शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयात मुलींचे हात पिवळे; मराठवाड्यातच लागले सर्वाधिक बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 18:14 IST

केंद्र व राज्य शासनाकडून जनजागृती, उपाययोजना आदींच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असली तरी हे बालविवाह रोखण्यात त्यांना अपयश आल्याचे दिसते.

ठळक मुद्देपरभणी अव्वल तर बीड दुसऱ्या स्थानीटॉप १० मध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा समावेश

- सोमनाथ खताळबीड : अल्पवयीन मुलींचे हात पिवळे करून त्यांना बोहल्यावर चढविण्यात राज्यात सर्वात आघाडीवर मराठवाडा आहे. यात परभणी जिल्हा अव्वल असून बीड दुसऱ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे टॉप १० मध्ये मराठवाड्यातील सर्वच १० जिल्ह्यांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ (२०१९-२०) मधून युनिसेफ, एसबीसी ३ आणि महिला व बालविकास विभागाने ही माहिती दिली आहे. या आकडेवारीने चिंता व्यक्त केली जात आहे.

बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ४ मध्ये बीड जिल्हा बालविवाह लावण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर होता. जालना दुसऱ्या तर परभणी आणि औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर होते. पाचव्या सर्वेक्षणात परभणीतील बालविवाहाचा आकडा वाढला असून, इतर जिल्ह्यांना कमी करण्यात यश आले आहे. असे असले तरी राज्यात बालविवाह थांबले नसल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्र व राज्य शासनाकडून जनजागृती, उपाययोजना आदींच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असली तरी हे बालविवाह रोखण्यात त्यांना अपयश आल्याचे दिसते. केवळ कागदी घाेडे नाचविण्यात प्रशासन धन्यता मानत असून आजही मराठवाड्यात अल्पवयीन मुलांना हात पिवळे करून बोहल्यावर चढविले जात आहे. हे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आव्हान शासन आणि प्रशासनासमोर असणार आहे.

आजी मरायच्या आत नातीचे लग्न..बालविवाहाचे मूळ कारण परिस्थिती आहे. ऊसतोडणीला जाताना जोडीला जास्त उचल (पैसे) मिळतात म्हणून लग्न लावून दिले जाते. तर आई-वडील कारखान्याला गेल्यावर मुलीची सुरक्षितता आणि संरक्षण हा महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे विवाह लावून पालक जबाबदारी दूर करतात. तसेच आजी मरायच्या आत नातीचे लग्न व्हावे, कमविणारा अथवा नाेकरदार मुलगा भेटल्यास, कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यास एक वर्षाच्या आत लग्न लावणे, इतरांची मुलगी पळून गेली मग आपली पण जाईल का, या भीतीने मुलींचे हात पिवळे केले जात असल्याची उदाहरणे बीड जिल्ह्यात घडली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

२०० बालविवाह रोखण्यात यश बालविवाहांसदर्भात आम्हाला गोपनीय तक्रार प्राप्त होते. आम्ही लगेच प्रशासनाला मदतीला घेऊन संबंधित ठिकाणी जाऊन हा विवाह थांबवितो. वधू व वर यांच्या माता-पित्यांचे समुपदेशन करून त्यांना रीतसर नोटीस देतो. २०२१ या वर्षात बीड जिल्ह्यात जवळपास २०० बालविवाह रोखण्यात यश आले आहे. एकट्या मे महिन्यात ८३ विवाह रोखले.- तत्त्वशील कांबळे, राज्य बालहक्क कार्यकर्ता

बालविवाह रोखण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षणबालविवाहच्या प्रमाणात परभणी अव्वल असून बीड दुसऱ्या स्थानी आहे. बीडचे प्रमाण सर्वेक्षण ४ पेक्षा आता कमी झाले आहे. बालविवाह रोखण्याच्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वीच बीडमध्ये सर्वांना कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देण्यात आले आहे.- सोनिया हांगे, प्रकल्प समन्वयक, युनिसेफ, एसबीसी ३ व महिला व बालविकास विभाग, बीड

पहा आकडेवारी काय सांगतेय : जिल्हा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ४परभणी ४८ ४५बीड ४३ ५२धुळे ४० ३५सोलापूर ४० ३७हिंगाेली ३८ ४१उस्मानाबाद ३७ ३१औरंगाबाद ३६ ४५जालना ३५ ५०नांदेड ३४ ४२लातूर ३३ ३७ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडMarathwadaमराठवाडाmarriageलग्नMaharashtraमहाराष्ट्र