शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus : प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच बीड कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 11:53 AM

आरोग्य, पोलीस यांच्याबरोबरच महसूल, जिल्हा परिषद, नगरपालिका, शिक्षण, बँक, महावितरण, बीएसएनएल, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा, पत्रकार अशा सर्वांनीच कोरोनावर मात करण्यासाठी दिवसरात्र एक केलेली आहे.

ठळक मुद्दे३३ हजार ऊसतोड मजुरांची तपासणीआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

बीड : बीड जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासूनच केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच बीडचा शून्य कायम राहिला आहे. सीमाबंदी, नियंत्रणकक्ष, विशेष पथके, चेकपोस्ट तपासणी अन् गावपातळीवरील सर्वेक्षणाचा मोठा फायदा झाला आहे. प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे कोरोना सीमेवरच रोखण्यात यश आले आहे.

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या यंत्रणेची आहे. सुरुवातीपासूनच विदेश, परजिल्ह्यातून आलेल्या लोकांचे सर्वेक्षण करुन माहिती घेतले. त्यांच्याशी वारंवार संपर्क करुन लक्षणे असणाºयांची आरोग्य तपासणी केली. यासाठी विशेष पथके नियुक्त केली. जिल्हा व आरोग्य प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सूचना केल्या जात होत्या. याचे पालन नागरिकांनी केले. जे लोक छुप्या मार्गाने आले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे जरब बसली होती.  याचाच फायदा आतापर्यंत होत आलेला आहे. या उपाययोजनांमुळेच बीड जिल्हा सद्यस्थितीत कोरोनामुक्त आहे.काय केल्या उपाययोजना

२४ तास नियंत्रण कक्षजिल्ह्याच्या ठिकाणी २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन केला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश शिंदेसह १३ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे संपर्क शोधणे, संशयित प्रवासी शोधणे, बाहेरुन आलेल्यांशी संपर्क साधून लक्षणे आहेत का याची माहिती घेणे ही सर्व माहिती अद्ययावत करण्याचे काम नियंत्रण कक्षातून करण्यात आले.

सीमेवरील चेकपोस्टवर तपासणीजिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. १४ ठिकाणी चेकपोस्ट तयार केल्या. त्या सुरु झाल्यापासून ७४ हजार ६६ लोकांच्या नोंदी घेतल्या. प्रत्येकाची नोंद व आरोग्य तपासणी करण्यात आली.

गावपातळीवर सर्वेक्षणप्रत्येक शहर व गावात आशा स्वयंसेवीकांमार्फत घरोघरी जाऊन दोनदा सर्वेक्षण करण्यात आले.  यात परदेशातून ११८, परजिल्ह्यातून १ लाख ९४ हजार ४१५ नागरिक आल्याचे उघड झाले. सर्वांना होम क्वारंटाईन करुन लक्षणांबाबत माहिती घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यात तब्बल ४४० पथके नियुक्त करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती.

३३ हजार ऊसतोड मजुरांची तपासणीऊसतोडणीसाठी बाहेर गेलेल्या मजुरांना जिल्ह्यात आणले. २० चेकपोस्टवर त्यांची नोंद घेऊन आरोग्य तपासणी केली. २८ दिवसांसाठी क्वारंटाईन केले. १ मे पर्यंत ३३ हजार ४११ मजुरांनी जिल्ह्यात प्रवेश केला होता.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरव्हिडीओ कॉन्फरन्सिंग, ग्रुप कॉलिंग अशा माध्यमातून सूचना केल्या. विविध अ‍ॅपच्या माध्यमातून माहिती संकलित केली. लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद घेतली. होम क्वारंटाईन असलेल्यांवर नजर ठेवली. आरोग्य सेतू अ‍ॅपमार्फत स्वत:ची तपासणीही करुन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. कॉन्टॅक्ट ट्रॅकिंग करण्यात आले.

दररोज १२ हजार लोकांची तपासणीआष्टी तालुक्यातील पिंपळा येथे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळताच परिसरातील ७ किलोमीटरमधील ११ गावे बंद केली. १०० घरांमागे १ प्रमाणे अशा ३० पथकांमार्फत नियमित २६२० घरांपर्यंत जाऊन त्यातील १२ हजार ३४५ व्यक्तींशी संवाद साधला. लक्षणे असणाºयांची तात्काळ तपासणी केली. १४ दिवस ही प्रक्रिया सुरु होती.

कोव्हीड योध्दा म्हणून यांचा सहभागआरोग्य, पोलीस यांच्याबरोबरच महसूल, जिल्हा परिषद, नगरपालिका, शिक्षण, बँक, महावितरण, बीएसएनएल, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा, पत्रकार अशा सर्वांनीच कोरोनावर मात करण्यासाठी दिवसरात्र एक केलेली आहे.

सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजन केल्यामुळे कोरोनाला सीमेवर रोखण्यात यश आले आहे. हा कोरोना जिल्ह्यात येऊ नये म्हणून प्रशासन तर प्रयत्न करीतच आहे, मात्र नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे.- डॉ. आर. बी. पवारजिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड