शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

होळीसाठी पौंडूळ, कोल्हेरच्या ग्रामस्थांनी बाजारात आणले पर्यावरणपूरक रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:02 IST

रंगपंचमीला वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये रसायनांचा वापर होत असल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक जण आजाराला सामोरे जातात. प्रदूषणमुक्त होळी खेळण्यासाठी आता कल वाढत आहे. इकोफ्रेंडली होळीचा संदेश विविध पातळीवरुन सामाजिक संघटना आणि संस्था तसेच व्यक्तीगत पातळीवर लोक देत आहेत.

अनिल भंडारी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : रंगपंचमीला वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये रसायनांचा वापर होत असल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक जण आजाराला सामोरे जातात. प्रदूषणमुक्त होळी खेळण्यासाठी आता कल वाढत आहे. इकोफ्रेंडली होळीचा संदेश विविध पातळीवरुन सामाजिक संघटना आणि संस्था तसेच व्यक्तीगत पातळीवर लोक देत आहेत. रंगांच्या या दुनियेत बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील पौंडुळ आणि गेवराई तालुक्यातील कोल्हेर येथील ग्रामविकास समितीने २०० किलो नैसर्गिक रंग बनवून बाजारात निसर्गप्रेमींसाठी आणले आहेत. हे रंग बंगळूरु, पुणे आणि मुंबईतही निसर्गप्रेमी वापरणार आहेत.श्रीक्षेत्र नारायणगडाजवळ असणाऱ्या तलावामुळे पौंडुळ गाव तीन गटात विभागले आहे. शंभर- दीडशे उंबºयाचे गाव असलेल्या पौंडुळ नं. ३ मध्ये मागील आठ- दहा वर्षांपासून ग्रामविकास समिती कार्यरत आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीत रोजगार मिळावा या उद्देशाने नैसर्गिक रंगाचा उपक्रम ग्रामविकास गतिविधी देवगिरी प्रांतने सुचविला.पौंडुळ व कोल्हेर येथील समित्यांमध्ये एकूण ४० जण सदस्य आहेत. मात्र या उपक्रमात दोन्ही ठिंकाणचे पाच- पाच कुटुंब सहभागी झाले आहेत. घरातील महिला, पुरुषांबरोबरच बच्चे कंपनी या रंगकामात व्यस्त आहे. विशेषत: महिलांनी रंग निर्मिती व पुरुषांनी मार्केटिंग करायची असे हे सूत्र आहे. पौंडुळ येथे १०० किलो तर कोल्हेर येथे १०० किलो रंग बनविले जात आहे.विशेष म्हणजे यात सहभागी कुटुंबांनी भांडवली खर्चाची जबाबदारी पेलली आहे. प्रती कुटुंब साधारण दोन हजार रुपये खर्च आला.गुंतवणुकीच्या तुलनेत परतावाही चांगला मिळू शकतो, याचे गणित पक्के बनले आहे. पर्यावरणपूरक रंगाचा वापर आरोग्याच्या दृष्टीने हितावह असल्याने या रंगांना चांगली मागणी आहे.अपायकारक नाहीस्टार्च पावडर, खाण्यासाठी वापरले जाणारे रंग व पाणी आणि कापडाचा वापर या प्रक्रियेत करावा लागतो. हा रंग लावताना तोंडात गेला किंवा जिभेवर विरघळला तरी कुठलाही अपाय होत नाही, हे विशेष.असा करतात रंग तयारखाण्याचा रंग पाण्यात विरघळतात, त्यानंतर स्टार्च पावडर टाकून ओली केली जाते. नंतर वाळविला जातो. वाळल्यानंतर वस्त्रगाळ करुन रंग तयार केला जातो.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रमHoliहोळी