शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

‘फितूर वाटा मोडूनी मी असा चालतो, स्वप्नांचे फास मी गळा घालतो’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 2:26 PM

अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनात समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या प्रबोधनाचा झाला जागर  

ठळक मुद्देआठवे अंबाजोगाई साहित्य संमेलनात कवी संमेलनाने बहार उडवून दिली.

अंबाजोगाई (मंदाताई देशमुख साहित्यनगरी, मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह) : आठवे अंबाजोगाई साहित्य संमेलनात कवी संमेलनाने बहार उडवून दिली. मंत्रमुग्ध करणाऱ्या चिंतनशील  रचनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करायला लावले. एका पेक्षा एक सरस रचनांनी श्रोते आनंद अनुभूतीत रमून गेले. या सोबतच समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या कवी संमेलनातून प्रबोधनाचा जागर झाला.

कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अखिला गौस तर  कवी संमेलनाचे बहारदार संचालन भागवत मसने यांनी केले. या कवि संमेलनात दिनकर जोशी, प्रा.विष्णू कावळे, बालाजी सुतार, अलीमोद्दीन अलीम, अतहर हुसेन, प्रा. संजय खाडप, अनुपमा मोटेगावकर, गझलकार डॉ.संतोष कुलकर्णी, संमेलनाध्यक्ष गणपत व्यास,  मंजुषा सबनीस (कुलकर्णी),अंजली यादव आदी मान्यवर कवी सहभागी झाले. सुतार आपल्या कवितेत म्हणतात 

‘एक गोळी मस्तक भेदून गेली, पुन्हा एक गोळी आली मस्तक भेदून गेली,मग आणखी गोळी आणखी मस्तक,मग कोणी केलं याचा तपास चालु झाला, होत राहिला संपला नाही कधीच’

असे सांगून  गेल्या काही वर्षात राज्यात व देशात विज्ञानवादी व प्रवर्तनवादी विचार मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना  संपविले जात असल्याचे दाहक वास्तव बालाजी सुतार यांनी आपल्या रचनेत सादर केले. अनुपमा मोटेगावकर यांनी ‘गृहिणी’ या कवितेतून स्त्रियांची घालमेल, स्त्रीत्व याविषयीचे अनुभव, स्त्रियांचे भावना विश्व व स्त्रीची सिद्ध होण्यासाठीची धडपड या रचनेतून त्यांनी सभागृहासमोर ठेवली. उपस्थितांनी या रचनेला मनातून दाद दिली. प्रवर्तनवादी कवी विष्णू कावळे यांनी आपली ‘इथे’ ही रचना सभागृहासमोर ठेवली. प्रा.कावळे आपल्या रचनेत म्हणतात.

‘पुतळयास छळले कोणीबेभान, बेबंद झुंडी येथेजाळले जिवंत कोणास आश्रु ढाळतो कोण येथेदेव तुपात, देवळे दुधातरोज पाजळतात येथे चटणी भाकरीच्या विवंचनारोज छळतात कोणास येथे’ 

या वास्तववादी रचनेतून कावळे यांनी समाजातील भुकेले कंगाल लोकांना भाकरी मिळत नसल्याचे सांगून देव तुपात तर देवळे दूधात पाळजले जातात, मंदिर, मशिदींच्या नावाने लोकांना झुलविले जाते. प्रसंगी लढविले जाते, आपसात रक्तपात घडवून आणला जातो व त्यावर पोळी भाजून भ्रष्ट सत्ताधीश सत्ता काबीज करतात, असा विचार प्रा. कावळे यांनी आपल्या रचनेतून सभागृहासमोर ठेवला तेव्हा रसिकांनी त्याला भरभरून दाद दिली. यावेळी अतहर हुसेन यांनी सामान्य माणसाची आवाज बुलंद करणारी रचना सादर केली. सामान्य माणसाला व्यवस्थेकडून काय अपेक्षा आहे. दोषींना सजा झाली पाहिजे व प्रामाणिक माणूस निर्दोष राहिला पाहिजे. एकूणच न्याय मिळाला पाहिजे. अशी भावना आतहर हुसेन यांनी आपल्या रचनेतून मांडली. प्रा.संजय खाडप यांनी 'कशाला जगतील माणसं' या रचनेतून माणसांच्या विवंचना त्यांचे प्रश्न व जगण्यासाठीची धडपड उभी केली. प्रा.खाडप म्हणतात. 

‘जगणे झाले अवघड,आता मरणे झाले सोपेहिरव्या फांदी वरती काढली, बांधली वाळवंटात खोपेनितीमत्तेची झाली लक्तरे, जुन्या संस्कारावरती,वाटे वरची गेली करपुन सारी रोपे’ 

भागवत मसने यांनी आपल्या बहारदार संचालनाने बहार उडवून दिली. मसने कवितेत म्हणतात.‘दिल्या घेतल्या चिठ्ठ्यांची मी रद्दी केली आहे,त्यावर एक चड्डी घेतली आहे,सये मी प्रियकर कसा असावा’ 

या विषयीचे भाष्य करून सभागृहाला मनमुराद हसवून मसने यांनी वातावरण हलकेफुलके केले. प्रसिद्ध गझलकार डॉ.संतोष कुलकर्णी यांनी आपली गझल सादर केली. तर संमेलनाध्यक्ष गणपत व्यास यांनी ‘मी असेन किंवा नसेन पण काळ चांगला येवो माणुसकीचा झरा लागता अखंड वाहत राहोजलधारांनी इथली माती गंधित होऊन राहो’‘तहानलेली भूक इथली अन्नाविण जावो’

या सारखी रचना सादर केली. मंजुषा सबनीस (कुलकर्णी) यांनी ‘तोच सूर्य तोच उदय, तोच निसर्ग तोच विलय’ या ओळींची ‘प्रसव पहाट’ ही कविता सादर केली. अलिमोद्दीन अलीम यांनी रचना सादर केली. अंजली यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन महिमा सांगणारी रचना सादर करून दाद मिळविली. कविसंमेलनाचे संयोजक प्रा. रमेश सोनवळकर यांनी आभार मानले. प्रा.सागर कुलकर्णी यांनी यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. कवींचे स्वागत संतोष मोहिते व मेघना मोहिते यांनी केले.

कवी संमेलनाची सुरूवात कवी दिनकर जोशी यांच्या रचनेने झाली. जोशी आपल्या कवितेत म्हणतात  फितुर वाटा मोडूनी, मी असा चालतो स्वप्नांचे फास नवे मी गळा घालतो पाळले अंधार त्यांनी सोडले सुर्यावरी, राखण्या सुर्य सारे मी मला जाळतो. चालतो...चालतो.. या रचनेतून जगण्याची आस आसणारे लोक स्वप्नांचे नवे फास गळ्याभोवती बांधतात. वाटा फितूर झाल्या तरी चालणे सोडलेले नाही. सूर्याचा लख्ख प्रकाश राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रकाशगीत दिनकर जोशी यांनी सादर केले. या प्रसंगी बालाजी सुतार यांनी आपल्या रचनेत सभोवतालचे अस्वस्थ मांडले. समाजातील परिवर्तनवादी विचार संपविण्याचे काम सुरू असल्याचे सांगून एका नंतर एक प्रवर्तनवादी विचार गोळ्यांना बळी पडत आहेत. हे सांगून त्यांनी व्यवस्थेतील मर्मावर भाष्य केले. 

टॅग्स :literatureसाहित्यAmbajogaiअंबाजोगाईBeedबीड