शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सर्वांसाठी दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 01:08 IST

अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श समोर ठेवला आहे. तो मार्गदर्शक ठरत आहे, असे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी गोरगरिबांना आपले हक्क मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अशा महापुरूषांची जयंती विविध उपक्रमाने साजरी होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मानवतेची सेवा करून अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श समोर ठेवला आहे. तो आदर्श आजच्या तरूण पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरत आहे, असे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त सत्यशोधक प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरुण डाके, विलास बडगे, दिनकर कदम, गणेश वाघमारे, दादाराव रोकडे, नितीन धांडे, अरूण बोंगाणे, नगरसेवक रवींद्र कदम, गणेश वाघमारे, दीपक थोरात आदी उपस्थित होते.जयदत्त क्षीरसागर म्हणाले, सत्यशोधक प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सामाजिक कार्यात पुरस्कार घेणाऱ्या तरूण मंडळीमुळे अनेक गरजू लोकांना दिलासा मिळतो. साहित्यिक क्षेत्रात दर्जेदार आणि समाजाभिमुख लिखाण करून अण्णा भाऊ साठे यांनी गोरगरिबांना आपले हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला.देशात अशा महामानवाची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. मानवतेची सेवा करून अण्णा भाऊ साठे यांनी समाजकार्य कसे असावे याचा आदर्श निर्माण केला आहे. साहित्य क्षेत्रात विविध विषयावर त्यांचे लिखाण आजही समाजाला प्रेरणा देत असते.गुणवत्ता ही जाती धर्मावर आधारित नसते. माणसाचे कर्तृत्व हे आदर्श असावे लागते असे त्यांनी म्हटले.पुढे बोलताना ते म्हणाले, सामाजिक कायार्चा वसा आणि वारसा बीड जिल्ह्यात नेहमीच दिसत आला आहे. गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. वंचित आणि उपेक्षित समाजासाठी आपण अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. अनेकांना स्वत:च्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश मिळत आहे.विकासाचा दृष्टीकोन सर्वधर्म सम भावाची भूमिका ठेवतो. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे यासाठीच आपला प्रयत्न असतो. यापुढेही समाजाच्या सेवेसाठी जेथे पुढाकार घेऊन काम करायचे आहे तेथे नक्कीच करू असा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.यावेळी सुमंत गायकवाड, सखाराम मस्के, बाबासाहेब थोरात, शिवाजीराव तांदळे, वैभव जोगदंड, सचिन अवचर, नितीन मुजमुले, अ‍ॅड.साळवे, प्रतिक अडागळे, लहू जाधव, सीमा ओस्तवाल उपस्थित होते.यांचा झाला सन्मानसत्यशोधक प्रतिष्ठाणच्या वतीने पुरस्कार वितरण व कर्मवीर एकनाथराव आव्हाड हेल्पलाईन नंबरचे लोकार्पण करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या आशा वरपे, मुसाखान, स्वाती अहिरे, सुनीता सोनवणे, संध्या धुरंधरे, साधना कुडके, संगीता जोगदंड, मुक्ता कदम, सुषमा सावळे, डॉ.परमेश्वर डोंगरे, डॉ.संकेत बाहेती, डॉ.किरण शिंदे, मनीषा उजगरे, उत्तम हजारे, मनीषा साळुंके, डॉ. संगीता पिंगळे, डॉ.संजय राऊत यांना रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरSocialसामाजिकBlood Bankरक्तपेढी