कोरोनामुळे क्षयरोग शोधमोहीम थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:15+5:302021-06-02T04:25:15+5:30
.... लोककलावंतांना आर्थिक मदत द्या वडवणी : कोरोनामुळे विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागातील लोककलावंतांचे ...

कोरोनामुळे क्षयरोग शोधमोहीम थंडावली
....
लोककलावंतांना आर्थिक मदत द्या
वडवणी : कोरोनामुळे विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागातील लोककलावंतांचे आर्थिक गणित बिघडले आहे. शासनाने लोककलावंतांना मदत करावी, अशी मागणी मोरनृत्य कलावंत जगन कलाल यांनी केली आहे.
...
बोगस बियाणे खरेदी करू नका
वडवणी : गेल्या वर्षी काही प्रमाणात बोगस बियाणे खरेदी करून लागवड झाली. मात्र, पुन्हा बोगस बियाणांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या. यावर्षी खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. शेतकरी पेरणीची पूर्वतयारी करीत आहेत. खते, बियाणे घेताना त्याची खात्री करूनच खरेदी करावी. बियाणे बोगस असल्याचा संशय आल्यास तात्काळ कृषी विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उद्धव गर्जे यांनी केले आहे.
....
धूरफवारणी करण्याची मागणी
वडवणी : शहरातील अनेक प्रभागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने धूरफवारणी करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील बाजारपेठेत, मुस्लीम मोहल्ला, मंदिर परिसर, बसस्थानक परिसर, शिक्षक काॅलनी, पाॅवरलूम गल्ली, पाटील गल्ली, राम मंदिर परिसर, अशा विविध भागांमध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी शहरात जनजागृती केली जात आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
.....
खरिपाची तयारी पूर्ण, पावसाची प्रतीक्षा
वडवणी : शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण केली आहे. जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. रोहिणी नक्षत्र सुरू झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण पसरले आहे, लवकरच पावसाची हजेरी लागणार असल्याचे सांगितले जात असल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
....
स्वच्छता मोहीम रखडली
वडवणी : शहरातील गलोगल्ली नाल्यांची अनेक दिवसांपासून स्वच्छता मोहीम रखडली आहे. नाल्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्यांचे व्यवस्थापन बरोबर नसल्यामुळे शहरातील गल्लीचे सांडपाणी नाल्यात न जाता रस्त्यावर जमा होत आहे. त्यामुळे रस्त्यावर नेहमी घाण साचलेली असते. ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे. आता काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असून, त्यापूर्वी नाल्यांची सफाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.