शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

थंडी गायब, गहू - हरभरा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST

माजलगाव : यंदाच्या वर्षी पाहिजे तेवढ्या प्रमाणात थंडी न झाल्याने रब्बी पिके पूर्णतः संकटात सापडली असून, हरभरा आणि ...

माजलगाव : यंदाच्या वर्षी पाहिजे तेवढ्या प्रमाणात थंडी न झाल्याने रब्बी पिके पूर्णतः संकटात सापडली असून, हरभरा आणि गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी खरीप हंगामदेखील हातातून गेल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकाच्या भरोशावर पिकाची लागवड केली. परंतु रब्बीमध्ये निसर्गाने साथ न दिल्याने रब्बीची पिकेदेखील धोक्यात आली आहेत. थंडी नसल्याने हरभरा आणि गहू पिके ही केवळ उगवली असून, हरभऱ्याचे घाटे फोस तर गव्हाच्या ओंब्यादेखील रिकाम्या राहात असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी खरीप पिकाचे पूर्ण नुकसान सहन करत असताना पुन्हा रब्बीने धोका दिला आहे. खरिपाच्या कापसाची तर केवळ एकच वेचणी होऊन पळाट्या शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे जे हाती आले त्यावरच समाधान मानत असताना रब्बीने अस्मानी संकटाचा मारा करत शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. यंदा गहू आणि हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु लागवडीच्या केवळ ५ ते १० टक्केच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

अद्याप अनुदान मिळाले नाही

शेतकऱ्यांना सुलतानीबरोबरच अस्मानी संकट असताना बहुतांश शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कम अद्याप मिळाली नाही. नवीन कर्जदेखील नाही. जुने कर्ज भरल्यानंतर नवीन कर्ज मिळण्यासाठी शेतकरी बँकेच्या दारी उभा असताना अद्यापदेखील नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. रब्बी आणि खरीप हातचे गेल्याने खासगी सावकारांचे चांगभले होताना दिसून येत आहे.