शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
3
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
4
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
5
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
6
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
7
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
8
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
9
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
10
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
11
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
12
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
13
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
14
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
15
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
16
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
17
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
18
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
19
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
20
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

परीक्षा तोंडावर असताना लिहिण्याची सवय मोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST

अंबाजोगाई : गेल्या वर्षभरापासून शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहे. या ऑनलाईन पद्धतीमुळे हस्तलेखनाचा सराव मोठ्या ...

अंबाजोगाई : गेल्या वर्षभरापासून शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहे. या ऑनलाईन पद्धतीमुळे हस्तलेखनाचा सराव मोठ्या प्रमाणात कमी झाला. आता महिनाभरातच दहावी व बारावीची परीक्षा सुरू होईल. अशावेळी लिखाणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव न राहिल्यास परीक्षा देतांना त्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागेल की काय? अशी चिंता पालकांना भेडसावू लागली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाईन सुरू झाले. गेल्या वर्षभरापासून सर्वच विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकविला जातो. बहुतांश विद्यार्थी कोरोनाच्या भीतीमुळे घरात बसूनच ऑनलाईन अभ्यास करू लागले होते. अजूनही विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईनच सुरू आहे. आता सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील. इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा महिनाभरावर येऊन ठेपल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी सातत्याने मोबाईल, लॅपटॉप व संगणकाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यामुळे त्यांचा हस्तलेखनाचा सराव अचानक बंद झाला. सर्व काही ऑनलाईनच झाले. दैनंदिन जीवनात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात होणाऱ्या दैनंदिन तासिका. तासिका व्यतिरिक्त लावण्यात आलेल्या शिकवण्या यामध्येही पुन्हा तेच मिळणारे शिक्षण याचा सराव मोठ्या पद्धतीने लिखाणातूनच होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना हस्तलेखनाचा सराव दैनंदिन असतो. मात्र, आता या हस्तलेखनापासून विद्यार्थी दूर राहिले आहेत. आता परीक्षा जवळ आल्याने व लिखाणाचा सराव घटल्याने त्यांना लिखाणाचा मोठा सराव करावा लागणार आहे. अन्यथा लिहितांना वेळ अपुरा पडणे या गंभीर समस्येला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. याबाबतीत विद्यार्थ्यांनी वेळीच दक्षता बाळगून लिखानाचा सराव करावा म्हणजे त्यांना कोणतीही समस्या उद्भवणार नाही, असा सल्ला प्रा. चंद्रकांत मुळे यांनी दिला आहे. आपल्या पाल्याला लिखाणाबाबत अशा अडचणी निर्माम होतील की काय? अशी भीती पालकांना भेडसावू लागली आहे.