शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री आज बीडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:43 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी जिल्ह्यात येत असून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ स्थिती व इतर योजनांच्या संदर्भात ते आढावा बैठक घेणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी जिल्ह्यात येत असून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ स्थिती व इतर योजनांच्या संदर्भात ते आढावा बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पोलीस विभागाने सुरक्षा आणि बंदाबस्ताच्या दृष्टीने नियोजन करुन रंगीत तालीम घेतली. तर दुपारी विविध विभागाच्या प्रमुखांची बैठक झाली. दुष्काळी सावटात दिवाळी साजरी केलेल्या जिल्ह्यातील जनतेला मुख्यमंत्री कोणत्या प्रकारे दिलासा देतात, याकडे लक्ष लागले आहे.बीड जिल्ह्यात यावर्षी वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत केवळ ५० टक्के व तोही अनियमित स्वरुपात झाला. परिणामी खरीप हंगामातील सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले. केवळ २० ते ३० टक्के उत्पादन हाती लागले, मात्र त्याचा दर्जाही सुमार आहे. पाऊसच नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकºयांचा रबी हंगामही धोक्यात आला. यंदा मात्र नोव्हेंबरपर्यंत केवळ २ टक्के पेरा झाला.जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये पाणी साठा उपलब्ध नाही. मोठ्या प्रकल्पांच्या मृतसाठ्यावरच मदार आहे. लघु तलाव कोरडेठाक आहेत. मध्यम प्रकल्पांचीही अशीच स्थिती आहे. सर्व धरणातील उपलब्ध पाणी साठा पिण्यासाठी आरक्षित करुन उपसा करण्यावर प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मात्र राजकीय हस्तक्षेपांमुळे पाणी उपसा नियंत्रणात आलेला नाही. आष्टी तालुक्यात आॅक्टोबरपासून पाणी टंचाईच्या झळा सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात टॅँकरने पाणी पुरवठा करावा या मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे आले आहेत. मात्र अद्याप टॅँकर उपलब्ध झालेले नाही.दुसरीकडे मागील वर्षी हमीदराने विकलेल्या सोयाबीन, उडीद, तुरीचे पेमेंट बहुतांश शेतकºयांना मिळालेले नाहीत. त्याचबरोबर पीक विम्याची रक्कमही मिळाली नसल्याच्या शेतक-यांच्या तक्रारी आहेत. विमा कंपनी व बॅँकाकंकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांसाठी मिशन दिलासासारख्या योजना चांगल्या असल्यातरी अनेक इच्छुक लाभार्थ्यांना लाभ देताना तांत्रिक अडचणी येत आहेत. सरकारने घोषणा करुनही दुष्काळी स्थितीत अद्याप आवश्यक उपाययोजना कार्यान्वित करण्यात आलेल्या नाहीत.ऊस संपादीत करुन दावणीला द्यासध्या जो ऊस उभा आहे, तो पाण्याअभावी जळून जात आहे. तो ऊस तत्काळ शासनाने संपादीत करुन शेतक-यांना त्याच ठिकाणी दावणीला देण्यात यावा, रोहयोतून शेत विहीर, चर, पांदण, रस्त्याची कामे सुरु करावीत,रेशन दुकानांतून अन्नधान्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, पाण्याचा प्रश्न टॅँकर माफियांच्या विळख्यातून सुटावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांनी केली आहे.आयजी बीडमध्ये तळ ठोकूनमुख्यमंत्र्यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग सतर्क झाला आहे. उपद्रवींवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच शिवाजी पुतळा ते नगर रोड भागात पुरेसे पोलीस नियुक्त केले असून त्यांची ािहर्सल घेण्यात आली. तर विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुथ्याळ हे रविवारपासून बीड शहरात तळ ठोकून बंदोबस्ताचा आढावा अधिकाºयांकडून घेत होते.सचिवांशी थेट संवादआढावा बैठकीदरम्यान काही विषयांवर संबंधित विभागाच्या सचिवांशी थेट मुख्यमंत्री संपर्क करुन चर्चा करतील. यातून प्रश्नांची उकल, उपायांतील अडथळे, तांत्रिक मुद्दे या बाबींवर मार्ग काढला जाण्याची शक्यता आहे.महत्त्वाकांक्षी योजनांचा घेणार आढावामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात येणार आहे.शासनाच्या विविध विभागांच्या १५ महत्वाकांक्षी योजनांची काय स्थिती आहे. नेमक्या उपाययोजना झाल्या की नाही, कुठे अडचणी येत आहेत. याबाबत संबंधित विभाग प्रमुख अधिकाºयांशी चर्चा केली जाणार आहे.जिल्हाधिकारी एम. डी. सिंह हे परदेश दौºयावर असल्याने अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे जिल्ह्यातील कामकाजाची माहिती देणार आहेत. यावेळी विभागीय आयुक्त उपस्थित राहतील असे सांगण्यात आले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीdroughtदुष्काळ