शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडींमध्ये दुप्पट वाढ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:38 IST

डेंग्यू, टायफाईडचे अनेक रुग्ण, थंडी-तापाचीही साथ अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : वातावरणातील बदलामुळे अनेक लहान मुलांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे ...

डेंग्यू, टायफाईडचे अनेक रुग्ण, थंडी-तापाचीही साथ

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : वातावरणातील बदलामुळे अनेक लहान मुलांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे पालक चिंतेत आहेत. कोरोनाच्या भीतीखाली असलेल्या पालकांना आता मुलांच्या आजाराची काळजी लागली आहे.

सध्या शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात मुलांना उपचारासाठी आणले जात आहे. त्यामध्ये साधारणत: सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे आहेत. रुग्णालयात तापाची औषधे देऊन उपचार केले जात आहेत. त्यानंतरही आजार कमी न झाल्यास मात्र डेंग्यू तसेच टायफाॅईडची चाचणी केली जात आहे. काही मुलांना डेंग्यूची लक्षणे आढळल्यानेही चिंता वाढली आहे. मुलांना डासांपासून सुरक्षित ठेवण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे.

एका बेडवर दोन रुग्ण ठेवण्याची वेळ

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात थंडीताप व व विविध आजारँचे रुग्ण वाढल्याने एकाच कॉटवर दोन-दोन रुग्ण ठेवण्याची वेळ बालकक्षात आली होती. मात्र आता ही स्थिती कमी झाली आहे.

डेंग्यू-मलेरियाची चाचणी

ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असलेल्या मुलांना उपचार दिल्यानंतरही आजार कमी न झाल्यास डेंग्यू, मलेरियाची चाचणी केली जात आहे. शहरात सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. आजपर्यंत जवळपास ४० रुग्ण आढळून आलेले आहेत. तसेच खासगी रुग्णालयातही रुग्ण असल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्षात ही संख्या मोठी आहे.

बालरोगतज्ज्ञ म्हणतात....

सध्या पावसाच्या दिवसात मुलांना आजार होण्याचे प्रमाण जास्त असते. यात वातावरणातील बदल हे एक कारण आहेच; पण त्याच वेळी दूषित पाण्यामुळे मुले आजारी पडू शकतात. घर व परिसरातील स्वच्छता या काळात अत्यंत गरजेची आहे.

- डॉ. रमेश लोमटे, बालरोगतज्ज्ञ, अंबाजोगाई.

लहान मुले पावसात खेळतात, भिजतात. यातून सर्दी, ताप असे आजार होतात. डासांपासून मलेरिया, डेंग्यू या आजारांची भीती आहे. त्यामुळे या काळात सांभाळणे गरजेचे आहे. सकस आहार ही मुलांच्या आरोग्यात महत्त्वाची बाब आहे.

- डॉ.प्रसाद कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ, अंबाजोगाई

अनेक मुलांची होतेय कोरोना चाचणी

कोरोना संशयित मुलांची चाचणी करण्याचा सल्लाही डॉक्टर देत आहेत. ग्रामीण भागात पहिल्या लाटेतही अनेक लहान मुले बाधित झाली होती. मात्र आता हे तापाचे आजार वाढल्याने काळजीपोटी स्वतः पुढाकार घेत पालकही आपल्या बालकांची कोरोना चाचणी करून घेऊ लागले आहेत.

ही घ्या काळजी

१. मुलांना डास चावणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.

२. स्वच्छ पाण्यातील डास धोकादायक असतात. यातून डेंग्यू होऊ शकतो.

३. घरासह परिसर स्वच्छताही या काळात अत्यंत महत्त्वाची आहे.