मृत्युसत्र सुरूच ; पुन्हा १० कोरोना बळी, नवे ३७५ रुग्ण तर ६१७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST2021-06-03T04:24:03+5:302021-06-03T04:24:03+5:30
जिल्ह्यात मंगळवारी ३ हजार ८५२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचे अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त झाले. यात ३७५ जण ...

मृत्युसत्र सुरूच ; पुन्हा १० कोरोना बळी, नवे ३७५ रुग्ण तर ६१७ कोरोनामुक्त
जिल्ह्यात मंगळवारी ३ हजार ८५२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचे अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त झाले. यात ३७५ जण पॉझिटिव्ह तर ३ हजार ४७७ जण निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात २६, आष्टी ५४, बीड ७७, धारूर ७, गेवराई ५१, केज ४२, माजलगाव २६, परळी १६, पाटोदा २८, शिरूर ३६ व वडवणी तालुक्यातील १२ रुग्णांचा समावेश आहे. तसेच दिवसभरात ६१७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान आरोग्य विभागाकडे ४ जुन्या व मागील २४ तासातील ६ अशा १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात सिंधी (ता.केज) येथील ७७ वर्षीय महिला, अंबाजोगाई शहरातील ६७ वर्षीय महिला, बनसारोळा (ता.केज) येथील ६५ वर्षीय महिला, वलीपूर तांडा (ता. बीड) येथील ६० वर्षीय पुरुष, पायतळवाडी (ता.माजलगाव) येथील ५५ वर्षीय पुरुष व सुकळी (ता.केज) येथील येथील ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
दरम्यान, आता एकूण कोरोना बाधितांची संख्या ८७ हजार ३०७ इतकी झाली आहे. यापैकी ८१ हजार १२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर आतापर्यंत २००९ जणांचा बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ४ हजार १७५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, डीएचओ डॉ. आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.