतकऱ्यांना धीर दिला.

माजलगाव : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असतानाही त्यांना मदत करण्याऐवजी राज्यातले तीन पायांचे सरकार अद्यापही कुंभकर्णी झोपेतच आहे. सरकारला या कुंभकर्णी झोपेतुन जागे करण्यासाठीच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचे अश्रु पुसण्यासाठी आलो आहोत, असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माजलगाव येथील शेतकऱ्यांना धीर दिला.

ओला दुष्काळ जाहीर करुन बागायतीसाठी ५० हजार तर कोरडवाहु शेतकऱ्यांना २५ हजारांची मदत देण्यात यावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली. बीड जिल्हयात आल्यानंतर दरेकर यांनी गंगामसला, घळाटवाडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. भाजपाचे सरकार असतांना राज्यातील अतिवृष्टी असो की कोल्हापुर जिल्हयात निर्माण झालेली पुरपरिस्थिती, त्यावेळी तात्काळ आमच्या सरकारने मदत दिली होती. आता मराठवाडयात फळबागा उध्वस्त झाल्या आहेत कोरडवाहु जमीनीतील पिके उध्वस्त झालेली आहेत शेतकरी उघडयावर पडलेला असतांना शासन मात्र कुंभकर्णी झोपेतच आहे त्यातच विमा कंपन्या देखील शेतकऱ्यांच्या परीक्षा घेणाऱ्या अटी लादून कातडी बचाओ  धोरण अवलंबू लागल्या आहेत. 

शेतकऱ्यांना मदत, अनुदान व विमा मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचेही दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.  यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, भाजपा तालुकाध्यक्ष अरुण राउत, ज्ञानेश्वर मेंडके, डाॅ. अशोक तिडके, डाॅ. भगवान सरवदे, मनोज फरके, श्रीकृष्ण सोळंके, बाळासाहेब सोळंके, ईश्वर खुर्पे, ज्ञानेश्वर सरवदे, परशुराम सोळंके, अविनाश गोंडे आदींसह भाजपा कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Praveen Darekarप्रवीण दरेकरFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाBJPभाजपा