शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

कोरोनामुळे बाजार विस्कळीत, तेलाचा भडका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:30 IST

बीड : कोरोना, लॉकडाऊन नियमांचा फटका बसत असल्याने किराणा, भाजी आणि फळबाजार विस्कळीत झाले आहे. रविवारी शहरातील मंडया तसेच ...

बीड : कोरोना, लॉकडाऊन नियमांचा फटका बसत असल्याने किराणा, भाजी आणि फळबाजार विस्कळीत झाले आहे. रविवारी शहरातील मंडया तसेच गुजरी बाजारांमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी दिसून आली.

किराणा बाजारात ग्राहकी शांत असली, तरी तेलांचे भाव मात्र दररोज वाढतच आहेत. सूर्यफुल तेलाचा १५ लीटरचा डबा २५५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सोयाबीन तेलही २०५० रुपयांना १५ लीटरचा डबा विकला जात आहे. परिणामी, ग्राहक तेल खरेदीमध्ये काटकसर करत आहेत. मागील १५ दिवसांत एका लीटरमागे तेलात २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. डाळींसह साखर, गूळ, तुपाचे दर स्थिर आहेत. लग्न, धार्मिक कार्यक्रम, सप्ताह, आदी सार्वजनिक कार्यक्रमांवर प्रतिबंध असल्याने किराणा मालाचा उठाव कमी आहे. त्यामुळे अतिरिक्त ग्राहक नसून घरगुती ग्राहक बाजारपेठेत दिसत आहेत. फळांच्या बाजारात द्राक्षांची आवक वाढली आहे. कलिंगड आणि खरबुजालाही चांगली मागणी आहे. संत्रीची आवक कमी झाली असून मोसंबी चांगलाच भाव खात आहे. डाळिंबाची आवक अंशतः वाढल्याने भाव उतरले आहेत. तर, सफरचंदाचा भाव स्थिर आहे. येथील मंडईत सर्वच भाज्यांची चांगली आवक होत असली, तरी कोरोनामुळे ग्राहकी कमी होती. भाजी बाजारात उन्हाळ्याची चाहूल लागताच लिंबू, कोथिंबिरीचे दर वाढले. लसणाच्या दरात मात्र २० रुपये किलोने वाढ होऊन ८० रुपये किलो झाले. मंडईत विक्रेते आणि ग्राहकांनी मास्कचा वापर केल्यास तसेच अंतर ठेवल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. नियमांचे पालन आवश्यक असल्याचे अमन पठाण या ग्राहकाने सांगितले.

सूर्यफुल १७० रुपये

सूर्यफुल तेल १७०, सोयाबीन तेल १४०, पामतेल १३० रुपये लीटर झाले. शेंगदाण्याचा भाव ११० ते ११५ रुपये होता. कोलम तांदूळ ५५ ते ६० तर बासमतीचे दर ९० ते १०० रुपये किलो होते. नवीन गव्हाचे भाव २४०० ते २५०० रुपये क्विंटल आहे.

खरबूज, टरबूज स्वस्त

लालबाग, बदाम आंबे १०० ते १२० रुपये किलो, तर हापूस ४०० रुपये डझनप्रमाणे विकला जात आहे. द्राक्ष ५० ते ६० रुपये, खरबूज २० रुपये तर

कलिंगड ८ रुपये

किलो होते. डाळिंबाचे भाव घसरून १२० तर आवक घटल्याने संत्रीचे भाव ८० रुपयांपर्यंत होते.

कांदे, बटाटे घसरले

ग्राहकी नसल्याने गवार शेंग ६० ते ८० रुपये किलो होती. शेवगा, दोडका, शिमला, हिरवी मिरची, भेंडीचे दर ३० ते ४० रुपये किलो होते. बटाटे १५ तर कांद्याचे भाव २० रुपये किलोपर्यंत घसरले. लसणाचे भाव ८० तर आले ४० रुपये किलो होते. मेथी जुडी ३ तर कोथिंबीर जुडी २ रुपये होती. लिंबाचे भाव मात्र २५० रुपये शेकडा होते.

गर्दी खूप होते म्हणून ग्राहक फिरकत नाहीत. भाव कमी असूनही मोठ्या प्रमाणात ग्राहकी घटली आहे. - हुजेब समीर बागवान, भाजीविक्रेता

शिवरात्रीला शिवालये बंद होती. मोठे कार्यक्रम नसल्याने साबुदाणा, भगर, उपवासाच्या पदार्थांना उठाव कमी होता. बाजारावर त्याचा परिणाम झाला. - गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी

कोरोनामुळे व लॉकडाऊनच्या नियमांचा परिणाम ग्राहकीवर झाला. बाजारात फळांची मुबलकता असूनही चार दिवसांपासून ग्राहकी अत्यंत कमी आहे. -शकूर बागवान, फळविक्रेता