शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

Drought In Marathwada : गोदाकाठी असलेली समृद्धी यंदाच्या दुष्काळाने हिरावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 19:44 IST

दुष्काळवाडा : परळी तालुक्यातील आदर्श सांसद गाव असलेल्या पोहनेर आणि लगतच्या रामेवाडी कासारवाडी शिवारातील शेतकऱ्यांची व्यथा.

- संजय खाकरे, पोहनेर, ता. परळी, जि. बीड

गोदामाईने आतापर्यंत भरपूर दिले; पण निसर्गाच्या अवकृपेमुळे सारेच संपले. पाऊसच नसल्याने खरिपाची पिके कोमेजली. सोयाबीनचे उत्पन्न घटले. वाती इतकाच कापूस बोंडाला लागल्याने पुरती वाट लागली. दसरा, दिवाळीचा सण तोंडावर आहे. आता खायचे काय आणि जगायचे कसे, हीच चिंता आहे. परळी तालुक्यातील आदर्श सांसद गाव असलेल्या पोहनेर आणि लगतच्या रामेवाडी कासारवाडी शिवारातील शेतकऱ्यांची व्यथा. पैसेवारी जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने या परिसराला भेट दिली असता दुष्काळाची भीषणता जाणवली. 

परळीपासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेले पोहनेर, रामेवाडी, कासारवाडी शिवार हे सिरसाळा महसूल मंडळात येते. या भागातील जमीन भारी स्वरूपाची आहे. केवळ पावसाने साथ न दिल्याने खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. गंगथडीची जमीन असल्याने या भागात ज्वारीचे उत्पादन दरवर्षी मोठ्या प्रमाणात होते. यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे रबीचा पेरा होणार नाही. ज्वारीही पेरता आली नाही. सोयाबीनची पेरणी केली; पण शेंगा भरल्याच नाहीत. आले ते पीक करपलेले आहे. कापूस वाळला असून उत्पादन ५ टक्केसुद्धा हेणार नाही. हुमणी अळीने पोखरल्याने उभा ऊस जमीनदोस्त झाला आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे हातपंपही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. पोहनेरला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. रामेवाडी, कासारवाडीत तर ठणठणाट आहे.  उन्हाळा आणखी बारच दूर असताना ही स्थिती आहे. 

- १०७ - तालुक्यातील गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी - ७२७.६ मिमी तालुक्याचे पंचवार्षिक पर्जन्यमान - ३९७ - मिमी पाऊस यावर्षी सिरसाळा मंडळात  

आढावा घेत आहोतपरळी तालुक्यातील या गावात दोन महिन्यांपासून पाऊस नाही. पिकांचा अंदाज व आढावा घेण्याचे काम तालुका कृषी कार्यालयामार्फत सुरू आहे.- अशोक सोनवणे, तालुका कृषी अधिकारी, परळी वैजनाथ

बळीराजा काय म्हणतो?

- गोदाकाठच्या या भागात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने गुंगारा दिला आहे. पाण्याचा ठणठणाट आहे. उसाचे उत्पन्न हुमणीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात घटणार आहे. गेल्या वर्षीचे कापसाचे बोंडअळीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. - राजाभाऊ पौळ 

- सोयाबीनवर केलेला खर्चही निघणे अशक्य आहे. पावसाअभावी खरीप पिके हातची गेली आहेत व रबी पिकाची पेरणी शक्य नाही. - बाजीराव काळे 

- पोहनेरसह लगतच्या रामेवाडी, कासारवाडी शिवारातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे महसूलमंत्र्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन दुष्काळ जाहीर करावा. - भगवान पौळ 

- उसाला हुमणीने खाऊन टाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचा गोडवा राहणार नाही. परिणामी, हाती काहीच पडणार नाही. शेतकरी संपत चालला आहे. - मुस्सा शेख  

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस