शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

१३६४ गावांसाठी जलजीवन मिशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:34 IST

बीड : जिल्ह्यात जवळपास पावणे पाच लाख कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी नळाने पोहोचविण्यासाठी जलजीवन मिशन उपक्रमातून १३६४ गावांत ...

बीड : जिल्ह्यात जवळपास पावणे पाच लाख कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी नळाने पोहोचविण्यासाठी जलजीवन मिशन उपक्रमातून १३६४ गावांत मोठे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व नळजोडण्या पुढील चार वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे धोरण निश्चित झाले असून, त्याचाच पहिला टप्पा एक लाख नळजोडण्या देऊन पूर्ण केला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. जलजीवन मिशन या केंद्र शासनाच्या उपक्रमात जिल्ह्यातील १३६४ गावांमध्ये पिण्याचे पाणी नळाने उपलब्ध करून देण्यासाठीची मोठी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील वाडी वस्ती तांडा या ठिकाणीदेखील नळाने पिण्याचे पाणी देण्याचे धोरण आखण्यात आलेले आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून जीवन मिशन आराखडे तयार करण्याबाबत स्वच्छ भारत मिशन उपक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व आराखडे तयार झालेले आहेत.

अस्तित्वात असलेल्या नळयोजना तसेच ग्रामपंचायतीअंतर्गत कुटुंबांना दिलेल्या नळजोडण्या अधिकृत करून त्यांची नोंद ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर ९ नोंदवहीमध्ये करण्याच्या सूचना यापूर्वीच ग्रामसेवकांना दिले आहेत.

अस्तित्वात असलेल्या नळजोडण्या तसेच अनधिकृत असलेल्या नळजोडण्या अधिकृत करून त्याची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर करण्याची मोहीम जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांतर्गत घेण्यात आलेली आहे. या मोहिमेमध्ये एक लक्ष नळजोडणीची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात आलेली आहे.

मार्च २०२१ अखेर जिल्ह्यातील अंबाजोगाई व धारूर दोन तालुके १०० टक्के नलजोडणीसाठी उद्दिष्ट म्हणून घेण्यात आले होते. या दोन्ही तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त नळजोडणी झालेली आहे, तर उर्वरित गावांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठीचे आराखडे तयार झाले असून, या आराखड्याला मंजुरी मिळताच कामे पूर्ण होऊन योजनेचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल.

ग्रामीण पाणीपुरवठा पाच उपविभागाचे उपअभियंता तसेच शाखा अभियंता सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, सरपंच यांनी नळजोडणीसाठी विशेष प्रयत्न केले असून आधार कार्ड जोडून ही नळ जोडणी नोंदणी पूर्ण करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या व शाळांना पिण्याच्या पाण्यासाठी वैयक्तिक नळजोडणी देण्याबाबत शासनाचे निर्देश होते. त्याप्रमाणे सर्व ग्रामपंचायतींनी पंधराव्या वित्त आयोगातून शाळा व अंगणवाड्यांना नळजोडणी दिली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता वाघमोडे यांनी दिली आहे.

मार्च २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीमध्ये उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याचे धोरण ठरलेले असून, पहिल्या वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व गटविकास अधिकारी तसेच ग्रामीण पाणीपुरवठाचे उपअभियंता, शाखा अभियंता, ग्रामसेवक यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहेत.