शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

जयदत्तअण्णा हे कुटुंबप्रमुखाप्रमाणे शिवसैनिकांची काळजी घेणारा नेता -पिंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:26 AM

जयदत्त क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक कामाला लागल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.

ठळक मुद्देशिवसेना पदाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : ग्रामीण भागात कॉर्नर बैठकांवर दिला जातोय जोर

बीड : अवघ्या चार महिन्यात शिवसेनेत दाखल झालेल्या क्षीरसागरांनी सर्वसामान्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आहे. तसेच शिवसैनिकांची कुटूंब प्रमूखाप्रमाणे काळजी ते घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून विधानसभेवर भगवा फडकवणं हे शिवसैनिकांचं काम आहे. जयदत्त क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक कामाला लागल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.बीड मतदार संघातील उदंडवडगाव, मोरगाव, वानगाव, साखरेबोरगाव, गोगलवाडी, रौळसगाव, खडकीघाट, देवीबाभुळगाव व तांदळवाडी घाट येथे जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झालेल्या कॉर्नर बैठकांमधून शिवसैनिकांना संबोधित करतांना बाळासाहेब पिंगळे बोलत होते. यावेळी कुंडलीक खांडे, विलास महाराज शिंदे, गोरक्ष रसाळ, सुरेश शेटे, धनंजय कुलकर्णी, मदनराव पिंगळे, गणेश जाधव आदिंची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलतांना बाळासाहेब पिंगळे म्हणाले, शिवसेनेशी गद्दारी करुन गेलेले लोक आज निष्ठावंत शिवसैनिकांना सल्ले देत आहेत. त्यांच्याबद्दल पुतणामावशीचं प्रेम दाखवत आहेत. शिवसेनेशी गद्दारी करणारांनी आम्हाला काय करावं हे शिकवू नये सांगत पिंगळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. आम्हाला मातोश्रीचा व शिवसेना प्रमूखांचा आदेश महत्वाचा असतो, असे ते म्हणाले. जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्री पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांच्यासारखा विकासाची दूरदृष्टी असलेला नेता बीडचा लोकप्रतिनिधी असणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना