शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सर्वांसाठी दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 01:08 IST

अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श समोर ठेवला आहे. तो मार्गदर्शक ठरत आहे, असे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी गोरगरिबांना आपले हक्क मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अशा महापुरूषांची जयंती विविध उपक्रमाने साजरी होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मानवतेची सेवा करून अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श समोर ठेवला आहे. तो आदर्श आजच्या तरूण पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरत आहे, असे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त सत्यशोधक प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरुण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, गणेश वाघमारे, दादाराव रोकडे, नितीन धांडे, अरूण बोंगाणे, नगरसेवक रवींद्र कदम, गणेश वाघमारे, दीपक थोरात आदी उपस्थित होते.जयदत्त क्षीरसागर म्हणाले, सत्यशोधक प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सामाजिक कार्यात पुरस्कार घेणाऱ्या तरूण मंडळीमुळे अनेक गरजू लोकांना दिलासा मिळतो. साहित्यिक क्षेत्रात दर्जेदार आणि समाजाभिमुख लिखाण करून अण्णा भाऊ साठे यांनी गोरगरिबांना आपले हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला.देशात अशा महामानवाची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मानवतेची सेवा करून अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श निर्माण केला आहे. साहित्य क्षेत्रात विविध विषयावर त्यांचे लिखाण आजही समाजाला प्रेरणा देत असते.गुणवत्ता ही जाती धर्मावर आधारित नसते. माणसाचे कर्तृत्व हे आदर्श असावे लागते असे त्यांनी म्हटले.पुढे बोलताना ते म्हणाले, सामाजिक कायार्चा वसा आणि वारसा बीड जिल्ह्यात नेहमीच दिसत आला आहे. गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. वंचित आणि उपेक्षित समाजासाठी आपण अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. अनेकांना स्वत:च्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश मिळत आहे.विकासाचा दृष्टीकोन सर्वधर्म सम भावाची भूमिका ठेवतो. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे यासाठीच आपला प्रयत्न असतो. यापुढेही समाजाच्या सेवेसाठी जेथे पुढाकार घेऊन काम करायचे आहे तेथे नक्कीच करू असा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.यावेळी सुमंत गायकवाड, सखाराम मस्के, बाबासाहेब थोरात, शिवाजीराव तांदळे, वैभव जोगदंड, सचिन अवचर, नितीन मुजमुले, अ‍ॅड.साळवे, प्रतिक अडागळे, लहू जाधव, सीमा ओस्तवाल उपस्थित होते.यांचा झाला सन्मानसत्यशोधक प्रतिष्ठाणच्या वतीने पुरस्कार वितरण व कर्मवीर एकनाथराव आव्हाड हेल्पलाईन नंबरचे लोकार्पण करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या आशा वरपे, मुसाखान, स्वाती अहिरे, सुनीता सोनवणे, संध्या धुरंधरे, साधना कुडके, संगीता जोगदंड, मुक्ता कदम, सुषमा सावळे, डॉ.परमेश्वर डोंगरे, डॉ.संकेत बाहेती, डॉ.किरण शिंदे, मनीषा उजगरे, उत्तम हजारे, मनीषा साळुंके, डॉ. संगीता पिंगळे, डॉ.संजय राऊत यांना रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरSocialसामाजिकBlood Bankरक्तपेढी