शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

Drought In Marathwada : कोयता घेऊन बेलापूरला जावं की, गावंच कायमचं सोडावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 16:07 IST

दुष्काळवाडा : धिर्डी गावात तर भयंकर दुष्काळाची चाहूल लागली आहे. 

- अविनाश कदम, धिर्डी, ता. आष्टी, जि. बीड

पाऊस आता येईल, मग येईल. वाट पाहता पाहता शेतात पेरलेलं पीक पुरतं जळून गेलं; पण पावसाचा थांगपत्ताच लागला नाही. त्यामुळे आष्टी तालुक्यात यंदा पुन्हा भयानक दुष्काळाचं संकट उभं राहिलं आहे. धिर्डी गावात तर भयंकर दुष्काळाची चाहूल लागली आहे. आष्टीपासून २० किलोमीटर अंतरावर ९०० लोकसंख्येचे धिर्डी गाव. पावसाळा सुरू होऊन संपला, तरी या गावात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे पिके वाया गेली. खरिपाची चिंता रबी हंगामात दुपटीने वाढली आहे.

पाण्यावाचून डोळ्यादेखत पिके जळून गेली. कपाशीचे पीक जळून गेल्याने ती उपटून फेकून दिली. गावातील अनेक शेतकरी ऊसतोडणी व मजुरीसाठी जाण्याच्या तयारीत आहेत. दसरा झाला की कोयता हातात घेऊन बेलापूरला जायचं असं अनेक शेतकºयांनी सांगितले. दोन हातपंपांवरच संपूर्ण ग्रामस्थांची मदार आहे. सुरुवातीची पाच ते दहा मिनिटं हातपंपाला पाणी येत नाही. त्यामुळे हातपंप हापसून हापसून कंबरडे मोडत आहे. गावात असणारे सात गावतलाव, एक नदी, चार ओढे यंदा पाऊस नसल्यामुळे अक्षरश: कोरडेठाक पडले आहेत. सततच दुष्काळ पडत असल्याने पाणी पाहायला मिळत नाही. ग्रामस्थ तर गाव कायमचेच सोडून जायच्या विचारात आहेत. 

चार-पाच वर्षांपूर्वीच्या दुष्काळाची आठवण आजही डोळ्यात पाणी आणते. ना काम ना दाम, अनुदान येतं तर खर्च जास्त झालेला. मिळणारे अनुदान कमी, त्यात कोणाला मिळतं, कोणाला तेही मिळत नाही. नुसता देखावा चाललाय बघा, असे इथले शेतकरी संतापाने सांगत होते.

कमी पाण्यावर पिके घ्यावीत

 तालुक्यात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने खरिपाचे पीक कमी प्रमाणात आले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी उपाययोजना करून कमी पाण्यावर आपले पीक कसे घेता येईल, यासाठी प्रयत्न करावा. शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पीक विमा भरावा.  - राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी

बळीराजा काय म्हणतो?- आमच्या गावात तीन-चार वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती राहिलेली आहे. परिणामी, प्यायला पाणी नाही, हाताला काम नाही. एकदाचं गाव सोडून जावं वाटतं. -सीताराम साठे 

- मोठी चार-पाच जनावरं आहेत. तीसुद्धा आता चारा नसल्यामुळे विकावी की काय, असं वाटतंय. या दुष्काळी परिस्थितीत आमचीच खायला भ्रांत आहे. मग जनावरांना चारा आणायचा कोठून? - शिवाजी शेळके 

- दुष्काळ पडला की अनुदान मिळेल, असं वाटतं; पण काहीच भेटत नाही. अधिकारी येतील-माघारी निघून जातील आम्हाला मात्र काहीच मिळत नाही. बँकेत खात्यावर काहीच जमा होत नाही, त्यामुळे दुष्काळ पडला काय अन् नाही पडला काय आम्हाला काहीच फरक पडत नाही. - दादा राजपुरी

- शेतातील कापसाचे उभे पीक पाण्याअभावी जळाले, तसेच इतर घेतलेली पिकेही जळत चालली आहेत. पाणीच नाही तर करावे काय, अशी परिस्थिती आमची झाली आहे. - विकास करडुळे 

- माझ्या शेतात जे पेरलं होतं ते पूर्णपणे जळून गेलं. त्यामुळे डोळ्यादेखत पेरलेलं पीक वाया गेलं. सगळ्या आशा संपल्या. आता करावं तरी काय? - गंगाराम करडुळे 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाRainपाऊस