शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

Drought In Marathwada : गोदाकाठी असलेली समृद्धी यंदाच्या दुष्काळाने हिरावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 19:44 IST

दुष्काळवाडा : परळी तालुक्यातील आदर्श सांसद गाव असलेल्या पोहनेर आणि लगतच्या रामेवाडी कासारवाडी शिवारातील शेतकऱ्यांची व्यथा.

- संजय खाकरे, पोहनेर, ता. परळी, जि. बीड

गोदामाईने आतापर्यंत भरपूर दिले; पण निसर्गाच्या अवकृपेमुळे सारेच संपले. पाऊसच नसल्याने खरिपाची पिके कोमेजली. सोयाबीनचे उत्पन्न घटले. वाती इतकाच कापूस बोंडाला लागल्याने पुरती वाट लागली. दसरा, दिवाळीचा सण तोंडावर आहे. आता खायचे काय आणि जगायचे कसे, हीच चिंता आहे. परळी तालुक्यातील आदर्श सांसद गाव असलेल्या पोहनेर आणि लगतच्या रामेवाडी कासारवाडी शिवारातील शेतकऱ्यांची व्यथा. पैसेवारी जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने या परिसराला भेट दिली असता दुष्काळाची भीषणता जाणवली. 

परळीपासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेले पोहनेर, रामेवाडी, कासारवाडी शिवार हे सिरसाळा महसूल मंडळात येते. या भागातील जमीन भारी स्वरूपाची आहे. केवळ पावसाने साथ न दिल्याने खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. गंगथडीची जमीन असल्याने या भागात ज्वारीचे उत्पादन दरवर्षी मोठ्या प्रमाणात होते. यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे रबीचा पेरा होणार नाही. ज्वारीही पेरता आली नाही. सोयाबीनची पेरणी केली; पण शेंगा भरल्याच नाहीत. आले ते पीक करपलेले आहे. कापूस वाळला असून उत्पादन ५ टक्केसुद्धा हेणार नाही. हुमणी अळीने पोखरल्याने उभा ऊस जमीनदोस्त झाला आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे हातपंपही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. पोहनेरला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. रामेवाडी, कासारवाडीत तर ठणठणाट आहे.  उन्हाळा आणखी बारच दूर असताना ही स्थिती आहे. 

- १०७ - तालुक्यातील गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी - ७२७.६ मिमी तालुक्याचे पंचवार्षिक पर्जन्यमान - ३९७ - मिमी पाऊस यावर्षी सिरसाळा मंडळात  

आढावा घेत आहोतपरळी तालुक्यातील या गावात दोन महिन्यांपासून पाऊस नाही. पिकांचा अंदाज व आढावा घेण्याचे काम तालुका कृषी कार्यालयामार्फत सुरू आहे.- अशोक सोनवणे, तालुका कृषी अधिकारी, परळी वैजनाथ

बळीराजा काय म्हणतो?

- गोदाकाठच्या या भागात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने गुंगारा दिला आहे. पाण्याचा ठणठणाट आहे. उसाचे उत्पन्न हुमणीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात घटणार आहे. गेल्या वर्षीचे कापसाचे बोंडअळीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. - राजाभाऊ पौळ 

- सोयाबीनवर केलेला खर्चही निघणे अशक्य आहे. पावसाअभावी खरीप पिके हातची गेली आहेत व रबी पिकाची पेरणी शक्य नाही. - बाजीराव काळे 

- पोहनेरसह लगतच्या रामेवाडी, कासारवाडी शिवारातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे महसूलमंत्र्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन दुष्काळ जाहीर करावा. - भगवान पौळ 

- उसाला हुमणीने खाऊन टाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचा गोडवा राहणार नाही. परिणामी, हाती काहीच पडणार नाही. शेतकरी संपत चालला आहे. - मुस्सा शेख  

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस