शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

कोरोनामुळे बाजार विस्कळीत, तेलाचा भडका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:30 IST

बीड : कोरोना, लॉकडाऊन नियमांचा फटका बसत असल्याने किराणा, भाजी आणि फळबाजार विस्कळीत झाले आहे. रविवारी शहरातील मंडया तसेच ...

बीड : कोरोना, लॉकडाऊन नियमांचा फटका बसत असल्याने किराणा, भाजी आणि फळबाजार विस्कळीत झाले आहे. रविवारी शहरातील मंडया तसेच गुजरी बाजारांमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी दिसून आली.

किराणा बाजारात ग्राहकी शांत असली, तरी तेलांचे भाव मात्र दररोज वाढतच आहेत. सूर्यफुल तेलाचा १५ लीटरचा डबा २५५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सोयाबीन तेलही २०५० रुपयांना १५ लीटरचा डबा विकला जात आहे. परिणामी, ग्राहक तेल खरेदीमध्ये काटकसर करत आहेत. मागील १५ दिवसांत एका लीटरमागे तेलात २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. डाळींसह साखर, गूळ, तुपाचे दर स्थिर आहेत. लग्न, धार्मिक कार्यक्रम, सप्ताह, आदी सार्वजनिक कार्यक्रमांवर प्रतिबंध असल्याने किराणा मालाचा उठाव कमी आहे. त्यामुळे अतिरिक्त ग्राहक नसून घरगुती ग्राहक बाजारपेठेत दिसत आहेत. फळांच्या बाजारात द्राक्षांची आवक वाढली आहे. कलिंगड आणि खरबुजालाही चांगली मागणी आहे. संत्रीची आवक कमी झाली असून मोसंबी चांगलाच भाव खात आहे. डाळिंबाची आवक अंशतः वाढल्याने भाव उतरले आहेत. तर, सफरचंदाचा भाव स्थिर आहे. येथील मंडईत सर्वच भाज्यांची चांगली आवक होत असली, तरी कोरोनामुळे ग्राहकी कमी होती. भाजी बाजारात उन्हाळ्याची चाहूल लागताच लिंबू, कोथिंबिरीचे दर वाढले. लसणाच्या दरात मात्र २० रुपये किलोने वाढ होऊन ८० रुपये किलो झाले. मंडईत विक्रेते आणि ग्राहकांनी मास्कचा वापर केल्यास तसेच अंतर ठेवल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. नियमांचे पालन आवश्यक असल्याचे अमन पठाण या ग्राहकाने सांगितले.

सूर्यफुल १७० रुपये

सूर्यफुल तेल १७०, सोयाबीन तेल १४०, पामतेल १३० रुपये लीटर झाले. शेंगदाण्याचा भाव ११० ते ११५ रुपये होता. कोलम तांदूळ ५५ ते ६० तर बासमतीचे दर ९० ते १०० रुपये किलो होते. नवीन गव्हाचे भाव २४०० ते २५०० रुपये क्विंटल आहे.

खरबूज, टरबूज स्वस्त

लालबाग, बदाम आंबे १०० ते १२० रुपये किलो, तर हापूस ४०० रुपये डझनप्रमाणे विकला जात आहे. द्राक्ष ५० ते ६० रुपये, खरबूज २० रुपये तर

कलिंगड ८ रुपये

किलो होते. डाळिंबाचे भाव घसरून १२० तर आवक घटल्याने संत्रीचे भाव ८० रुपयांपर्यंत होते.

कांदे, बटाटे घसरले

ग्राहकी नसल्याने गवार शेंग ६० ते ८० रुपये किलो होती. शेवगा, दोडका, शिमला, हिरवी मिरची, भेंडीचे दर ३० ते ४० रुपये किलो होते. बटाटे १५ तर कांद्याचे भाव २० रुपये किलोपर्यंत घसरले. लसणाचे भाव ८० तर आले ४० रुपये किलो होते. मेथी जुडी ३ तर कोथिंबीर जुडी २ रुपये होती. लिंबाचे भाव मात्र २५० रुपये शेकडा होते.

गर्दी खूप होते म्हणून ग्राहक फिरकत नाहीत. भाव कमी असूनही मोठ्या प्रमाणात ग्राहकी घटली आहे. - हुजेब समीर बागवान, भाजीविक्रेता

शिवरात्रीला शिवालये बंद होती. मोठे कार्यक्रम नसल्याने साबुदाणा, भगर, उपवासाच्या पदार्थांना उठाव कमी होता. बाजारावर त्याचा परिणाम झाला. - गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी

कोरोनामुळे व लॉकडाऊनच्या नियमांचा परिणाम ग्राहकीवर झाला. बाजारात फळांची मुबलकता असूनही चार दिवसांपासून ग्राहकी अत्यंत कमी आहे. -शकूर बागवान, फळविक्रेता