शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊनच शेती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही जिरायत आहे. सर्वस्वी पावसावरच अवलंबून असणारे क्षेत्र जास्त आहे. पूरक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही जिरायत आहे. सर्वस्वी पावसावरच अवलंबून असणारे क्षेत्र जास्त आहे. पूरक पाणी पुरविण्याची साधने अपुरी आहेत. यासाठी शेतकऱ्यांना पाऊस व हवामानाची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. सध्या बदलत्या हवामान परिस्थितीत ही गरज आणखी वाढली आहे.

यापुढील काळात शेती ही हवामानाचा अंदाज घेऊनच करावी, असे हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले आहे.

आष्टी तालुक्यातील निमगाव चोभा येथे सोमवारी ग्रामस्थांनी पंजाबराव डख यांचा सत्कार केला. याप्रसंगी डॉ.डख बोलत होते. संपूर्ण देशात पाऊस पडत असतो. परंतु आपल्या भागात पाऊस नक्की कधी येणार आहे याची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना माहिती असायला हवी. त्यामुळे शेती करताना पेरणी वेळेवर करून शेतीच्या कामासाठी योग्य नियोजन करता येते. हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते. त्यामुळे शेती करताना काही ठोकताळे असतात. त्याचा वापर करून शेती करावी. यापुढील काळात प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी पाच झाडे लावावीत. हवामान बदलामुळे प्रत्येक वर्षी तापमानात कमी जास्त प्रमाणात वाढ होत आहे. हवामानात होणारे बदल व त्याचे परिणाम हे शेतीवर मोठ्या प्रमाणावर होत असतात. मोसमी वारे, मान्सूनचा पाऊस, चक्रीवादळ, गारपीट, याविषयी शेतकऱ्यांना डख यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी आष्टी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला डॉ. सुनील गाडे, सरपंच मधुकर गिऱ्हे, विजय शेळके, सुनील गिऱ्हे, माणिक सरोदे, दादासाहेब गाडे, शरद कुमखले, महादेव सोनवणे, मनोज सातपुते, रघुनाथ कर्डिले, भाऊसाहेब गाडे यांच्यासह गावातील तरुण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

....

मी तीन वर्षांपासून पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या हवामानाचा सखोल अभ्यास केला. आतापर्यंत त्यांनी सांगितलेला हवामान अंदाज निश्चितच चुकलेला नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या पावसाच्या अंदाजाचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाल्याचे दिसून आले आहे.

- राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.

060721\img-20210706-wa0361_14.jpg