शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात रेशन मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:28 IST

आहे त्या धान्य कोट्यातून देखील लाखों कुटुंबाला धान्य मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे दिसून येत आहे.

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी पार्श्वभूमीवर मागणीप्रमाणे मजुरांच्या हाताला काम व स्वस्त धान्य दुकानातून पुरेसे धान्य नागरिकांना मिळावे, यासाठी शासनाने वाढीव धान्य कोटा देण्याची मागणी लोकप्रतिनीधींनी केली होती. मात्र, ती मागणी पूर्ण तर झालीच नाही. आहे त्या धान्य कोट्यातून देखील लाखों कुटुंबाला धान्य मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात जवळपास साडेपाच लाख कुटुंब स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. परंतु, दुकानदारांच्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रत्येक महिन्याला फक्त तीन ते साडेतीन लाख कुटुंबांनाच स्वस्त धान्याचा लाभ दिला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागिराकांना आर्थिक परिस्थिती नसताना देखील खूल्या बाजारातून महाग धान्य खरेदी करावे लागत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी पार्श्वभूमिवर मागणीप्रमाणे मजुरांच्या हाताला काम व सरसकट स्वस्त धान्य देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनस्तरावर ही मागणी गांभीर्याने घेतली गेली नाही. तसेच जिल्हा पुरवठा विभागाकडून आलेले धान्य देखील लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोचवले जात नसल्याचे चित्र आहे.मुख्यमंत्र्यांना दिली खोटी माहितीनोहेंबर महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी अनेक कुटंबांना रेशन मिळत नसल्याचा मुद्दा आ.जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी माहिती मागवली मात्र, ई-पॉसचे कारण पुढे करत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळ मारुन नेली. वास्तविक ई-पॉज प्रणालीमुळे लाभार्थ्यांना धान्य नाकारता येत नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांना यावेळी खोटी माहिती देण्यात आली होती.

टॅग्स :droughtदुष्काळRevenue Departmentमहसूल विभागAgriculture Sectorशेती क्षेत्र