शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

गेवराईत मुसळधार पाऊस; चार वर्षानंतर बामणी नदी प्रवाहित होऊन आला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 6:26 PM

नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक जवळपास २ तास ठप्प झाली होती. 

ठळक मुद्देया पावसाने परिसरातील शेतकरी सुखावला असुन पेरण्याला वेग आला आहे.

गेवराई : तालुक्यातील सिरसदेवी, भेंडटाकळी, अर्धामसला शिवारात गुरूवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे बामणी नदी तब्बल चार वर्षानंतर प्रवाही झाली.  नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक जवळपास २ तास ठप्प झाली होती. 

तालुक्यातील गुरूवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. सिरसदेवी, अर्धामसला, भेंडटाकळी, वाहेगावसह विविध भागातील ओढ्याला, नाल्याला पाणी आले. परिसरात झालेल्या पावसाने भेंडटाकळी येथील बामणी नदी तब्बल ४ वर्षांनंतर प्रवाही झाली असल्याची माहिती येथील नागरिक विशाल कोळपे यांनी दिली. नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने भेंडटाकळी ते नाथापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले.

यामुळे या मार्गावरील वाहतुक तब्बल दोन तास बंद झाली होती. पुलाच्या दोन्ही बाजुने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. धोकादायक वाहणाऱ्या पाण्यातून काही नागरिक, महिला मार्ग काढत निघाले. यात देवदर्शनासाठी गेले एक नव विवाहित जोडपेही होते.

तर काही दुचाकीस्वारांनी देखील यातून मार्ग काढला. या पावसाने परिसरातील शेतकरी सुखावला असुन पेरण्याला वेग आला आहे. 

टॅग्स :RainपाऊसBeedबीड