शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दुचाकीचोरांचा बीड जिल्ह्यात हैदोस; महिन्याभरात २० दुचाकी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:50 IST

चोऱ्या, दरोडे, लुटमारीच्या घटनांपाठोपाठ आता दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिनाभरात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल २० दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांकडून महिनाभरापासून एकही मोठी कारवाई झालेली नाही.

बीड : चोऱ्या, दरोडे, लुटमारीच्या घटनांपाठोपाठ आता दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिनाभरात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल २० दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दुचाकी चोरांची टोळीच सक्रिय असल्याचे यावरून दिसून येते. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून या टोळीच्या मुसक्या आवळून जनतेचा विश्वास जिंकणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांकडून महिनाभरापासून एकही मोठी कारवाई झालेली नाही. त्यामुळेच चोरटे जिल्ह्यात सक्रिय होत चालले आहेत. बीड शहरातील साठे चौकातून पाच लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करणे, गेवराई तालुक्यातील धोंडराई परिसरातील वस्तीवरील दरोडा, कडा येथील शेत वस्तीवरील दरोडा, बीड शहरातील दिवसाढवळ्या झालेल्या चोऱ्या ही याची ज्वलंत उदाहरणे आहेत. एवढ्या घटना घडूनही पोलिसांना अद्याप याचा तपास लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

यातच मागील महिनाभरापासून विविध ठिकाणी लावलेल्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. परळी शहरातील थर्मल गेटसमोरुन ३० एप्रिल रोजी मोतीराम संपती चाटे यांची दुचाकी चोरीला गेली. त्यानंतर अंबाजोगाई शहरातून कृष्णा धन्वे या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची दुचाकी लंपास केली. धारुर येथील नगर पालिकेसमोरुन स्वप्नील धनवडे यांची नवी कोरी दुचाकी चोरट्यांनी पळवली. एक मे रोजी सिरसाळा येथील इदगाह मस्जिदसमोरुन नदीम खलील कुरेशी या तरुणाची दुचाकी चोरीला गेली. २७ एप्रिल रोजी परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील संचारेश्वर विद्यालयासमोरुन अनंता खाटीक या शेतकऱ्याची दुचाकी चोरट्यांनी पळविली. अशा अनेक घटना मागील महिनाभरापासून जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दुचाकी चोरींची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. चोरी गेलेल्या दुचाकी शोधण्यात अद्याप पोलिसांना यश आले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नागरिकांनीच घ्यावी वाहनाची काळजीकामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक कुठेही दुचाकी पार्किंग करतात. हँडल लॉक करुन आपले काम करुन येतात. परत आल्यानंतर दुचाकी चोरीस गेल्याचे आढळते. त्यामुळे नागरिक हँडल लॉक केले म्हणजे सुरक्षितता आहे असे न समजता आपल्या वाहनांकडे दुरुन का होईना लक्ष ठेवावे, सिक्युरिटी सेन्सरचा वापर करवा तसेच  शक्यतो सीसीटीव्हीच्या निगराणीखाली वाहने ठेवावीत. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

दोन महिन्यांपूर्वी पकडली टोळीदोन महिन्यांपूर्वी गेवराई तालुक्यातील कोळगाव परिसरातील एक टोळी स्थानिक गुन्हे शाखेने पकडली होती. त्यांच्याकडून १२ दुचाकी जप्त केल्या होत्या. त्यानंतर केज परिसरातून एक टोळी जेरबंद केली होती. त्यांच्याकडून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. माजलगाव येथे कवडगाव परिसरातील दुचाकी चोरांना पकडण्यात आले. यानंतर मात्र एकही कारवाई झाली नसल्याचे दिसून येते.

पथके काम करीत आहेतघडलेल्या घटनांचे तपास लावणे सुरु आहेत. काही संशयित असून, त्यांना लवकरच ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल. सर्व चोऱ्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण केला जाईल. नागरिकांनीही काळजी घ्यावी. चोरी गेलेल्या दुचाकी परत मिळवून देण्यासाठी व चोरट्यांना बेड्या ठोकण्यासाठी आमची पथके काम करीत आहेत.- घनश्याम पाळवदे, पो. नि., स्थानिक गुन्हे शाखा, बीड

टॅग्स :Crimeगुन्हाtwo wheelerटू व्हीलरBeed policeबीड पोलीसtheftचोरी