शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

बीडमध्ये चार माणसं, ६३ जनावरं मेली, शेतीचेही नुकसान; मंत्री, खासदार, आमदार आहेत कुठं?

By सोमनाथ खताळ | Updated: May 27, 2025 12:58 IST

शेतकऱ्यांच्या मदतीला कोणीच येईना; नुकसानभरपाई सोडा, पाहणीसाठीही कोणी जाईना

बीड : जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. आतापर्यंत वीज पडून व इतर अपघातांमध्ये चार माणसे आणि ६३ जनावरे दगावली आहेत. फळबागा, बागायती जमिनींचे नुकसान झाले आहे. रस्ते खचले, पूलही वाहून गेले. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वादळ वाऱ्यात घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. असे असतानाही अद्यापतरी लोकप्रतिनिधी म्हणून एरव्ही बांधावर जाऊन फोटोसेशन करणारे मंत्री, खासदार, आमदार सामान्यांच्या मदतीसाठी धावलेले नाहीत. नुकसानभरपाई देणे तर सोडाच पण साधी भेट देण्याची तसदीही कोणी घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांना कोणी वाली आहे की नाही? मंत्री, खासदार, आमदार आहेत तरी कुठे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

साधारण ७ जूननंतर पावसाला सुरुवात होत असते. परंतु यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली आहे. काही वेळा तर वादळ, वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात शेतात काम करताना, घरी जाताना, गोठ्यात बसल्यावर अंगावर वीज पडून चौघांचा मृत्यू झाला. तसेच अंगावर झाड पडून, वीज पडून व इतर नैसर्गिक अपघातात आतापर्यंत ६३ लहान-मोठे जनावरी दगावली आहेत. तसेच पावसाने अनेक ठिकाणी शेती वाहून गेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्वांना भरपाई देण्याची मागणी सामान्य लोकांमधून होत आहे. परंतु अद्याप तरी मंत्री, खासदार, आमदार हे बांधावर गेलेले नाहीत. खरीप पेरणी झालेली नसली तरी त्या आधीही भरपूर नुकसान झालेले आहे. लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला तरच शेतकऱ्यांना लवकर मदत मिळण्यास मदत होणार आहे.

३८ हेक्टर जमीन खरडून गेली२२ मे रोजी आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आला होता. तसेच याच पावसाने तब्बल ३८ हेक्टर जमीन खरडून गेल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. परंतु प्रत्यक्षात यापेक्षाही जास्त नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

अशी आहे नुकसानीची आकडेवारीजीवितहानीमयत - ४जखमी - ३जनावरे - ६६

शेतीचे नुकसानबागायत जमीन - १३३ हेक्टरफळबाग - ७७ हेक्टरघरांची पडझड - ३३गोठे - ६

मदतीसाठी सरसावले शेकडो हातवडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथील अभिमन्यू पांडुरंग नलबे (४०) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन लहान मुली, एक मुलगा आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने मदतीसाठी शेकडाे हात सरसावले. माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी भेट देत मदत केली. परंतु विद्यमान कोणत्याही लोकप्रतिनिधीने त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली नाही, असे बद्रिनाथ व्हरकटे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत हेच राजकीय नेते दिवसातून चार चकरा मारत होते. अशीच अवस्था इतर ठिकाणची आहे.

अजित पवार बीडचे पालकमंत्रीअजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत. त्यांनी सोमवारी सकाळीच बारामतीमध्ये जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. परंतु बीड जिल्ह्यातही अनेकांचे जीव गेले असून, नुकसानही झाले आहे. ते उपमुख्यमंत्री असल्याने त्यांना येणे शक्य नसले तरी इतर मंत्र्यांना पाठवून त्यांनी पाहणी करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा राहील. दोन दिवसांपूर्वी आलेले मंत्री संजय शिरसाट यांनीही अनेकांच्या निवासस्थानी भेटी दिल्या; परंतु नुकसानीची पाहणी अथवा मयतांच्या कुटुंबांची भेट घेतली नाही.

बीड शहरात पायी चालणे अवघडबीड शहरात तर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पायी चालणेही अवघड झाले आहे. थोडाही पाऊस झाला की नाल्यातील पाणी आणि कचरा रस्त्यांवर येतो. सर्वत्र घाणच घाण आणि चिखल होतो; परंतु यावरही कोणीच बोलायला तयार नाही. निवडणुका जाहीर होताच पाण्यासाठी काही लोक आक्रमक झाले आणि पत्रकबाजी केली. परंतु नंतर त्याचे पुढे काय झाले? याचा कोणीही पाठपुरावा केला नाही. याचा त्रास सामान्य बीडकरांना बसत आहे. अशीच अवस्था इतर शहरे आणि अनेक गावांमधील आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी