शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दुष्काळ केवळ जीआर पुरताच; प्रत्यक्षात उपाययोजना शून्यच : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 16:09 IST

सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी ही घोषणा केवळ जी.आर. काढण्यापुरती कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शुन्यच असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

ठळक मुद्दे बीडच्या पालकमंत्री विदेशात असल्याने मुख्यमंत्र्याची बैठक नाही दुष्काळ उपाययोजनेत जिल्ह्याकडे दुर्लक्ष

परळी (बीड ) : सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी ही घोषणा केवळ जी.आर. काढण्यापुरती कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शुन्यच असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. सरकारने सर्वाधिक दुष्काळग्रस्त असलेल्या बीड जिल्ह्याला तर वार्‍यावरच सोडले आहे का काय ? असा प्रश्‍न उपस्थित करताना कदाचित इथल्या पालकमंत्री विदेशात असल्याने मुख्यमंत्री शेजारच्या जिल्ह्यात आढावा बैठका घेतात मात्र बीड जिल्ह्याला टाळत असावेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे

एकीकडे दिवाळीचा सण सर्वत्र साजरा होत असताना दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे मात्र ऐन दिवाळीत सण बाजुला ठेवून दुष्काळग्रस्त जनतेसोबत त्यांच्या व्यथा जाणुन घेण्यासाठी दौरा करीत आहेत. काल अंबाजोगाई तालुक्याच्या पाहणी दौर्‍यानंतर त्यांनी आज बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नागापूर भागातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. अनेक शेतकर्‍यांच्या पाण्याअभावी वाळून जाणार्‍या ऊसाची तसेच कापसाच्या शेतीची त्यांनी पाहणी केली. शेतकर्‍यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या. 

यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षा ही भिषण आहे. सरकारने 151 तालुके दुष्काळी जाहीर केले असले तरी, शेतकर्‍यांना आर्थिक मदत, जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची सोय मात्र काहीच केली नाही. नोव्हेंबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असताना 31 नोव्हेंबर पर्यंत टँकर लावु नका असे आदेश दिले असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. 31 नोव्हेंबर पर्यंत माणसांनी आणि जनावरांनी पिण्याच्या पाण्याअभावी मरायचे का ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

मागच्या वर्षीच्या बोंडअळीच्या नुकसान भरपाईपोटी 34 हजार 500 रूपयांची घोषणा केली, प्रत्यक्षात मात्र शेतकर्‍यांच्या हातावर केवळ 600 रूपये ठेवून ते शेतकर्‍यांची फसवणुक आणि थट्टा करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत, वीज बील संपुर्ण माफ, दावणीला चारा आणि तातडीने टँकर सुरू केल्याशिवाय आपण आगामी अधिवेशन चालु देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकर्‍यांच्या जनावरांना चार्‍याचे अनुदान ऑनलाईन देण्याच्या आदेशाची त्यांनी महंम्मद तुघलकी कारभार अशा शब्दात खिल्ली उडवली. मुख्यमंत्री शेजारच्या जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळाच्या आढावा बैठका घेत आहेत, बीडला मात्र अद्याप अशी बैठक झाली नाही, कदाचित इथल्या पालकमंत्री विदेशातून सॅटेलाईटमधून बीडचा दुष्काळ पाहाणी करण्यासाठी गेल्या असल्याने मुख्यमंत्र्यांनी बीडची बैठक लांबवली असावी, असा टोला त्यांनी लगावला. परळी भागातील शेतकर्‍यांच्या ऊसाचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला आहे, प्रसंगी आपण आपले प्राण गहान ठेवू मात्र शेतकर्‍यांचा ऊस गाळपाअभावी शिल्लक राहु देणार नाही, असा दिलासाही त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधताना दिला. निसर्गासोबतच सरकारशी दोन हात करण्यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढा देईल, असे ते म्हणाले.

दौर्‍यात त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रसचे जिल्हा उपाध्यक्ष माऊली गडदे, माजी उपसभापती विष्णुपंत देशमुख, मोहनराव सोळंके व इतर पदाधिकरी उपस्थित होते.नागापूर येथील नागनाथ मंदिरात त्यांनी या परिसरातील प्रत्येक गावांमधील गावकर्‍यांशी स्वतंत्र संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेdroughtदुष्काळState Governmentराज्य सरकारPankaja Mundeपंकजा मुंडे