वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:31 IST2021-05-24T04:31:57+5:302021-05-24T04:31:57+5:30
-------- उन्हाची तीव्रता वाढली अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. परिणामी दुपारच्यावेळी रस्त्यांवर ...

वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
--------
उन्हाची तीव्रता वाढली
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. परिणामी दुपारच्यावेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहेत. सकाळी १० वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. सायंकाळपर्यंत उन्हाची तीव्रता कायम राहत आहे. वाढत्या उन्हामुळे थंडपेयांची मागणी व उन्हापासून संरक्षण करणाऱ्या टोप्यांची विक्री सुरू झाली आहे.
---------------
शासकीय कार्यालयात कोरोना नियमांना खो
अंबाजोगाई : कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. असे असतानाही शासकीय कार्यालयांमध्ये या नियमांचा विसर पडलेला दिसून येत आहे. शासकीय कार्यालयात असलेल्या सॅनिटायझरच्या बाटल्या रिकाम्या झाल्या आहेत. तर काही ठिकाणी अडगळीला पडलेल्या आहेत. शासकीय कार्यालयातील कर्मचारी मास्कचा वापर करत नाहीत. कार्यालयात येणाऱ्या व्यक्तीलाही मास्कचा वापर करण्यास सक्ती केली जात नाही.
----------
बँकांमध्ये गर्दी कायम
अंबाजोगाई : शहरात राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँका यांची मोठी संख्या आहे. शहरातील बँकांमध्ये पैसे भरणे, पैसे काढणे व विविध बँकेच्या कामकाजासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँक प्रशासनाकडून कुठल्याही ठोस उपाययोजना आखल्या जात नाहीत. याशिवाय बँकेत कोरोनाविषयी अत्यावश्यक असणारे सॅनिटायझर व सामाजिक अंतराचा वापर याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. या दुर्लक्षामुळे भविष्यात कोरोनाचा धोका वाढतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
--------
उघड्या डीपींमुळे धोका
अंबाजोगाई : तालुक्यात बहुतांश ठिकाणी महावितरणच्या विजेच्या डीपी उघड्या स्थितीत आहेत. यातील अनेक डीपी सहजरित्या हाताला पोहोचतील अशा अवस्थेत आहेत. यातील अनेक डीपींचे दरवाजे तुटून वर्षानुवर्षांचा कालावधी लोटला तरी त्या डीपींना दरवाजे बसविलेले नाहीत. शेतात जाणारी लहान मुले, पशुधन हे कधीही उघड्या डीपीकडे जाऊ शकतात. याचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. अशी भीषण स्थिती असतानाही महावितरणकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
-------
भाजीपालावर्गीय पिकांना फटका
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे शेतातील पिकांसह भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच दररोज असणाऱ्या ढगाळ वातावरणाचा फटका भाजीपालावर्गीय पिकांना बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून याचा मोठा फटका पालेभाज्यांसह फळभाज्यांना बसू लागला आहे. परिणामी बाजारातही भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याचे चित्र आहे.