शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

दुष्काळात रेशन मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:28 IST

आहे त्या धान्य कोट्यातून देखील लाखों कुटुंबाला धान्य मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे दिसून येत आहे.

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी पार्श्वभूमीवर मागणीप्रमाणे मजुरांच्या हाताला काम व स्वस्त धान्य दुकानातून पुरेसे धान्य नागरिकांना मिळावे, यासाठी शासनाने वाढीव धान्य कोटा देण्याची मागणी लोकप्रतिनीधींनी केली होती. मात्र, ती मागणी पूर्ण तर झालीच नाही. आहे त्या धान्य कोट्यातून देखील लाखों कुटुंबाला धान्य मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात जवळपास साडेपाच लाख कुटुंब स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. परंतु, दुकानदारांच्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रत्येक महिन्याला फक्त तीन ते साडेतीन लाख कुटुंबांनाच स्वस्त धान्याचा लाभ दिला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागिराकांना आर्थिक परिस्थिती नसताना देखील खूल्या बाजारातून महाग धान्य खरेदी करावे लागत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी पार्श्वभूमिवर मागणीप्रमाणे मजुरांच्या हाताला काम व सरसकट स्वस्त धान्य देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनस्तरावर ही मागणी गांभीर्याने घेतली गेली नाही. तसेच जिल्हा पुरवठा विभागाकडून आलेले धान्य देखील लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोचवले जात नसल्याचे चित्र आहे.मुख्यमंत्र्यांना दिली खोटी माहितीनोहेंबर महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी अनेक कुटंबांना रेशन मिळत नसल्याचा मुद्दा आ.जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी माहिती मागवली मात्र, ई-पॉसचे कारण पुढे करत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळ मारुन नेली. वास्तविक ई-पॉज प्रणालीमुळे लाभार्थ्यांना धान्य नाकारता येत नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांना यावेळी खोटी माहिती देण्यात आली होती.

टॅग्स :droughtदुष्काळRevenue Departmentमहसूल विभागAgriculture Sectorशेती क्षेत्र