उपजीविका केंद्राच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST2021-07-27T04:35:32+5:302021-07-27T04:35:32+5:30

बीड : उपजीविका केंद्राच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यात येईल, असे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले. दीनदयाळ अंत्योदय योजना ...

Empowerment of women through livelihood centers | उपजीविका केंद्राच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण

उपजीविका केंद्राच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण

बीड : उपजीविका केंद्राच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यात येईल, असे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, नगर परिषद बीड अंतर्गत शहरातील भाजी मंडई येथे नारीशक्ती शहरी उपजीविका केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष क्षीरसागर बोलत होते.

शहरातील असंघटित कामगारांना एकत्रित करून उपजीविका भागविण्यासाठी शहर स्तर संघाची स्थापना केली जाते. १५ ते २० स्वयंसाहाय्य गटांचे मिळून एक ‘वस्ती स्तर संघ’ तयार होतो. या वस्ती स्तर संघ एकत्र येऊन एक ‘शहरी स्तर संघ’ तयार केला जातो. शहरी स्तर संघाच्या माध्यमातून असंघटित कामगारांना एकत्रित करून उपजीविका भागविण्यासाठी तयार केलेल्या नारीशक्ती शहरी उपजीविका केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष म्हणाले की, या नारीशक्ती शहरी उपजीविका केंद्राच्या माध्यमातून बचतगटांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तीनशे ते चारशे कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे. बीड शहरातील नागरिकांना घरबसल्या घरगुती सेवा या केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच शहरातील अनेक लहान-लहान असंघटित कामगारांना या केंद्राच्या माध्यमातून रोजगार मिळणार असल्याने उपजीविकासंबंधी समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना नगरपालिकेच्या अंतर्गत नारीशक्ती शहरी उपजीविका केंद्राच्या माध्यमातून करणार आहोत. महिलांनी घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी शहरात एक हजार महिला बचतगटांची स्थापना केली असल्याचे सांगितले.

बीड शहरात मोठ्या प्रमाणात महिला बचतगटांची निर्मिती झाली असल्याने महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना नारीशक्ती शहरी उपजीविका केंद्राच्या माध्यमातून व्यासपीठ तयार करून देणार असल्याचे सांगितले. नगरपालिकेच्या माध्यमातून महिला बचतगटांसाठी लवकरच राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने कायमस्वरूपी स्टॉल उभारण्यात येणार असून कमीत कमी दरांमध्ये हे स्टॉल उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे महिला बचतगटांनी या स्टॉलचा फायदा घेण्याचे आवाहन करत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केले. संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी शहरातील प्रत्येक भागात जाऊन महिला बचतगटांची बैठक घेऊन या नारीशक्ती शहरी उपजीविका केंद्राची माहिती देण्यासंदर्भात सूचना केल्या.

याप्रसंगी न.प.चे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, नगरसेवक गणेश वाघमारे, शालिनी परदेशी, हामेद चाऊस, लता तांबारे, किश्किंदा पांचाळ व न.प.चे या विभागातील संबंधित अधिकारी, कर्मचारी, महिला बचतगटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

260721\26_2_bed_29_26072021_14.jpg

बचत गट बीड

Web Title: Empowerment of women through livelihood centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.