शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे बहुतांशी शिवारातील पिके पिवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST

अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या पावसाने खरीप हंगाम धोक्यात आला असून अतिवृष्टीमुळे बहुतांशी शिवारातील पिके पिवळी पडू ...

अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या पावसाने खरीप हंगाम धोक्यात आला असून अतिवृष्टीमुळे बहुतांशी शिवारातील पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५२ हजार हेक्टर शेतीमध्ये पेरणी झाली. यात गेल्या वर्षीप्रमाणेच सोयाबीन पिकाची पेरणी अधिक प्रमाणात करण्यात आली आहे. पेरलेले मोड वर येतात न येतात तोच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खरीप हंगामाची स्थिती पूर्ण बिघडून गेली आहे. सततच्या पावसामुळे कोळपणी, वखरणी, फवारणी आदी आंतरमशागतीची कामेही बंद पडली आहेत. अशा परिस्थितीत पिकांसाठी मारक ठरणाऱ्या तणांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली होती. त्यामुळे ही पिके लहान असल्याने मुसळधार पावसाचा मारा सहन करू शकली नाहीत. त्यामुळे जवळपास तालुक्यातील अर्धा अधिक खरीप हंगाम पाण्याखाली गेला. यावर्षीचा हंगाम तरी शेतकरी वर्गाला तारण्याची चिन्हे दिसत होती.

आपत्कालीन व्यवस्थापनाची कोणतीही यंत्रणा या भागात दिसून आली नाही. तालुक्यातील ममदापूर, पाटोदा, कोळकानडी, नांदडी, देवळा, मुडेगाव, दैठणा, राडी या भागातील अनेक रस्ते अतिवृष्टीमुळे खराब झाले आहेत. तर पाटोदा परिसरातील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.

ऊस आडवा पडल्याने मोठे नुकसान

अंबाजोगाई तालुक्यात सतत पडणाऱ्या वादळी पावसामुळे ऊसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे ऊस शेतातच आडवा पडला आहे.

पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईपोटी पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. परिणामी यावर्षी पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी अल्पसा प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. सेतू सुविधा केंद्राकडे दिवसातून फक्त ८ ते १० शेतकरीच येत असल्याचे निदर्शनास येत आहे.

गटारांनी साठले पाणी, साथीचे रोग फैलावण्याचा धोका

सतत पडणाऱ्या पावसामुळे या परिसरातील गावांत मुख्य रस्ते आणि वस्तीलगतच्या परिसरात गटारे साचली आहेत. या गटारांमुळे डासांची उत्पत्ती वाढून मलेरिया, डेंग्यूसारखे आजार पसरण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेत संबंधित ग्रामपंचायतींनी गटारे साचणाऱ्या ठिकाणी मुरूम टाकून ती बुजवावीत, तसेच गावांत धूर फवारणी करून डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

पुलांची उंची वाढवून नाल्यांचे खोलीकरण करावे

ममदापूर, कोळकानडी परिसरात नदीच्या पात्रात विविध ठिकाणी पुलांची निर्मिती करण्यात यावी. शिवाय परिसरातील मोठ्या नाल्यांवरही पूल उभारण्यात यावेत. अनेक वर्षांपूर्वी उभारलेल्या या पुलाभोवतालच्या जमिनीवर गाळ, कचरा साचून जमिनीचा थर वाढत गेला, तर नदीपात्र आणि नालेही गाळ साठल्याने लहान झाले आहेत. त्यामुळे पुलांची उंची वाढवावी व नाल्यांचे खोलीकरण करण्याची मागणी होत आहे.