शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्या कारणाने नागरिकांना प्यावे लागतेय हिरवेगार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:26 IST

माजलगाव शहर व ११ खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्र दुरूस्तीच्या नावाखाली ६-७ महिन्यांपासून बंद असल्याने या गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव शहर व ११ खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्र दुरूस्तीच्या नावाखाली ६-७ महिन्यांपासून बंद असल्याने या गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. मागील १५ दिवसांपासून चक्क हिरव्यागार रंगाचे पाणी पिण्याची वेळ आल्याने माजलगाव शहर ग्रामीण भागात मागील अनेक महिन्यांपासून साथरोगाने थैमान घातले असताना येथील नगरपालिका प्रशासनाला काहीच घेणे देणे राहिलेले नसल्याने ते नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत.माजलगाव शहर व आजुबाजूच्या अनेक गावांना पाणीपुरवठा करणा-या जलशुद्धीकरण केंद्रवरील दुरुस्ती करण्यासाठी ६-७ महिन्यांपासून हे जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आले. यामुळे या गावांना सहा महिन्यांपासून थेट धरणातून येणारे पाणी नळाद्वारे देण्यात येत आहे. माजलगाव धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली असल्याने पाण्यासोबत मोठयाप्रमाणावर गाळ येत असल्यामुळे व जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याने पाणी शुध्द न करताच नळाद्वारे सोडण्यात येत आहे. यामुळे मागील सहा महिन्यांपासून या गावांना नळाद्वारे अशुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. आता तर धरणाची पाणी पातळी मोठयाप्रमाणावर खालावल्याने धरणातील पाणी हिरवे पडू लागले आहे.हे पाणी जलशुद्धीकरण बंद असल्याने व पाणी शुद्ध न करताच या गावांना नळाद्वारे सोडल्याने येथील नागरिकांना हिरवेगार शेवाळेयुक्तपाणी पिण्याची वेळ आली आहे. हे दूषित पाणी ६-७ महिन्यांपासून दिले जात असल्याने या पाण्यात घाण येत असून, अनेकवेळा अळ्या देखील पाण्यात निघत आहेत तर या पाण्याची दुर्गंधी येत असल्याने नागरिक या पाण्याचा केवळ सांडपाण्यासाठीच उपयोग करताना दिसत असून, पिण्यासाठी विकतचे पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.दुसरीकडे हे पाणी पिल्याने माजलगाव शहर व आजुबाजूच्या गावांना साथरोगाने थैमान घातले असून, या गावांमध्ये सध्या ताप व जुलाब आदी प्रकारचे साथ रोग फोफावल्याने येथील ग्रामीण व खाजगी रु ग्णालयात या रु ग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. साथ रोगाचे थैमान चालू असताना देखील नगरपालिका प्रशासनाला जाग येत नसून दुरुस्तीच्या नावावर सहा महिन्यांपासून जलशुद्धीकरण बंद ठेवली आहे.माजलगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी हरिकल्याण एल्गट्टे हे २-३ महिन्यांपासून रजेवर असल्याने त्यांचा चार्ज हा येथील तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांच्याकडे दिला होता. परंतु नगरपालिका कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळत नसल्याने व विधानसभा निवडणुकीची कामे चालू असल्याने प्रतिभा गोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे चार्ज संभाळू शकत नसल्याबाबत कळवले असल्याची माहिती मिळते. सध्या कोणाकडेच मुख्याधिकाºयांचा पदभार नसल्याने नगरपालिका वा-यावर असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे थांबली आहेत. त्यामुळे नागरिकांना परेशानीचा सामना करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Waterपाणीpollutionप्रदूषण