शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सर्वांसाठी दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 01:08 IST

अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श समोर ठेवला आहे. तो मार्गदर्शक ठरत आहे, असे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी गोरगरिबांना आपले हक्क मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अशा महापुरूषांची जयंती विविध उपक्रमाने साजरी होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मानवतेची सेवा करून अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श समोर ठेवला आहे. तो आदर्श आजच्या तरूण पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरत आहे, असे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त सत्यशोधक प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरुण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, गणेश वाघमारे, दादाराव रोकडे, नितीन धांडे, अरूण बोंगाणे, नगरसेवक रवींद्र कदम, गणेश वाघमारे, दीपक थोरात आदी उपस्थित होते.जयदत्त क्षीरसागर म्हणाले, सत्यशोधक प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सामाजिक कार्यात पुरस्कार घेणाऱ्या तरूण मंडळीमुळे अनेक गरजू लोकांना दिलासा मिळतो. साहित्यिक क्षेत्रात दर्जेदार आणि समाजाभिमुख लिखाण करून अण्णा भाऊ साठे यांनी गोरगरिबांना आपले हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला.देशात अशा महामानवाची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मानवतेची सेवा करून अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श निर्माण केला आहे. साहित्य क्षेत्रात विविध विषयावर त्यांचे लिखाण आजही समाजाला प्रेरणा देत असते.गुणवत्ता ही जाती धर्मावर आधारित नसते. माणसाचे कर्तृत्व हे आदर्श असावे लागते असे त्यांनी म्हटले.पुढे बोलताना ते म्हणाले, सामाजिक कायार्चा वसा आणि वारसा बीड जिल्ह्यात नेहमीच दिसत आला आहे. गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. वंचित आणि उपेक्षित समाजासाठी आपण अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. अनेकांना स्वत:च्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश मिळत आहे.विकासाचा दृष्टीकोन सर्वधर्म सम भावाची भूमिका ठेवतो. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे यासाठीच आपला प्रयत्न असतो. यापुढेही समाजाच्या सेवेसाठी जेथे पुढाकार घेऊन काम करायचे आहे तेथे नक्कीच करू असा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.यावेळी सुमंत गायकवाड, सखाराम मस्के, बाबासाहेब थोरात, शिवाजीराव तांदळे, वैभव जोगदंड, सचिन अवचर, नितीन मुजमुले, अ‍ॅड.साळवे, प्रतिक अडागळे, लहू जाधव, सीमा ओस्तवाल उपस्थित होते.यांचा झाला सन्मानसत्यशोधक प्रतिष्ठाणच्या वतीने पुरस्कार वितरण व कर्मवीर एकनाथराव आव्हाड हेल्पलाईन नंबरचे लोकार्पण करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या आशा वरपे, मुसाखान, स्वाती अहिरे, सुनीता सोनवणे, संध्या धुरंधरे, साधना कुडके, संगीता जोगदंड, मुक्ता कदम, सुषमा सावळे, डॉ.परमेश्वर डोंगरे, डॉ.संकेत बाहेती, डॉ.किरण शिंदे, मनीषा उजगरे, उत्तम हजारे, मनीषा साळुंके, डॉ. संगीता पिंगळे, डॉ.संजय राऊत यांना रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरSocialसामाजिकBlood Bankरक्तपेढी