शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

धारूरच्या डोंगरात गावरान मेव्याचे वैभव परतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 6:28 PM

शेतकऱ्यांनी माळरानावर तब्बल १,६०० झाडे लावली आहेत. 

ठळक मुद्देजलसंधारणामुळे आशेचा किरण  जायभायवाडीत माळरानावर फुलली पुन्हा सीताफळाची झाडे

- अनिल महाजन 

धारूर (जि. बीड) : ऊसतोड कामगारांचे गाव असलेले धारूर तालुक्यातील जायभायवाडी हे सीताफळासाठीही प्रसिद्ध. मात्र, सततच्या दुष्काळामुळे  हे गाव उजाड झाले. आता जलसंधारणाच्या कामातून येथे आशेचा किरण दिसू लागला असून, गावरान मेव्याचे गतवैभव आणण्यासाठी जायभायवाडीच्या शेतकऱ्यांनी माळरानावर तब्बल १,६०० झाडे लावली आहेत. 

अतिदुर्गम भागात आणि डोंगरदरीत असलेल्या जायभायवाडी गावात सीताफळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होते. एके काळी याच गावात सीताफळ खरेदी करण्यासाठी बाहेरचे मोठे व्यापारी येत. सीताफळाचा दर्जा आणि आकार पाहून सौदे व्हायचे. परिसरातल्या लोकांना रोजगार मिळायचा. शेतकऱ्यांनाही पैसा मिळू लागला. 

दररोज किमान दोन ट्रक भरून सीताफळे खरेदी करून बाहेरगावचे व्यापारी विक्रीसाठी नेत असत; परंतु मागील सहा- सात वर्षांत निसर्गाने धोका दिला. झाडे पाण्याअभावी वाळून गेली. सीताफळातून मिळणारा आर्थिक स्रोत बंद झाला; पण म्हणून येथील शेतकरी खचले नाहीत. गावातील अशोक महादेव जायभाये, मनोज पंडितराव जायभाये, बाबासाहेब पांडुरंग जायभाये, उपसरपंच डॉ. सुंदर अर्जुन जायभाये आदी शेतकऱ्यांनी प्रत्येकी ४०० (एकूण १,६००) झाडे लावली. विशेष म्हणजे माळरानावर जेसीबीने खड्डे खोदून त्यात रोपे लावली. निसर्गाने साथ दिली, तर येणाऱ्या चार-पाच वर्षांत पहिल्यासारखेच नंदनवन फुलणार, असा विश्वास हे शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

चौघांपासून प्रेरणाजून २०१८ मध्ये या चौघांनी झाडे लावलेली आहेत. येत्या दोन वर्षांत वाढणाऱ्या झाडांना फळे लगडणार असून, चांगला भाव मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांचे पाहून ग्रामस्थही प्रेरणा घेत कष्ट करीत आहेत. येत्या जूनमध्ये थोडी- फार झाडे लावावीत. शेतीला पूरक उद्योग म्हणून सीताफळाची शेती करावी, पुन्हा या उजाड झालेल्या डोंगरावर सीताफळाची शेती करून स्वत:साठी आर्थिक स्रोत उभा करावा म्हणून जलसंधारण चळवळीतून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

जलबचतीवर भर :

या शेतकऱ्यांनी बोअरवरून झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. त्याचबरोबर पाण्याचा अतिवापर होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेतलेली आहे. दोन वर्षांपासून जायभायवाडीत जलसंधारणाची जी कामे झालेली आहेत, त्याचा फायदा झाला. बोअर आणि विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. बंद पडलेले बोअर चालू झाले. प्रत्येक ओढ्यावर सिमेंट बंधारे, लहान लहान ओघळीवर अनघड दगडी बांध, माती बंधारे यासारखे उपचार  केले. तळहाताला फोड येईपर्यंत ग्रामस्थांनी कष्ट केले. त्याचे फळ लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

टॅग्स :fruitsफळेagricultureशेतीFarmerशेतकरी