शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कोरोनामुळे बाजार विस्कळीत, तेलाचा भडका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:30 IST

बीड : कोरोना, लॉकडाऊन नियमांचा फटका बसत असल्याने किराणा, भाजी आणि फळबाजार विस्कळीत झाले आहे. रविवारी शहरातील मंडया तसेच ...

बीड : कोरोना, लॉकडाऊन नियमांचा फटका बसत असल्याने किराणा, भाजी आणि फळबाजार विस्कळीत झाले आहे. रविवारी शहरातील मंडया तसेच गुजरी बाजारांमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी दिसून आली.

किराणा बाजारात ग्राहकी शांत असली, तरी तेलांचे भाव मात्र दररोज वाढतच आहेत. सूर्यफुल तेलाचा १५ लीटरचा डबा २५५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सोयाबीन तेलही २०५० रुपयांना १५ लीटरचा डबा विकला जात आहे. परिणामी, ग्राहक तेल खरेदीमध्ये काटकसर करत आहेत. मागील १५ दिवसांत एका लीटरमागे तेलात २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. डाळींसह साखर, गूळ, तुपाचे दर स्थिर आहेत. लग्न, धार्मिक कार्यक्रम, सप्ताह, आदी सार्वजनिक कार्यक्रमांवर प्रतिबंध असल्याने किराणा मालाचा उठाव कमी आहे. त्यामुळे अतिरिक्त ग्राहक नसून घरगुती ग्राहक बाजारपेठेत दिसत आहेत. फळांच्या बाजारात द्राक्षांची आवक वाढली आहे. कलिंगड आणि खरबुजालाही चांगली मागणी आहे. संत्रीची आवक कमी झाली असून मोसंबी चांगलाच भाव खात आहे. डाळिंबाची आवक अंशतः वाढल्याने भाव उतरले आहेत. तर, सफरचंदाचा भाव स्थिर आहे. येथील मंडईत सर्वच भाज्यांची चांगली आवक होत असली, तरी कोरोनामुळे ग्राहकी कमी होती. भाजी बाजारात उन्हाळ्याची चाहूल लागताच लिंबू, कोथिंबिरीचे दर वाढले. लसणाच्या दरात मात्र २० रुपये किलोने वाढ होऊन ८० रुपये किलो झाले. मंडईत विक्रेते आणि ग्राहकांनी मास्कचा वापर केल्यास तसेच अंतर ठेवल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. नियमांचे पालन आवश्यक असल्याचे अमन पठाण या ग्राहकाने सांगितले.

सूर्यफुल १७० रुपये

सूर्यफुल तेल १७०, सोयाबीन तेल १४०, पामतेल १३० रुपये लीटर झाले. शेंगदाण्याचा भाव ११० ते ११५ रुपये होता. कोलम तांदूळ ५५ ते ६० तर बासमतीचे दर ९० ते १०० रुपये किलो होते. नवीन गव्हाचे भाव २४०० ते २५०० रुपये क्विंटल आहे.

खरबूज, टरबूज स्वस्त

लालबाग, बदाम आंबे १०० ते १२० रुपये किलो, तर हापूस ४०० रुपये डझनप्रमाणे विकला जात आहे. द्राक्ष ५० ते ६० रुपये, खरबूज २० रुपये तर

कलिंगड ८ रुपये

किलो होते. डाळिंबाचे भाव घसरून १२० तर आवक घटल्याने संत्रीचे भाव ८० रुपयांपर्यंत होते.

कांदे, बटाटे घसरले

ग्राहकी नसल्याने गवार शेंग ६० ते ८० रुपये किलो होती. शेवगा, दोडका, शिमला, हिरवी मिरची, भेंडीचे दर ३० ते ४० रुपये किलो होते. बटाटे १५ तर कांद्याचे भाव २० रुपये किलोपर्यंत घसरले. लसणाचे भाव ८० तर आले ४० रुपये किलो होते. मेथी जुडी ३ तर कोथिंबीर जुडी २ रुपये होती. लिंबाचे भाव मात्र २५० रुपये शेकडा होते.

गर्दी खूप होते म्हणून ग्राहक फिरकत नाहीत. भाव कमी असूनही मोठ्या प्रमाणात ग्राहकी घटली आहे. - हुजेब समीर बागवान, भाजीविक्रेता

शिवरात्रीला शिवालये बंद होती. मोठे कार्यक्रम नसल्याने साबुदाणा, भगर, उपवासाच्या पदार्थांना उठाव कमी होता. बाजारावर त्याचा परिणाम झाला. - गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी

कोरोनामुळे व लॉकडाऊनच्या नियमांचा परिणाम ग्राहकीवर झाला. बाजारात फळांची मुबलकता असूनही चार दिवसांपासून ग्राहकी अत्यंत कमी आहे. -शकूर बागवान, फळविक्रेता