शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

CoronaVirus : अडीचशे वर्षांपासून अखंडित सुरू असलेल्या रामनवमी उत्सवाला पहिलाच खंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 4:27 PM

रामनवमी, दशमी व हनुमान जयंती असा तब्बल १५ दिवस हा उत्सव चालतो.

ठळक मुद्देप्लेगच्या साथीतही शेतात साजरा होत होता उत्सवखडकपुरा व मंडीबाजर परिसरातील मंदिरात होतो उत्सव

- अविनाश मुडेगांवकर

अंबाजोगाई -  अंबाजोगाईत गेल्या अडीचशे वर्षांपासून अखंडित सुरू असलेला राम नवमी उत्सवाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ब्रेक बसला आहे. यापूर्वी आलेल्या प्लेगच्या साथीतही हा उत्सव शेतात साजरा व्हायचा. मात्र, गेल्या अडीचशे वर्षात उत्सव बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.    

अंबाजोगाईत खडकपुरा परिसरात असलेले श्रीराम मंदिर व मंडीबाजार परिसरातील पाटील चौकातील श्रीराम मंदिर ही दोन्ही मंदिरे, श्री. समर्थ रामदास स्वामी, श्री. कल्याण स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झालेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात या मंदिराचा मोठा इतिहास आहे. पारतंत्र्यातील लोकांना प्रबोधनासाठी व बलोपसाना व राष्ट्रभक्ती केंद्रे म्हणून त्याकाळी या मंदिराकडे पाहिले जायचे. या मंदिराच्या माध्यमातून अनेक आश्रितांना व वाटसरूंना आधार म्हणून ही मंदिरे असायची. अंबाजोगाईतील या दोन्ही मंदिरांना प्राचीन काळांपासून मोठे महत्त्व आहे व जागृत देवस्थान म्हणून या दोन्ही राम मंदिराची ख्याती पंचक्रोशीत आहे. 

अंबाजोगाईच्या या दोन्ही राममंदिरात रामनवमी उत्सव साजरा होतो. हा उत्सव शहरवासियांचा उत्सव म्हणून ओळखला जातो. चैत्र प्रतिपदा गुढीपाडव्याच्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होेते. रामनवमी, दशमी व हनुमान जयंती असा तब्बल १५ दिवस हा उत्सव चालतो. या उत्सवाच्या कालावधीत भजन, कीर्तन, प्रवचन असे समाज प्रबोधनाचे अनेक उपक्रम राबविले जातात. रामनवमीच्या दिवशी जन्मोत्सवासाठी हजारो भाविकांनी गर्दी तर दशमीच्या दिवशी महाप्रसादासाठी तेवढीच गर्दी होते. नवमीमच्या कालावधीत दररोज रात्री होणारे संगीत भजन, ढोलकी, झांजा व मधुर आवाजात सादर होणारी रामगीते हे  शहरवासियांचे मोठे आकर्षण आहे. पिढया न ्पिढया सुरू असलेला हा उत्सव भाविकांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच या उत्सवासाठी बाहेरगावी असणारे भाविकही उत्सवाला आवर्जून हजेरी लावतात. व या उत्सवातून अनेकांना वर्षभराची नवी ऊर्जा मिळते. असा या उत्सवाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच ब्रेक लागले आहे.  या उत्सवासाठी पुढाकार घेणारे  मठाधिपती नागनाथबुवा रामदासी, गदाधरबुवा रामदासी, कल्याणबुवा रामदासी,श्रीहरी रामदासी, प्रकाश पुसरेकर यांना या वर्षीचा हा उत्सव भाविकाविना साजरा करण्याची वेळ आली आहे. 

प्लेगच्या साथीतही साजरा होत असे उत्सव

अडीचशे वर्षाची परंपरा असलेला हा रामनवमीचा उत्सव अखंडित सुरू आहे. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात  दोन वेळा प्लेगची मोठी साथ निर्माण झाली. या काळात संपूर्ण गावं ओस पडले होते.  मात्र, हा रामनवमीचा उत्सव भाविकांनी व मठाधिपतींनी शेतात साजरा केला होता. अशी माहिती मठाधिपती गदाधरबुवा रामदासी यांनी लोकमतशी बोलतांना दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडcultureसांस्कृतिक