शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

आत्महत्यांचे सत्र थांबेना; बीड, हिंगोली जिल्ह्यांतील आणखी चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 15:56 IST

मराठवाड्यात चार दिवसांत १२ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

बीड/औंढा नागनाथ/सेनगाव (जि.हिंगोली) : मराठवाड्यातील  बीड व हिंगोली जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मंगळवारी समोर आले. गेल्या चार दिवसांचा विचार केला तर आत्महत्यांचा हा आकडा आता १२ वर पोहोचला आहे.

बीड जिल्ह्यातील आम्ला वाहेगाव (ता. गेवराई) येथील शेतकरी रामनारायण खेत्रे (४२) यांनी बँकेचे कर्ज व नापिकीला कंटाळून  गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्ज माफ न झाल्यामुळे ते चिंतेत होते. त्यातच अतिवृष्टीने उरल्या-सुरल्या अपेक्षाही भंगल्या यामुळे त्यांनी रविवारी आत्महत्या केली. तलवाडा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक माने हे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील शेतकरी अरुण मारोती शिंदे (३०) यांनी २६ आॅक्टोबर रोजी विषारी द्रव प्राशन केले होते. मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोसायटीचे कर्ज फेडण्याची चिंता असतानाच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने नैराश्यातून त्यांनी जीवन संपविले. 

तिसऱ्या घटनेत  हिंगोली जिल्ह्यातील वाळकी (ता. औंढा नागनाथ) येथील शेतकरी संभाजी लक्ष्मण मुकाडे (६५) यांनी कर्ज परतफेड न करता आल्याने शेतातील जांबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर खाजगी बँकांचेही कर्ज होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.  मुकाडे यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.

चौथ्या घटनेत केलसूला (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील अल्पभूधारक शेतकरी संजय पिराजी चव्हाण (३५) यांनी कर्ज फेडायच्या विवंचनेत गळफास घेऊन आत्महत्या केली. १२ नोव्हेंबर रोजी हा प्रकार समोर आला. अतिवृष्टीने शेतीतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे त्यांनी आत्महत्या केली. चव्हाण यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. 

शेतकरी फार मोठ्या आर्थिक अरिष्ट्यात सापडले असून अतिवृष्टीपासून दिवसेंदिवस आत्महत्यांचे सत्र वेगाने सुरू झाले आहे. सुरुवातीला पडलेल्या रिमझिम पावसावर कशीतरी जगविलेली पिके पुर्णपणे पाण्यात गेली असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य वाढले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीMarathwadaमराठवाडा