शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

'पिकांचा पंचनामा करा'; आडसमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 7:28 PM

आठवडी बाजार असल्याने रस्त्यावर वाहनांच्या लागल्या रांगा

केज (बीड ) : तालुक्यातील आडस परिसरातील शेतकऱ्यांनी खरीपाच्या करपलेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले. धारूर-अंबाजोगाई रस्त्यावरील शिवाजी महाराज चौकात शनिवारी (दि. ३१) सकाळी १० वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

आडस परिसरात मागील दोन वर्षांपासून पावसाने अवकृपा केली आहे. पावसाळ्याचे अर्धे दिवस होऊनही सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस आहे. यामुळे खरीपाची पिके करपली आहेत.अल्प मुदतीची पिके फुलोऱ्यात व शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना पूर्णपणे करपून गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती कांहीच लागणार नाही. जवळ होते नव्हते ते पेरणीत खर्च झाल्याने या भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा सन-२०१७ चा खरीपाच्या पिकांचा विमा, सन-२०१८ हंगामातील तांत्रिक अडचणीमुळे न मिळालेला पिकविमा वाटत करावा, चालू हंगामात पिकविम्यासाठी बँक कर्मचाऱ्यांकडून होणारी अडवणूक थांबवावी, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने दावणीला चारा द्यावा अशा या मागण्यांसाठी शनिवारी अर्धातास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी नायब तहसीलदार आशा वाघ यांना मागण्यांचे निवेदन दिले. 

आंदोलनात बाळासाहेब देशमुख, शिवरूद्र आकुसकर, उद्धवराव इंगोले, सरपंच बालासाहेब ढोले, शिवसेनेचे विकास काशिद, गजानन देशमुख, रमेश ठाकुर, राजाभाऊ देशमुख, वैभव इंगोले, इसाक शेख, गोविंद पाटील, बालासाहेब आकुसकर यांच्यासह आडस परीसरातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीState Governmentराज्य सरकारRainपाऊस