शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

धरण उशाला, पाणी मिळेना शेतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:31 IST

वडवणी : तालुक्यातील सोन्ना खोट्टा येथील अप्पर कुंडलिका प्रकल्पातील डाव्या कालव्यातील बंद पाईपलाईनद्वारे बाहेगव्हाणच्या २५ शेतकऱ्यांच्या ५० एकर ...

वडवणी

: तालुक्यातील सोन्ना खोट्टा येथील अप्पर कुंडलिका प्रकल्पातील डाव्या कालव्यातील बंद पाईपलाईनद्वारे बाहेगव्हाणच्या २५ शेतकऱ्यांच्या ५० एकर शेतीसाठी अद्यापही पाणी मिळत नाही. दहा दिवसात पाणी उपलब्ध करून न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. बाहेगव्हाण येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

तालुक्यातील बाहेगव्हाण शिवारात गट क्रमांक ३६५, ३६७, ३३३, ५३, ३६२, ३५०, ३४० ,३४८ ,३६८ मधील ४० ते ५० एकर जमीन धरणाच्या जवळच आहे. यातील गट क्रमांक ३६५ मधून ही बंद पाईपलाईन गेलेली आहे.तरीही शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध होत नाही. सोन्ना खोट्टा येथील अत्यंत महत्त्वाकांक्षी उर्ध्व कुंडलिका प्रकल्प हा तालुक्याचे नंदनवन करणारा आहे. मात्र तो काही शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरला आहे. शेजारी गटातील जमीन ओलिताखाली आली आहे. मात्र पाटबंधारे विभागाच्या चुकीने आमची जमीन ओलिताखाली येत नाही. सध्या येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ऊस,उन्हाळी बाजरी, भुईमूग इत्यादी पिकाची लागवड केली आहे. पाणी न मिळाल्यास ही पिके जळून जातील व मोठा आर्थिक फटका बसेल, अशी व्यथा मांडत शेतीला पाणी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

या निवेदनावर सुदाम धोंडिबा मस्के, शिवाजी धोंडिबा मस्के, भगवान धोंडीबा मस्के,सतीश लक्ष्मण वाघमारे,भागवत गंगाधर मस्के, बबन काशिनाथ नागवे,दगडू वैजुबा नागवे, गुलाब हरिभाऊ मस्के, अशोक सुदाम मस्के, संभाजी सुदाम मस्के, मनोहर शिवाजी मस्के, अंकुश शिवाजी मस्के, गोविंद भगवान मस्के, वैभव भगवान मस्के, गुलाब हरिबा मस्के, मुक्ताबाई सर्जेराव मस्के, दत्ता लक्ष्मण अलगट, खंडू यशवंत नागवे, मथलसाबाई खंडू नागवे,चक्रधर खंडू नागवे, सर्जेराव हरिभाऊ मस्के, रामदास रावसाहेब मस्के यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आमरण उपोषणानंतर आत्मदहन सोन्नाखोट्टा येथील धरणाच्या पाण्याचे आम्ही सगळ्यांनी स्वप्न बघितले होते. मात्र अधिकारी व इंजिनियर यांनी मिळून आम्हाला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. डोळ्यादेखत पाणी दुसऱ्याच्या शेतात जाते तेव्हा पोटात आग होते.'पाणी उशाला आहे मात्र घशात येईना' अशी आमची अवस्था झाली आहे. इंजिनियरला विचारले तर ते म्हणतात, तुमचा भाग कमांडमध्ये नाही. त्यामुळे पाणी देता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करावे.-चक्रधर नागवे, शेतकरी

धरणाचे पाणी फक्त २८०० हेक्टरलाच

प्रकल्पाच्या पाण्याचे नियोजन करताना बाहेगव्हाण, चिंचोटी,साळींबा, तिगाव,पुसरा,यासह इतर गावातील फक्त २८०० हेक्टर जमिनीलाच पाणी देता येईल असे केलेले आहे. तो भाग कमांडमध्ये नाही. मात्र संबंधित शेतकऱ्याच्या जमिनी या रेल्वेच्या भू-संपादनात गेलेल्या आहेत. म्हणून त्यांना पाण्याचा लाभ देता येईल. तशा पद्धतीचा प्रस्ताव तयार केला असून शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. -सुनील अपसिंगेकर, अभियंता, पाटबंधारे विभाग बीड.

===Photopath===

200321\20bed_3_20032021_14.jpg