शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

"धनंजय मुंडेंचा यामध्ये हात आहे हे कन्फर्म होत नाही तोपर्यंत..."; छगन भुजबळांकडून पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:53 IST

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य नसल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटलं

Chhagan Bhujbal on Dhananjay Munde: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य नसल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं असून त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. यातून धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदापासून दूर करण्यात यावं अशी मागणी सातत्याने होत आहेत. मात्र याबाबत बोलताना विनाकारण माझा राजीनामा मागितला जातोय अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली होती. त्यानंतर आता छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंचे समर्थन करत त्यांचा या प्रकरणामध्ये हात नसल्याचे म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

"मला मंत्री व्हायचंय म्हणून कुणाचा तरी राजीनामा घ्यावा असं माझ्या मनात येणं शक्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि जर त्याच्यामध्ये जर कोणी दोषी सापडलं तर त्या सगळ्यांवर कारवाई करू. त्या अगोदरच आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागतो आहोत. चौकशीतून काही बाहेर आलं आहे का? तुमच्याकडे काही माहिती असेल तर पोलिसांना द्या. जोपर्यंत कन्फर्म होत नाही की धनंजय मुंडे यांचा या प्रकरणांमध्ये हात आहे तोपर्यंत त्यांनी का राजीनामा द्यावा? साप साप म्हणून भुई थोपटणे योग्य नाही. अशा प्रकरणातून मी सुद्धा गेलो आहे," असं छगन भुजबळ म्हणाले.

"धनंजय मुंडे यांचा या प्रकरणामध्ये हात कुठे आहे. तसं काही सिद्ध झालेलं नाही. जर तुमच्याकडे माहिती असेल तर त्यांना द्या. मला वाटतं की कुणावर अन्याय होता कामा नये. दोशीला शिक्षा झाली पाहिजे," असंही छगन भुजबळ म्हणाले.

खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक - सुरेश धस

सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी पुण्यात सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुरेश धस यांनी खळबळजनक दावा केला. पवनचक्की कंपनीकडून खंडणीसाठी मुंडेंच्याच बंगल्यावर बैठक झाली होती. त्यातूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे सुरेश धस यांनी केला.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडेChhagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस