शहरं
Join us  
Trending Stories
1
चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना
2
आनंदाची बातमी...! LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; 1 जूनपासून ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवा दर
3
शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना 
4
मोठा अपघात टळला! रुळांवर होते सिमेंट, लोखंडाचे पाईप, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने वाचले हजारो प्रवाशांचे प्राण 
5
विशेष लेख: दादा, शिंदे, फडणवीसांचे 'कम्युनिकेशन' अन् एका विधानामुळे पडलेले असंख्य प्रश्न
6
नातेवाईकांना भेटायला गेला अन् तो पाकिस्तानचाच झाला, दिल्ली पोलिसांनी आणखी एका गद्दाराला केली अटक!
7
लेख: मनोरंजन उद्योगाला पायरसीचे ग्रहण; एक जण घेतो सबस्क्रिप्शन, पण पाहणारे मात्र अनेक!
8
आतंकवादी तुरुंगात अन् बायको झाली बाळंत, ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल! म्हणाले... 
9
लेख: २०३५ पर्यंतच राजकारण, मग परदेश पर्यटन! 'फ्युचर प्लॅनिंग'मध्ये आणखीही बरंच काही...
10
फक्त २५० रुपयांनी सुरुवात, ७० लाखांपर्यंतचा जमेल निधी! मुलीचे शिक्षण आणि लग्नाची चिंता कायमची मिटेल
11
विशेष लेख: पिस्तूल कोणालाही मिळते कसे? शस्त्र परवाना कसा मिळतो? त्याची प्रक्रिया कशी असते?
12
Miss World 2025: कोण आहे मिस वर्ल्ड ओपल सुचाता? १६व्या वर्षी ब्रेस्टमध्ये गाठ सापडली अन्...
13
भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष
14
मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन
15
'हिरामंडी' फेम शर्मिन सहगलच्या घरी आला नवा पाहुणा, लग्नाच्या २ वर्षांनी संजय लीला भन्साळींची भाची झाली आई
16
आजचे राशीभविष्य : रविवार 01 जून 2025; आर्थिक लाभ व मान-सन्मानात वृद्धी होईल, प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदात भर घालू शकेल
17
न्यायालयाने फेटाळला कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा जामीन; व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी
18
अकरावीसाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ‘इन हाऊस कोट्यात’; १० टक्के जागा आरक्षित
19
मिठी नदीतील गाळ आता महापे डंपिंग ग्राउंडऐवजी मुंब्रा येथील डंपिंग ग्राउंडवर टाकणार
20
अहिल्यादेवींप्रमाणेच वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीमुळे बहुतांशी शिवारातील पिके पिवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST

अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या पावसाने खरीप हंगाम धोक्यात आला असून अतिवृष्टीमुळे बहुतांशी शिवारातील पिके पिवळी पडू ...

अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या पावसाने खरीप हंगाम धोक्यात आला असून अतिवृष्टीमुळे बहुतांशी शिवारातील पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५२ हजार हेक्टर शेतीमध्ये पेरणी झाली. यात गेल्या वर्षीप्रमाणेच सोयाबीन पिकाची पेरणी अधिक प्रमाणात करण्यात आली आहे. पेरलेले मोड वर येतात न येतात तोच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खरीप हंगामाची स्थिती पूर्ण बिघडून गेली आहे. सततच्या पावसामुळे कोळपणी, वखरणी, फवारणी आदी आंतरमशागतीची कामेही बंद पडली आहेत. अशा परिस्थितीत पिकांसाठी मारक ठरणाऱ्या तणांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली होती. त्यामुळे ही पिके लहान असल्याने मुसळधार पावसाचा मारा सहन करू शकली नाहीत. त्यामुळे जवळपास तालुक्यातील अर्धा अधिक खरीप हंगाम पाण्याखाली गेला. यावर्षीचा हंगाम तरी शेतकरी वर्गाला तारण्याची चिन्हे दिसत होती.

आपत्कालीन व्यवस्थापनाची कोणतीही यंत्रणा या भागात दिसून आली नाही. तालुक्यातील ममदापूर, पाटोदा, कोळकानडी, नांदडी, देवळा, मुडेगाव, दैठणा, राडी या भागातील अनेक रस्ते अतिवृष्टीमुळे खराब झाले आहेत. तर पाटोदा परिसरातील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.

ऊस आडवा पडल्याने मोठे नुकसान

अंबाजोगाई तालुक्यात सतत पडणाऱ्या वादळी पावसामुळे ऊसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे ऊस शेतातच आडवा पडला आहे.

पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईपोटी पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. परिणामी यावर्षी पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी अल्पसा प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. सेतू सुविधा केंद्राकडे दिवसातून फक्त ८ ते १० शेतकरीच येत असल्याचे निदर्शनास येत आहे.

गटारांनी साठले पाणी, साथीचे रोग फैलावण्याचा धोका

सतत पडणाऱ्या पावसामुळे या परिसरातील गावांत मुख्य रस्ते आणि वस्तीलगतच्या परिसरात गटारे साचली आहेत. या गटारांमुळे डासांची उत्पत्ती वाढून मलेरिया, डेंग्यूसारखे आजार पसरण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेत संबंधित ग्रामपंचायतींनी गटारे साचणाऱ्या ठिकाणी मुरूम टाकून ती बुजवावीत, तसेच गावांत धूर फवारणी करून डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

पुलांची उंची वाढवून नाल्यांचे खोलीकरण करावे

ममदापूर, कोळकानडी परिसरात नदीच्या पात्रात विविध ठिकाणी पुलांची निर्मिती करण्यात यावी. शिवाय परिसरातील मोठ्या नाल्यांवरही पूल उभारण्यात यावेत. अनेक वर्षांपूर्वी उभारलेल्या या पुलाभोवतालच्या जमिनीवर गाळ, कचरा साचून जमिनीचा थर वाढत गेला, तर नदीपात्र आणि नालेही गाळ साठल्याने लहान झाले आहेत. त्यामुळे पुलांची उंची वाढवावी व नाल्यांचे खोलीकरण करण्याची मागणी होत आहे.