शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

मरण झाले स्वस्त; बीडमध्ये चार वर्षात २३२५ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:42 IST

‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘नियम पाळा, अपघात टाळा’, ‘वाहने सावकाश चालवा’, ‘मद्यपान करून वाहने चालवू नका’, ‘अति घाई, संकटात नेई’ यासारखे संदेश देणारे फलक रस्त्यारस्त्यांवर दिसतात. परंतु प्रत्यक्षात याचा उपयोग होत नसल्याचे दिसते. ते केवळ शोभेचे बाहुले बनल्याचे समोर आले. मागील चार वर्षात बीड जिल्ह्यात तब्बल २३८५ अपघात झाले असून यामध्ये १२३६ लोकांना प्राण गमवावे लागले आहे. तर १७८६ लोक गंभीर जखमी झाले आहेत.

सोमनाथ खताळ ।

लोकमत न्यूज नेटवर्क‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘नियम पाळा, अपघात टाळा’, ‘वाहने सावकाश चालवा’, ‘मद्यपान करून वाहने चालवू नका’, ‘अति घाई, संकटात नेई’ यासारखे संदेश देणारे फलक रस्त्यारस्त्यांवर दिसतात. परंतु प्रत्यक्षात याचा उपयोग होत नसल्याचे दिसते. ते केवळ शोभेचे बाहुले बनल्याचे समोर आले. मागील चार वर्षात बीड जिल्ह्यात तब्बल २३८५ अपघात झाले असून यामध्ये १२३६ लोकांना प्राण गमवावे लागले आहे. तर १७८६ लोक गंभीर जखमी झाले आहेत. सरासरीनुसार जिल्ह्यात दीड दिवसाला दोन अपघात, तर दिवसाला एक व्यक्ती ठार होत असल्याचे दिसून येते. खराब रस्ते, नियमांचे पालन न करणे, मद्यपान, निष्काळजीपणा, अति घाई यासारखे मुद्दे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. आकडेवारी आणि परिस्थितीवरून ‘मरण झाले स्वस्त’ अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.

सध्या बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली आहे. विस्कळीत वाहतूक व्यवस्था, नियमांचे पालन न करणे यासारखी कारणे अपघातास निमंत्रण देत आहेत. बीड जिल्ह्यातून जाणाºया सोलापूर - धुळे या राष्ट्रीय महामार्गावरुन छोट्या मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. वर्दळ पाहता हा राष्ट्रीय महामार्गा खूपच अरुंद आहे. त्यामुळे या मार्गावर सर्वाधिक अपघातांची नोंद आहे.

दरम्यान, जिल्हा पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून वेळोवेळी रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते. या माध्यमातून नियमांचे पालनासंदर्भात आवाहन केले जाते. तसेच मार्गदर्शनही केले जाते. परंतु प्रशासनाकडूनही कागदोपत्रीच घोडे नाचविले जात असल्याने वाहनधारकांपर्यंत जनजागृती खºया अर्थाने पोहचत नाही. याचा परिणामही अपघातांवर होत आहे.

बांधकाम विभागही जबाबदारजिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अपयश आले आहे. केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम बांधकाम विभागाकडून केले जात आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही रस्ते जैसे थे च आहेत. अरुंद व खड्डेमय रस्त्यांमुळेच अपघात होत असल्याचे समोर आले असून, अशा अपघातास बांधकाम विभागच जबाबदार असल्याचे सदरील परिस्थितीवरुन दिसते.

प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डेजिल्ह्यातील चार दोन रस्ते सोडता एकही रस्ता खड्डेमुक्त नाही. फुटाफुटावर खड्डे असल्याने अपघात होत आहेत. अंबाजोगाई तालुक्यात दोन मुलींचा खड्डे चुकविताना दुचाकीवरुन पडून, तर रिक्षा पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाला होता. अशी अनेक उदाहरणे जिल्ह्यात आहेत.

एआरटीओचे दुर्लक्ष कारणीभूतजिल्ह्यात विनापरवाना वाहन चालक व वाहनांचा सुळसुळाट आहे. मनुष्यबळ कमी आहे अशी कारणे देत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाया करण्यास टाळाटाळ केली जाते. तसेच त्यांचा हलगर्जीपणाच अपघातास कारणीभूत ठरतो. कार्यालयाने वेळोवेळी वाहनांची तपासणी केली तर अपघात नियंत्रणात येतील. परंतु तसे होत नाही. येथील वाहन निरीक्षक, सहाय्यक वाहन निरीक्षक या वाहनधारकांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. कार्यालयाच्या आस्थापनेवर मंजूर ४५ पैकी तब्बल ३३ पदे रिक्त आहेत. कामाचा आवाका पाहता कर्मचाºयांवर ताण पडतो. अनेकदा कार्यालयाचे कामकाज ठप्प राहते.

अल्पवयीन वाहन चालकांचा सुळसुळाटजिल्हाभरात अल्पवयीन वाहन चालकांचा सुळसुळाट आहे. परवाना नसतानाही भरधाव वाहने चालवितात. वाहन चालविण्यासाठी त्यांची शारीरिक व बौद्धिक क्षमता नसते. पाल्यांच्या हट्टापायी त्यांच्या हाती वाहनाची चावी दिली जाते. आणि हेच त्यांच्या अंगलट आल्याचे दिसून येते. जिल्ह्यात अशी अनेक उदाहरणे दिसून येतात.

भरधाव वेगही अपघातास कारणीभूत‘अति घाई संकटात नेई’ असे घोषफलक रस्त्याच्या कडेला दिसतात. परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष नसते. भरधाव वाहन असताना अचानक कुत्रे-मांजर अन्य कोणीतरी आडवे येते आणि अचानक ब्रेक दाबल्यानंतर वाहन पलटी होऊन जीव जातो. दीड वर्षापूर्वी वडवणी तालुक्यात असा अपघात झाला होता.

एसटीचे दोन वर्षात १९३ अपघातमागील दोन वर्षात एसटीचे तब्बल १९३ अपघात झाले आहेत. यात २४ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. जखमींची संख्या ५० वर आहे. भरधाव वेग आणि बसवरील नियंत्रण सुटणे यामुळे एसटीचे अपघात घडत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.