शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

स्वातंत्र्यसैनिक भास्करराव देशमुख यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 4:03 PM

भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यात होता सक्रीय सहभाग

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक भास्करराव देशमुख याचे वृद्धापकाळाने वयाच्या ८८ वर्षी निधन झाले. मंगळवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता नांदेड येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी ५ वाजता नांदेड येथील गोवर्धन घाट स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नांदेड जिल्ह्यातील चिकाळा येथील मुळ रहिवासी असलेले भास्करराव देशमुख यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यात हिरहिरीने सहभाग घेतला होता. इंग्रजांविरुद्ध महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या स्वातंत्र लढ्यात नांदेड जिल्ह्यातील ते एक प्रमुख कार्यकर्ते होते. त्यावेळेसच्या अनेक आंदोलनात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात सहभाग घेतला होता. 

भास्करराव देशमुख मागील अनेक दिवसापासून वृद्धापकाळाने आजारी होते. त्यांच्यावर काही महिन्यांपूर्वी अन्ननलिकेच्या त्रासावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात व अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मध्यंतरी या आजारातुन थोडा दिलासा मिळाल्यावर त्यांनी नांदेड येथे आराम करणे पसंद केले असल्यामुळे सध्या ते नांदेड येथेच वास्तव्यास होते. गत दोन दिवसांपासून त्यांना परत त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र त्यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही. यातच आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि पुणे येथील उद्योजक मुकुंद देशमुख यांचे ते वडील होत.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडNandedनांदेडAmbajogaiअंबाजोगाई