येथील कृषी महाविद्यालय येथे गुरू पौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. गाठाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे होते. व्यासपीठावर कृषी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कुलसचिव डॉ. दिगंबर चव्हाण, डॉ. ज्ञानोबा बडगिरे, परमेश्वर गित्ते व डॉ. प्रताप नाळवंडीकर, प्रा. सुभाष भुतडा, प्रा. विजयकुमार लोमटे, प्रा. अंकुशराव मोरे, प्रा. कुमार सिरसाट, अंबऋषी तट, अनंत आंबेगावकर आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी परिसरात शिवार पाहणी केली. या ठिकाणी प्रा. ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती देण्यात आली.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीला गुरू-शिष्य परंपरेची सोनेरी किनार आहे. गुरूंचा आशीर्वाद मिळाल्यास शिष्याच्या जीवनाचे कल्याण होते. जीवनामध्ये एक आदर्श गुरू आवश्यक आहे. जो की, योग्य ध्येय गाठण्यासाठी उचित मार्ग दाखवील. ज्यांच्या जवळ गुरू आहेत ते व्यक्तीगत, व्यावसायिक व सामाजिक जीवनात अधिक यशस्वी होतात. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अजित पुरी यांनी केले. आभार डॉ. नरेंद्र कांबळे यांनी मानले.
240721\img-20210724-wa0059.jpg
अंबाजोगाई च्या कृषी महाविद्यालयात झालेला कार्यक्रम