शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

पाटोदा तालुक्यातील ५० हजार हेक्टरमधील खरीप पिके वाया जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 17:44 IST

पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील ५० हजार हेक्टरमधील खरिपाची पिके वाया गेली आहेत.

पाटोदा (बीड )  : पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील ५० हजार हेक्टरमधील खरिपाची पिके वाया गेली आहेत. १० ते २० टक्के उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती पडेल अशी स्थिती आहे. तालुक्यातील प्रमुख १४ सिंचन आणि साठवण तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. 

यंदा शेतकऱ्यांच्या हाती पीक लागणार नाही तर दुसऱ्या बाजूस चारा -पाण्यामुळे पशुधन ही धोक्यात आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक निवडणुका जिंकण्याचे आखाडे बांधण्यात मग्न आहेत. विरोधी पक्षाचे लोक सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत तर प्रशासन सुस्त असल्याने सामान्य शेतकऱ्यांनी दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

गतवर्षी भर पावसाळ्यात पावसाने दडी मारली. अखेरच्या टप्प्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. यंदा सुरुवातीच्या काळात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी पेरता झाला. गतवर्षी बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनवर भर दिला. पावसाने दडी मारल्याने सोयाबीनसह सर्वच खरीप पिके वाया गेली आहेत. झालेल्या रिमझिम पावसात मोठ -मोठे खंड पडल्याने पिकांवर विपरीत परिणाम झाला. सोयाबीनच्या शेंगांची पापडी झाली. तूर आणि कापूसची उंची वाढली नाही. थोडेफार आलेले पाते गळून पडले. पाणी मिळालेल्या कापसावर लाल्या आणि बोंडअळीने हल्ला चढवला.

शेतकरी,  शेतमजूराच्या हाताला कामं नाही, रोजगार नाही, उत्पन्न नाही. अशा स्थितीत जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झालेला आहे.पावसाच्या अवकृपेमुळे यंदा ऊसतोडीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे मुकादम लोकांनी उचल द्यायला हात आखडता घेतला आहे.गतवर्षी १५ सप्टेंबर पर्यंत तालुक्यात ६७०.०३ मि. मी. एवढा पाऊस झाला होता. यंदा केवळ २९७.०५ मि. मी. एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे.तालुक्यातील सध्या असलेल्या पाण्याची साठवण आणि पिकांची स्थिती पाहता महसूल प्रशासनाकडे असलेली आकडेवारी असत्य ठरत आहे. तालुक्यातील प्रमुख १४ सिंचन आणि साठवण तलाव येत्या काही दिवसांत कोरडेठाक पडणार आहेत. त्यामुळे शासनाने वेळीच उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे  मागणी केली आहे. 

सोयाबीनला प्राधान्य :  खरीप पेरा वाढलाखरीप हंगामात पेरणी झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५ हजार हेक्टर क्षेत्र वाढले. सरासरी ४४ हजार २६९ एवढं खरीपाच क्षेत्र आहे. यंदा ४९ हजार १५० हेक्टरवर पेरा झालेला आहे.सर्वाधिक २१ हजार ९१३ हेक्टरवर सोयाबीन पेरा झाला आहे. इतर पीकपेरा असा : कापूस - १२ हजार ५०६, बाजरी ४ हजार २६३, तूर ३ हजार ३२८, उडीद ४ हजार ८२४, मूग १ हजार ३३७, मका १७३, कारळ १५४, सूर्यफूल ५०, तीळ ९०, भुईमूग १५५, मटकी ११५, एरंडी ८९ आणि इतर तृणधान्य २०३ हेक्टर याप्रमाणे पीकनिहाय पेरणी झाली.

दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणीतालुक्यातील पिकांची स्थिती अतिशय वाईट आहे. जवळपास ८० टक्के पेरा नापीक झाला आहे. पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून आणि तलावातील पाण्याची मोजदाद करून करून ताबडतोब पंचनामे करावेत आणि तालुका दुष्काळी जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन राजाभाऊ देशमुख, गणेश कवडे, चक्रपाणी जाधव, विष्णूपंत घोलप, उमर चाऊस, किशोर भोसले, नामदेव सानप, गणेश शेवाळे यांनी तहसीलदारांना दिले आहे.

टॅग्स :RainपाऊसBeedबीडagricultureशेतीFarmerशेतकरी