शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

कोरोनामुळे बाजार विस्कळीत, तेलाचा भडका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:30 IST

बीड : कोरोना, लॉकडाऊन नियमांचा फटका बसत असल्याने किराणा, भाजी आणि फळबाजार विस्कळीत झाले आहे. रविवारी शहरातील मंडया तसेच ...

बीड : कोरोना, लॉकडाऊन नियमांचा फटका बसत असल्याने किराणा, भाजी आणि फळबाजार विस्कळीत झाले आहे. रविवारी शहरातील मंडया तसेच गुजरी बाजारांमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी दिसून आली.

किराणा बाजारात ग्राहकी शांत असली, तरी तेलांचे भाव मात्र दररोज वाढतच आहेत. सूर्यफुल तेलाचा १५ लीटरचा डबा २५५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सोयाबीन तेलही २०५० रुपयांना १५ लीटरचा डबा विकला जात आहे. परिणामी, ग्राहक तेल खरेदीमध्ये काटकसर करत आहेत. मागील १५ दिवसांत एका लीटरमागे तेलात २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. डाळींसह साखर, गूळ, तुपाचे दर स्थिर आहेत. लग्न, धार्मिक कार्यक्रम, सप्ताह, आदी सार्वजनिक कार्यक्रमांवर प्रतिबंध असल्याने किराणा मालाचा उठाव कमी आहे. त्यामुळे अतिरिक्त ग्राहक नसून घरगुती ग्राहक बाजारपेठेत दिसत आहेत. फळांच्या बाजारात द्राक्षांची आवक वाढली आहे. कलिंगड आणि खरबुजालाही चांगली मागणी आहे. संत्रीची आवक कमी झाली असून मोसंबी चांगलाच भाव खात आहे. डाळिंबाची आवक अंशतः वाढल्याने भाव उतरले आहेत. तर, सफरचंदाचा भाव स्थिर आहे. येथील मंडईत सर्वच भाज्यांची चांगली आवक होत असली, तरी कोरोनामुळे ग्राहकी कमी होती. भाजी बाजारात उन्हाळ्याची चाहूल लागताच लिंबू, कोथिंबिरीचे दर वाढले. लसणाच्या दरात मात्र २० रुपये किलोने वाढ होऊन ८० रुपये किलो झाले. मंडईत विक्रेते आणि ग्राहकांनी मास्कचा वापर केल्यास तसेच अंतर ठेवल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. नियमांचे पालन आवश्यक असल्याचे अमन पठाण या ग्राहकाने सांगितले.

सूर्यफुल १७० रुपये

सूर्यफुल तेल १७०, सोयाबीन तेल १४०, पामतेल १३० रुपये लीटर झाले. शेंगदाण्याचा भाव ११० ते ११५ रुपये होता. कोलम तांदूळ ५५ ते ६० तर बासमतीचे दर ९० ते १०० रुपये किलो होते. नवीन गव्हाचे भाव २४०० ते २५०० रुपये क्विंटल आहे.

खरबूज, टरबूज स्वस्त

लालबाग, बदाम आंबे १०० ते १२० रुपये किलो, तर हापूस ४०० रुपये डझनप्रमाणे विकला जात आहे. द्राक्ष ५० ते ६० रुपये, खरबूज २० रुपये तर

कलिंगड ८ रुपये

किलो होते. डाळिंबाचे भाव घसरून १२० तर आवक घटल्याने संत्रीचे भाव ८० रुपयांपर्यंत होते.

कांदे, बटाटे घसरले

ग्राहकी नसल्याने गवार शेंग ६० ते ८० रुपये किलो होती. शेवगा, दोडका, शिमला, हिरवी मिरची, भेंडीचे दर ३० ते ४० रुपये किलो होते. बटाटे १५ तर कांद्याचे भाव २० रुपये किलोपर्यंत घसरले. लसणाचे भाव ८० तर आले ४० रुपये किलो होते. मेथी जुडी ३ तर कोथिंबीर जुडी २ रुपये होती. लिंबाचे भाव मात्र २५० रुपये शेकडा होते.

गर्दी खूप होते म्हणून ग्राहक फिरकत नाहीत. भाव कमी असूनही मोठ्या प्रमाणात ग्राहकी घटली आहे. - हुजेब समीर बागवान, भाजीविक्रेता

शिवरात्रीला शिवालये बंद होती. मोठे कार्यक्रम नसल्याने साबुदाणा, भगर, उपवासाच्या पदार्थांना उठाव कमी होता. बाजारावर त्याचा परिणाम झाला. - गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी

कोरोनामुळे व लॉकडाऊनच्या नियमांचा परिणाम ग्राहकीवर झाला. बाजारात फळांची मुबलकता असूनही चार दिवसांपासून ग्राहकी अत्यंत कमी आहे. -शकूर बागवान, फळविक्रेता