शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊनच शेती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही जिरायत आहे. सर्वस्वी पावसावरच अवलंबून असणारे क्षेत्र जास्त आहे. पूरक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही जिरायत आहे. सर्वस्वी पावसावरच अवलंबून असणारे क्षेत्र जास्त आहे. पूरक पाणी पुरविण्याची साधने अपुरी आहेत. यासाठी शेतकऱ्यांना पाऊस व हवामानाची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. सध्या बदलत्या हवामान परिस्थितीत ही गरज आणखी वाढली आहे.

यापुढील काळात शेती ही हवामानाचा अंदाज घेऊनच करावी, असे हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले आहे.

आष्टी तालुक्यातील निमगाव चोभा येथे सोमवारी ग्रामस्थांनी पंजाबराव डख यांचा सत्कार केला. याप्रसंगी डॉ.डख बोलत होते. संपूर्ण देशात पाऊस पडत असतो. परंतु आपल्या भागात पाऊस नक्की कधी येणार आहे याची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना माहिती असायला हवी. त्यामुळे शेती करताना पेरणी वेळेवर करून शेतीच्या कामासाठी योग्य नियोजन करता येते. हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते. त्यामुळे शेती करताना काही ठोकताळे असतात. त्याचा वापर करून शेती करावी. यापुढील काळात प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी पाच झाडे लावावीत. हवामान बदलामुळे प्रत्येक वर्षी तापमानात कमी जास्त प्रमाणात वाढ होत आहे. हवामानात होणारे बदल व त्याचे परिणाम हे शेतीवर मोठ्या प्रमाणावर होत असतात. मोसमी वारे, मान्सूनचा पाऊस, चक्रीवादळ, गारपीट, याविषयी शेतकऱ्यांना डख यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी आष्टी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला डॉ. सुनील गाडे, सरपंच मधुकर गिऱ्हे, विजय शेळके, सुनील गिऱ्हे, माणिक सरोदे, दादासाहेब गाडे, शरद कुमखले, महादेव सोनवणे, मनोज सातपुते, रघुनाथ कर्डिले, भाऊसाहेब गाडे यांच्यासह गावातील तरुण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

....

मी तीन वर्षांपासून पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या हवामानाचा सखोल अभ्यास केला. आतापर्यंत त्यांनी सांगितलेला हवामान अंदाज निश्चितच चुकलेला नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या पावसाच्या अंदाजाचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाल्याचे दिसून आले आहे.

- राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.

060721\img-20210706-wa0361_14.jpg