कोरोना अद्याप गेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST2021-06-03T04:23:58+5:302021-06-03T04:23:58+5:30

बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे; परंतु आरोग्य विभागाकडून तिसरी लाट येण्याची ...

Corona hasn't gone yet; If these five mistakes are repeated, the third wave is inevitable | कोरोना अद्याप गेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ

कोरोना अद्याप गेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ

बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे; परंतु आरोग्य विभागाकडून तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे; पण ही लाट टाळण्यासाठी घातलेल्या निर्बंधांचे पालन करण्यासह मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची गरज आहे. तसेच कोरोना लसीकरण गतीने पूर्ण करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट त्रासदायक ठरल्यानंतर दुसरी लाट भयानक राहिली. कोनोबाधितांची संख्या वाढण्यासह मृत्यूदरही झपाट्याने वाढला होता. रोजची रुग्णसंख्या पाहता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागही चिंतेत होता; परंतु मागील आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. तसेच निर्बंधही शिथिल केले जात आहेत. असे असल्याने लोक पुन्हा एकदा बिनधास्त झाले आहेत. काही लोक तर काळजीच घेत नाहीत. अशाच चुका झाल्यास तिसरी लाट येणार हे अटळ आहे.

नगरपालिकेच्या ०६ पथकांची असेल नजर

बीड शहरात लॉकडाऊन असतानाही काही लोक बिनधास्तपणे बाहेर फिरतात. तसेच चोरून लपून, मागच्या दरवाजाने दुकाने चालू ठेवतात.

अशांची तपासणी करण्यासाठी बीड पालिकेकडून सहा पथकांची नियुक्ती केलेली आहे. प्रत्येकाला विभाग देण्यात आले असून, रोज आढावा घेतला जात आहे.

एका पथकात पालिकेचे स्वच्छता निरीक्षक व इतर कर्मचारी तसेच तहसीलचे कर्मचारी आणि संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

गत आठवड्यातच पालिकेचे स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव यांच्या पथकाने एका टेक्स्टाइल्सच्या दुकानाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

दररोज फिरून दुकाने आणि विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाया केल्या जात असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी सांगितले.

एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८७ हजार ३०७

एकूण कोरोनामुक्त ८१ हजार १२३

एकूण कोरोनाबळी २००९

उपचार सुरू असलेले ४ हजार १७५

--

केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासनाने निर्बंधांचे पालन करून घ्यावे.

अत्यावश्यक अथवा महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू देऊ नये.

मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सच्या नियमांबाबत जागृत करावे.

शिथिल वेळ सोडता इतर वेळी लॉकडाऊनची अंमलबजावणी व्हावी.

आरोग्य विभागाने उपचार व सुविधांबाबत विश्वास निर्माण करावा.

===Photopath===

020621\02_2_bed_7_02062021_14.jpeg

===Caption===

बीड शहरातील भाजी मंडईत बुधवारी सकाळी शिथील वेळेत अशाप्रकारे गर्दी जमली होती.

Web Title: Corona hasn't gone yet; If these five mistakes are repeated, the third wave is inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.