यंदाही वन्यप्राणी गणना नाही, पक्षी व वन्यप्राणी प्रेमी निराश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST2021-05-26T04:33:12+5:302021-05-26T04:33:12+5:30
धारूर : दरवर्षी वैशाख पौर्णिमेला होणारी पक्षी व वन्यप्राणी गणना सलग दुसऱ्या वर्षीही होणार नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या ...

यंदाही वन्यप्राणी गणना नाही, पक्षी व वन्यप्राणी प्रेमी निराश
धारूर : दरवर्षी वैशाख पौर्णिमेला होणारी पक्षी व वन्यप्राणी गणना सलग दुसऱ्या वर्षीही होणार नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानंतर यंदाही गणना रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षी व वन्यप्रेमी निराश झाले आहेत. वन्यजीव संरक्षण कार्यात अधिकाधिक लोकसहभाग मिळावा यासाठी वन्यप्रेमींना जनगणनेत सहभागी करून घेतले जाते.
भारतातील जंगलात वन्य प्राण्यांची संख्याही किती, हे मोजण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्था पाऊलखुणा आणि पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या आधारावर वन्य प्राणी गणना केली जाते. त्यामुळे पाणवठे शेजारी मचाण उभारून त्यावर वन्यजीव निरीक्षण करण्यात येते. वन्यजीव अभ्यासासाठी ही गणना महत्त्वाची मानली जाते. या उपक्रमातून पक्षी, प्राणी व पर्यावरणबाबत ज्ञान मिळते. यात स्वयंसेवी संस्थांनाही समाविष्ट केले जाते.
वैशाख पौर्णिमेला दुसऱ्या दिवशीही दुसरी गणना केली जाते. गेल्या वर्षी केंद्र सरकारने २३ मार्च २० रोजी लॉकडाऊन जाहीर केले होते तर ७ मे २० रोजी पौर्णिमा होती त्यामुळे २०२० मध्ये जनगणना झाली नाही. यंदाही लॉकडाऊन असल्याने २६ मे रोजी पौर्णिमेच्या दिवशी गणना केली जाणार नाही.
गणना वैशाखी पौर्णिमेला का?
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या कक्षाजवळ पृथ्वी असते. चंद्राचा लख्ख प्रकाश पृथ्वीवर पडतो. त्यामुळे पक्षी व प्राणी सहज दिसून येतात. मे महिन्यात झाडाची पाने गळालेले असतात त्यामुळे लांबपर्यंत प्राणी मंचकावरून दिसतात. त्यांच्या नोंदी घेऊन त्यांना ओळखणे सोपे जाते तसेच या नोंदीवरून वनविभाग आणि आपल्या क्षेत्रात प्राण्यांची संख्या किती, त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणे सुलभ जाते. यासाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी प्राणी व पक्ष्यांची नोंदणी केली जाते.
महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या वर्षी वैशाखी पौर्णिमाच्या दिवशी गणना करण्याची मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षी गणना करण्याची संधी प्राणी व पक्षी प्रेमींना मिळेल अशी अपेक्षा आहे.
शंकर वरवडे (धारूर वनपरीक्षेत्र कार्यालयाचे वनपाल
===Photopath===
240521\3436anil mhajan_img-20210524-wa0087_14.jpg~240521\3442anil mhajan_img-20210524-wa0086_14.jpg