शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुख्यमंत्री आज बीडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:43 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी जिल्ह्यात येत असून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ स्थिती व इतर योजनांच्या संदर्भात ते आढावा बैठक घेणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी जिल्ह्यात येत असून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ स्थिती व इतर योजनांच्या संदर्भात ते आढावा बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पोलीस विभागाने सुरक्षा आणि बंदाबस्ताच्या दृष्टीने नियोजन करुन रंगीत तालीम घेतली. तर दुपारी विविध विभागाच्या प्रमुखांची बैठक झाली. दुष्काळी सावटात दिवाळी साजरी केलेल्या जिल्ह्यातील जनतेला मुख्यमंत्री कोणत्या प्रकारे दिलासा देतात, याकडे लक्ष लागले आहे.बीड जिल्ह्यात यावर्षी वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत केवळ ५० टक्के व तोही अनियमित स्वरुपात झाला. परिणामी खरीप हंगामातील सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले. केवळ २० ते ३० टक्के उत्पादन हाती लागले, मात्र त्याचा दर्जाही सुमार आहे. पाऊसच नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकºयांचा रबी हंगामही धोक्यात आला. यंदा मात्र नोव्हेंबरपर्यंत केवळ २ टक्के पेरा झाला.जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये पाणी साठा उपलब्ध नाही. मोठ्या प्रकल्पांच्या मृतसाठ्यावरच मदार आहे. लघु तलाव कोरडेठाक आहेत. मध्यम प्रकल्पांचीही अशीच स्थिती आहे. सर्व धरणातील उपलब्ध पाणी साठा पिण्यासाठी आरक्षित करुन उपसा करण्यावर प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मात्र राजकीय हस्तक्षेपांमुळे पाणी उपसा नियंत्रणात आलेला नाही. आष्टी तालुक्यात आॅक्टोबरपासून पाणी टंचाईच्या झळा सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात टॅँकरने पाणी पुरवठा करावा या मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे आले आहेत. मात्र अद्याप टॅँकर उपलब्ध झालेले नाही.दुसरीकडे मागील वर्षी हमीदराने विकलेल्या सोयाबीन, उडीद, तुरीचे पेमेंट बहुतांश शेतकºयांना मिळालेले नाहीत. त्याचबरोबर पीक विम्याची रक्कमही मिळाली नसल्याच्या शेतक-यांच्या तक्रारी आहेत. विमा कंपनी व बॅँकाकंकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांसाठी मिशन दिलासासारख्या योजना चांगल्या असल्यातरी अनेक इच्छुक लाभार्थ्यांना लाभ देताना तांत्रिक अडचणी येत आहेत. सरकारने घोषणा करुनही दुष्काळी स्थितीत अद्याप आवश्यक उपाययोजना कार्यान्वित करण्यात आलेल्या नाहीत.ऊस संपादीत करुन दावणीला द्यासध्या जो ऊस उभा आहे, तो पाण्याअभावी जळून जात आहे. तो ऊस तत्काळ शासनाने संपादीत करुन शेतक-यांना त्याच ठिकाणी दावणीला देण्यात यावा, रोहयोतून शेत विहीर, चर, पांदण, रस्त्याची कामे सुरु करावीत,रेशन दुकानांतून अन्नधान्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, पाण्याचा प्रश्न टॅँकर माफियांच्या विळख्यातून सुटावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांनी केली आहे.आयजी बीडमध्ये तळ ठोकूनमुख्यमंत्र्यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग सतर्क झाला आहे. उपद्रवींवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच शिवाजी पुतळा ते नगर रोड भागात पुरेसे पोलीस नियुक्त केले असून त्यांची ािहर्सल घेण्यात आली. तर विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुथ्याळ हे रविवारपासून बीड शहरात तळ ठोकून बंदोबस्ताचा आढावा अधिकाºयांकडून घेत होते.सचिवांशी थेट संवादआढावा बैठकीदरम्यान काही विषयांवर संबंधित विभागाच्या सचिवांशी थेट मुख्यमंत्री संपर्क करुन चर्चा करतील. यातून प्रश्नांची उकल, उपायांतील अडथळे, तांत्रिक मुद्दे या बाबींवर मार्ग काढला जाण्याची शक्यता आहे.महत्त्वाकांक्षी योजनांचा घेणार आढावामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात येणार आहे.शासनाच्या विविध विभागांच्या १५ महत्वाकांक्षी योजनांची काय स्थिती आहे. नेमक्या उपाययोजना झाल्या की नाही, कुठे अडचणी येत आहेत. याबाबत संबंधित विभाग प्रमुख अधिकाºयांशी चर्चा केली जाणार आहे.जिल्हाधिकारी एम. डी. सिंह हे परदेश दौºयावर असल्याने अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे जिल्ह्यातील कामकाजाची माहिती देणार आहेत. यावेळी विभागीय आयुक्त उपस्थित राहतील असे सांगण्यात आले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीdroughtदुष्काळ