शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणीतसाठी शेतकरी मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST

राजेश राजगूरु तलवाडा शेतकऱ्यांनी कोणतेही पीक घेतले तरी ते उत्पादित करून बाजारात नेऊन हातात मेहनतीचे पैसे येईपर्यंत संकटे ...

राजेश राजगूरु

तलवाडा

शेतकऱ्यांनी कोणतेही पीक घेतले तरी ते उत्पादित करून बाजारात नेऊन हातात मेहनतीचे पैसे येईपर्यंत संकटे येणार नाहीत, हे शक्यच नसल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. ऊसतोड मजुरांकडून ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होताना दिसत आहे.यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने शेतकरी मात्र भरडला जातोय. शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पैसे येण्याअगोदर या लोकांची भरती करावी लागत असल्याने ऊसतोडणीतही शेतकरी मेटाकुटीला येत आहे.

कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, ज्वारी व इतर पिकांच्या उत्पन्नाची शाश्वती दिवसेंदिवस कमी होत असल्याने तालुक्यातील शेतकरी भरवशाचे पीक म्हणून उसाच्या लागवडीवर भर देत आहे.

इतर पिकांच्या तुलनेत एकरी ३०-४० टनापर्यंत ऊस निघाला तर परवडतो, अशा विश्वासामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

मात्र ऊसतोडणीसाठी एकरी पाच ते दहा हजार रुपयांचा दर या मजुरांनी ठेवलेला आहे. त्यातच प्रत्येक खेपेला वाहनचालकास कारखान्याच्या अंतरानुसार पाचशे ते एक हजार रुपये द्यावे लागत आहेत. ऊस गाळपासाठी नेण्यास शेतकऱ्यांचा विशिष्ट कोड घ्यावा लागतो. त्यासाठी शेतकऱ्यांकडून दोन हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळली जाते. हा गोरखधंदा बिनबोभाटपणे सुरू आहे. याबाबत तक्रार करण्यास कोणताही शेतकरी धजावत नसल्याने या लोकांचे जास्तच फावले आहे.

एकरी १०-१२ हजारांचा खर्च

मजुरांनी ऊसतोडणीचे रेटकार्डच बनवलेले आहेत. यात मजुर एकरी ५-१० हजार,चालक खेपेला ५००-१००० रुपये, एकरी २-३ खेपा जातात. कोडचे १००० रुपये, कारखान्याच्या कर्मचाऱ्यास असा एकरी १०-१२ हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना येत आहे.

मजुरांबद्दल सहानुभती शेतकऱ्यांच्या मुळावर

ऊसतोड कामगारांना मोठ्या कष्टाचे काम करावे लागते. याबाबत सगळीकडून सहानुभूती व आत्मियतेची भावना मिळते.मात्र या मजुरांना कारखान्याकडून टनाप्रमाणे मजुरी मिळते. उसाचे वाढे विकूनही थोडेफार पैसे मिळतात. आणि ऊसतोडणीसाठी शेतकरीही खुशीने एकरी २-३ हजार देत असतात; पण ऊसतोड मजुर शेतकऱ्यांची कीव करताना दिसत नाही. अडवणूक करीत असल्याचे चित्र आहे.

काही कारखान्यांचेच नियंत्रण

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या लुटीवर तसेच कारखान्यांच्या मजुरांवर कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे नियंत्रण असल्याने शेतकऱ्यांना आधार मिळत आहे. ऊसतोडणीसाठी मजुरांनी पैसे मागितल्याची तक्रार आल्यास कारखान्याकडून गंभीर दखल घेत शेतकऱ्यांचे पैसे परत देण्यात येतात असा दंडक एक- दोन कारखान्यांनीच ठेवला आहे.

पैसे कमी दिल्यास करतात नुकसान

एखाद्या शेतकऱ्याने या मजुरांना थोडेफार कमी पैसे दिल्यास ऊस जमिनीपासून न तोडता वरूनच तोडणे, वाढ्याला उसाच्या कांड्या ठेवणे, पाचटात टिपरे ठेवणे, अशाप्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान करतात.

प्रतिक्रिया

माझ्या शेतात अडीच एकरात ऊस होता. माझ्याकडे बाहेरील कारखान्याचे मजूर होते. त्या मजुरांना एकरी दहा व चालक मिळून मला ३०,००० रुपये खर्च आला.

- अशोक बेडके, शेतकरी, राजापूर