शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

होळीसाठी पौंडूळ, कोल्हेरच्या ग्रामस्थांनी बाजारात आणले पर्यावरणपूरक रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:02 IST

रंगपंचमीला वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये रसायनांचा वापर होत असल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक जण आजाराला सामोरे जातात. प्रदूषणमुक्त होळी खेळण्यासाठी आता कल वाढत आहे. इकोफ्रेंडली होळीचा संदेश विविध पातळीवरुन सामाजिक संघटना आणि संस्था तसेच व्यक्तीगत पातळीवर लोक देत आहेत.

अनिल भंडारी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : रंगपंचमीला वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये रसायनांचा वापर होत असल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक जण आजाराला सामोरे जातात. प्रदूषणमुक्त होळी खेळण्यासाठी आता कल वाढत आहे. इकोफ्रेंडली होळीचा संदेश विविध पातळीवरुन सामाजिक संघटना आणि संस्था तसेच व्यक्तीगत पातळीवर लोक देत आहेत. रंगांच्या या दुनियेत बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील पौंडुळ आणि गेवराई तालुक्यातील कोल्हेर येथील ग्रामविकास समितीने २०० किलो नैसर्गिक रंग बनवून बाजारात निसर्गप्रेमींसाठी आणले आहेत. हे रंग बंगळूरु, पुणे आणि मुंबईतही निसर्गप्रेमी वापरणार आहेत.श्रीक्षेत्र नारायणगडाजवळ असणाऱ्या तलावामुळे पौंडुळ गाव तीन गटात विभागले आहे. शंभर- दीडशे उंबºयाचे गाव असलेल्या पौंडुळ नं. ३ मध्ये मागील आठ- दहा वर्षांपासून ग्रामविकास समिती कार्यरत आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीत रोजगार मिळावा या उद्देशाने नैसर्गिक रंगाचा उपक्रम ग्रामविकास गतिविधी देवगिरी प्रांतने सुचविला.पौंडुळ व कोल्हेर येथील समित्यांमध्ये एकूण ४० जण सदस्य आहेत. मात्र या उपक्रमात दोन्ही ठिंकाणचे पाच- पाच कुटुंब सहभागी झाले आहेत. घरातील महिला, पुरुषांबरोबरच बच्चे कंपनी या रंगकामात व्यस्त आहे. विशेषत: महिलांनी रंग निर्मिती व पुरुषांनी मार्केटिंग करायची असे हे सूत्र आहे. पौंडुळ येथे १०० किलो तर कोल्हेर येथे १०० किलो रंग बनविले जात आहे.विशेष म्हणजे यात सहभागी कुटुंबांनी भांडवली खर्चाची जबाबदारी पेलली आहे. प्रती कुटुंब साधारण दोन हजार रुपये खर्च आला.गुंतवणुकीच्या तुलनेत परतावाही चांगला मिळू शकतो, याचे गणित पक्के बनले आहे. पर्यावरणपूरक रंगाचा वापर आरोग्याच्या दृष्टीने हितावह असल्याने या रंगांना चांगली मागणी आहे.अपायकारक नाहीस्टार्च पावडर, खाण्यासाठी वापरले जाणारे रंग व पाणी आणि कापडाचा वापर या प्रक्रियेत करावा लागतो. हा रंग लावताना तोंडात गेला किंवा जिभेवर विरघळला तरी कुठलाही अपाय होत नाही, हे विशेष.असा करतात रंग तयारखाण्याचा रंग पाण्यात विरघळतात, त्यानंतर स्टार्च पावडर टाकून ओली केली जाते. नंतर वाळविला जातो. वाळल्यानंतर वस्त्रगाळ करुन रंग तयार केला जातो.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रमHoliहोळी