शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

Drought In Marathwada : गोदाकाठी असलेली समृद्धी यंदाच्या दुष्काळाने हिरावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 19:44 IST

दुष्काळवाडा : परळी तालुक्यातील आदर्श सांसद गाव असलेल्या पोहनेर आणि लगतच्या रामेवाडी कासारवाडी शिवारातील शेतकऱ्यांची व्यथा.

- संजय खाकरे, पोहनेर, ता. परळी, जि. बीड

गोदामाईने आतापर्यंत भरपूर दिले; पण निसर्गाच्या अवकृपेमुळे सारेच संपले. पाऊसच नसल्याने खरिपाची पिके कोमेजली. सोयाबीनचे उत्पन्न घटले. वाती इतकाच कापूस बोंडाला लागल्याने पुरती वाट लागली. दसरा, दिवाळीचा सण तोंडावर आहे. आता खायचे काय आणि जगायचे कसे, हीच चिंता आहे. परळी तालुक्यातील आदर्श सांसद गाव असलेल्या पोहनेर आणि लगतच्या रामेवाडी कासारवाडी शिवारातील शेतकऱ्यांची व्यथा. पैसेवारी जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने या परिसराला भेट दिली असता दुष्काळाची भीषणता जाणवली. 

परळीपासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेले पोहनेर, रामेवाडी, कासारवाडी शिवार हे सिरसाळा महसूल मंडळात येते. या भागातील जमीन भारी स्वरूपाची आहे. केवळ पावसाने साथ न दिल्याने खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. गंगथडीची जमीन असल्याने या भागात ज्वारीचे उत्पादन दरवर्षी मोठ्या प्रमाणात होते. यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे रबीचा पेरा होणार नाही. ज्वारीही पेरता आली नाही. सोयाबीनची पेरणी केली; पण शेंगा भरल्याच नाहीत. आले ते पीक करपलेले आहे. कापूस वाळला असून उत्पादन ५ टक्केसुद्धा हेणार नाही. हुमणी अळीने पोखरल्याने उभा ऊस जमीनदोस्त झाला आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे हातपंपही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. पोहनेरला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. रामेवाडी, कासारवाडीत तर ठणठणाट आहे.  उन्हाळा आणखी बारच दूर असताना ही स्थिती आहे. 

- १०७ - तालुक्यातील गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी - ७२७.६ मिमी तालुक्याचे पंचवार्षिक पर्जन्यमान - ३९७ - मिमी पाऊस यावर्षी सिरसाळा मंडळात  

आढावा घेत आहोतपरळी तालुक्यातील या गावात दोन महिन्यांपासून पाऊस नाही. पिकांचा अंदाज व आढावा घेण्याचे काम तालुका कृषी कार्यालयामार्फत सुरू आहे.- अशोक सोनवणे, तालुका कृषी अधिकारी, परळी वैजनाथ

बळीराजा काय म्हणतो?

- गोदाकाठच्या या भागात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने गुंगारा दिला आहे. पाण्याचा ठणठणाट आहे. उसाचे उत्पन्न हुमणीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात घटणार आहे. गेल्या वर्षीचे कापसाचे बोंडअळीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. - राजाभाऊ पौळ 

- सोयाबीनवर केलेला खर्चही निघणे अशक्य आहे. पावसाअभावी खरीप पिके हातची गेली आहेत व रबी पिकाची पेरणी शक्य नाही. - बाजीराव काळे 

- पोहनेरसह लगतच्या रामेवाडी, कासारवाडी शिवारातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे महसूलमंत्र्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन दुष्काळ जाहीर करावा. - भगवान पौळ 

- उसाला हुमणीने खाऊन टाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचा गोडवा राहणार नाही. परिणामी, हाती काहीच पडणार नाही. शेतकरी संपत चालला आहे. - मुस्सा शेख  

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस