शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

CoronaVirus : कोरोनाची कमाल... विक्रीच नसल्याने काकडीचा झाला भोपळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 13:29 IST

विक्रीस आणलेला निम्मा भाजीपाला फेकून देण्याची वेळ

ठळक मुद्देटनावर आलेले पीक फेकून देण्याची वेळजळगाव मंजराच्या शेतकऱ्याची व्यथा

- अनिल भंडारीबीड : पिकलेलं माळवं शहरात नेऊन विकता येईना... अडीच तासात विकून विकून किती विकणार. उरलेला परत न्यायची वेळ, फेकून दिले तर जनावरेही खाईनात.. काकडीतर टनावर उगवली. काकडीचा भोपळा झाला.. फेकून द्यायची वेळ आली बघा...अशी व्यथा गेवराई तालुक्यातील रुईधानोरालगत असलेल्या जळगाव मंजरा येथील सतीश गव्हाणे नामक भाजी उत्पादक शेतकरी व्यक्त करीत होता. 

सतीश गव्हाणे भाजीशेती करतात. भेंडी, गवार, टोमॅटो, मिरची, काकडीचे उत्पादन घेतात. मंगळवारी संचारबंदीतील शिथिल वेळ संपली आणि भाज्यांचे एकावर एक असे चार कॅरेट लावलेल्या दुचाकीवरुन गावची वाट धरली. वाटेत लोकमत प्रतिनिधीने थांबवून चर्चा केली असता भाजी उत्पादकांची व्यथा समोर आली. वेळ कमी असल्याने आणलेला भाजीपाला विकत नाही. फिरुन विकायलाही परवडत नाही. आधी चांगलं होतं, एकाच ठिकाणी बसून कमी- जास्त दरात विकायचो पण सगळा भाजीपाला विकत होता. विक्रीला वेळ वाढवून दिलातरी लोक बाहेर येत नाहीत. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आता निम्मा माल परत घरी घेऊन जावा लागतोय. सुकून खराब होतो. त्यात उद्या परत बंद आला. कसा विकणार भाजीपाला? असा सवाल करतानाच जनावरंही खाऊन कंटाळल्याचे तो म्हणाला. 

सारं कसं पांगलंय लहान भाजी उत्पादक शेतकऱ्यांना कोणी समजुनच घेईना.पहिले व्यवस्थित होतं, लॉकडाऊनपासून सगळं गणितच बिघडलं बघा. एक- दोन ग्राहक खरेदी करु लागले की, गर्दी करु नका म्हणत हुसकावलं जातं. आमचे भाव परवडणारे अन् माल ताजा असतो, पण सारं कसं पांगलंय. शिल्लक राहिलेला भाजीपाला फेकून द्यावा लागतोय, जनावरंही खाऊन- खाऊन कंटाळल्याचे हा शेतकरी म्हणाला. गावात इतरही अनेक भाजी उत्पादक शेतकरी आहेत, पण अशा परिस्थितीमुळे तेही माळवं विकायला येत नसल्याचे सतीश गव्हाणे म्हणाला. 

चल गं काकडी टुणूक टुणूक... आहे शेतातच पडूनबालजगतमध्ये ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ अशी लघुकथा होती. मात्र सध्याच्या परिस्थिती ‘चल गं काकडी टुणूक टुणूक म्हणायची वेळ आली आहे. परंतू कोरोनामुळे शेतातच २ किलो भोपळ्याएवढी पिकलेली पोसलेली काकडी पाहून उत्पादकांवर रडायची वेळ आली आहे. सतीश गव्हाणे यांनी त्यांच्या एक एकर शेतात काकडीचे पीक घेतले. बी, खत, औषधे, वेल व्यवस्थापन आणि कुंणावर १८ हजारापर्यंत खर्च केला. किमान सव्वालाख रुपये येतील अशी आशा होती. पदरी मात्र ४-५ हजारच आले. रोज तोडीवी लागते, पण तोडून विकायची कोठे हा प्रश्न आहे. त्यामुळे टनावर काकडी शेतातच पडून आहे. तिला बाहेर काढायचा खर्च वेगळाच लागणार आहे. 

आमदनी अठन्नी, खर्चा रुपयागावापासून बीडपर्यंत येणं जाणं दिडशे रुपयांचं पेट्रोल लागतं. भाजी विक्रीतून कसेबसे ४०० रुपये येतात. भाजी तोडणीला घरच्या लोकांशिवाय २०० रुपये रोजने गडी लावावा लागतो. घर कसं चालवायचं? हायतोवर जपतोय. भाजी विक्रीला विनात्रास वेळ वाढवून मिळाला तर बरं होईल, अशी प्रतिक्रिया तरुण शेतकऱ्याने व्यक्त केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडFarmerशेतकरी