शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

कृषीमंत्र्यांच्या बीडमध्येच शेतकऱ्यांची पडवड; जिल्ह्यात दोन दिवसाआड शेतकरी संपवतोय जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 19:07 IST

१७ जणांची मदतही नाकारली : १४ ऑक्टोबरपर्यंत १४५ शेतकरी आत्महत्या

बीड : परळी मतदारसंघातून आमदार झालेले धनंजय मुंडे यांच्याकडे राज्याच्या कृषी विभागाची जबाबदारी दिली. परंतु त्यांच्याच जिल्ह्यात सध्या दर दोन दिवसाला एक शेतकरी जीवन संपवत आहे. जानेवारी ते १४ ऑक्टोबर या काळात तब्बल १४५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे यातील १७ जणांची मदतही नाकारण्यात आली आहे.

बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. आतापर्यंत या मजुरांच्या जीवावर अनेकांनी राजकारण केले. परंतु त्यांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. तसेच जिल्ह्यातील काही तालुके हे दुष्काळी भाग म्हणून ओळखले जातात. त्यातच चालू वर्षात अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. दुसऱ्या बाजूला पेरणी व मशागतीसाठी घेतलेले कर्ज फेडताना अडचणी आल्या. बँकवाले त्रास देऊ लागले. पिकांचे नुकसान झाल्याने मुलांचे लग्न लावण्याचा प्रश्न अनेकांच्या समोर उभा राहिला. त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत गेला आणि जिल्ह्यात २०२४ या वर्षात तब्बल १४५ जणांनी जीवनयात्रा संपविली आहे. विशेष म्हणजे हा कृषी मंत्र्यांचा जिल्हा आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना आणल्या जात असल्याचा दावा केला जात असला तरी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने आणि कर्जाचा बोजा डोक्यावर झाल्याने शेतकरी आत्महत्यासारखे टाेकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसत आहे.

चार महिन्यांपासून प्रकरणे प्रलंबितएखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याला शासनस्तरावरून मदत केली जाते. परंतु जूनमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे अद्यापही शासन दरबारी चौकशीच्या नावाखाली प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. सध्या २३ प्रकरणे प्रलंबित असून, जूनमधील एक, जुलै ३, ऑगस्ट ८, सप्टेंबर ८ आणि ऑक्टोबरमधील ३ प्रकरणांचा समावेश आहे.

१७ प्रकरणे ठरविली अपात्रनापिकी, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे शेतकऱ्यांनी जीवन संपविले. याची चौकशी प्रशासनाने केली. या शेतकरी आत्महत्या नाहीत, असे कारण काढून २०२४ मध्ये तब्बल १७ प्रकरणे नाकारण्यात आली आहेत.

आत्महत्या थांबविण्यासाठी काय प्रयत्न?आत्महत्या थांबाव्यात यासाठी कृषी विभाग आणि प्रशासनाने काय प्रयत्न केले? हा देखील प्रश्न आहे. जिल्हा रुग्णालयात असलेले पूर्वीचे प्रकल्प प्रेरणा आणि आताचे मानसिक आरोग्य केंद्रही केवळ नावालाच आहे. येथून शेतकऱ्यांचे समुपदेशन, मार्गदर्शन होत नाही. हा विभाग केवळ नावालाच असून, येथील अधिकारी, कर्मचारी काहीच करत नसल्याचे दिसते.

अशी आहे आकडेवारीमहिना - आत्महत्याजानेवारी - १८फेब्रुवारी - १४मार्च - १२एप्रिल - १३मे - १३जून - २९जुलै - १४ऑगस्ट - १४सप्टेंबर - १५१४ ऑक्टोबरपर्यंत - ३एकूण - १४५

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्याAgriculture Sectorशेती क्षेत्रDhananjay Mundeधनंजय मुंडे